शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

आजपासून एसटी धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:01 IST

पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अगोदरच तोट्यात चालले आहे. अशातच आता कोरोनामुळे ५५ ऐवजी २२ प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. यात महामंडळाचा खर्च वसूूल होणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे आव्हान महामंडळासमारे उभे ठाकले होते. तथापि, प्रवाशांकडून जिल्ह्याबाहेर वाहतूृक सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात होती.

ठळक मुद्देपाच महिन्यानंतर बसफेऱ्या : जिल्ह्याबाहेर वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाकाळात पाच महिन्यांपासून बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस गुरुवारपासून जिल्ह्याबाहेर पडणार आहेत. पहिल्या टप्यात नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये एसटी बसची प्रवासी वाहतूक सुरू केली जाणार आहे.पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अगोदरच तोट्यात चालले आहे. अशातच आता कोरोनामुळे ५५ ऐवजी २२ प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. यात महामंडळाचा खर्च वसूूल होणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे आव्हान महामंडळासमारे उभे ठाकले होते. तथापि, प्रवाशांकडून जिल्ह्याबाहेर वाहतूृक सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात होती. त्यामुळे शासनाने जिल्ह्याबाहेर बस सुरू करण्यास २० आॅगस्ट रोजी हिरवी झेंडी दिली. त्यानुसार उद्यापासून एसटी बस जिल्ह्याबाहेर धावणार आहेत.लॉकडाऊन कालावधीत एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानाचा फटका सहन करावा लागला. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हांतर्गत एसटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. बसच्या क्षमतेपेक्षा अर्धे प्रवासी घेवून वाहतूक करावी लागत आहे. अशातच प्रवाशांचा प्रतिसादही खूपच कमी आहे. एक ते दोन तासांच्या फरकाने जिल्ह्यातील आठ एसटी आगारांमधून बस सोडण्यात येत आहेत. सोबतच बस स्थानकाहून सुटलेल्या बस मार्गस्थ कुठेही थांबत नसल्याने कमी प्रवासी घेऊन धावत असलेल्या एसटींकडून महामंडळासाठी खर्च जास्त अन् उत्पन्न कमी मिळत आहे. अशातच आता प्रवाशांच्या मागणीची दखल घेत शासनाने आता जिल्ह्याबाहेर बसफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात येथील मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य आगारामधून जिल्ह्याबाहेर लालपरी धावणार आहे. गुरुवारपासून सुरू होत असलेल्या या सेवेचे यश आर्थिक आखाड्यांवर अवलंबून आहे.अशा असतील आगारातून बसफेऱ्याअमरावती ते यवतमाळ - सकाळी ८, १०, १२ वाजता, दुपारी २ व ४ वाजतायवतमाळ ते अमरावती - सकाळी ११ आणि दुपारी १, २, ४ व ५ वाजताअमरावती ते अकोला - सकाळी ८, १० व १२ वाजता, दुपारी २ व ४ वाजताअकोला ते अमरावती - सकाळी ११ वाजता, दु. १, २, ३, ५ व सायं. ७ वाजताअमरावती ते वाशिम- सकाळी ८, १० व १२ दुपारी २ व ४ वाजतावाशिम ते अमरावती - सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजता.परतवाडा ते अकोला - सकाळी ८, १० व १२ दुपारी २ व ४ वाजता.अकोला ते परतवाडा- सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजतावरूड ते नागपूर - सकाळी ८ , १० व १२, दुपारी २ व ४ वाजता.नागपूर ते वरूड- सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजताअमरावती ते वर्धा - सकाळी ८, १० व दुपारी २ व ४ वाजता.वर्धा ते अमरावती - सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजता.दर्यापूर ते मूर्तिजापूर - सकाळी ८, १० व १२, दुपारी २ , ४ व ५ वाजता.दर्यापूर ते अकोट - सकाळी १० व १२, दुपारी २, ४ व ५ वाजता.

टॅग्स :state transportएसटी