शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एसटी वाहकाने संसाराच्या गाडीत दुसरीला बसवले, पहिलीची पोलिसात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 15:35 IST

२०१६ पासून पतीने एकदाही मुलांची भेट घेतलेली नाही, तसेच त्याचे दुसरे लग्न झाल्याची माहिती मिळाल्याने जानेवारी २०२२ मध्ये महिलेने तक्रार नोंदविण्यासाठी तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठले.

तळेगाव दशासर (अमरावती) : एसटी महामंडळात पुजगाव आगारात कार्यरत व अमरावती येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाने अमरावती येथे परस्त्रीसोबत लग्न करून संसार थाटला असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, महिलेचे २००५ मध्ये नागसेन राजहंस तायडे (३४) याच्याशी लग्न झाले होते. २००७ मध्ये त्याला वाहक म्हणून नोकरी लागली. त्यांना १४ व ११ वर्षांची दोन मुले आहेत. २०१६ पासून पतीने परस्त्रीशी संबंध प्रस्थापित केले. यानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ सुरू झाला. सासरे राजहंस सदाशिव तायडे व सासूदेखील यात सहभागी असल्याचे तक्रारीत नमूद आहे. २०१६ पासून पतीने एकदाही मुलांची भेट घेतलेली नाही, तसेच त्याचे दुसरे लग्न झाल्याची माहिती मिळाल्याने जानेवारी २०२२ मध्ये महिलेने तक्रार नोंदविण्यासाठी तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी हे प्रकरण अमरावती येथील भरोसा सेलला दिले. मात्र, नागसेन तारखेवर आला नाही. यामुळे हे प्रकरण तळेगाव दशासर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. तळेगाव पोलिसांनी नागसेन तायडे, राजहंस तायडे व एक महिला (सर्व रा. अमरावती) यांच्याविरुद्ध ४ मे रोजी गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारmarriageलग्न