शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

Coronavirus; रेमडेसिविर चढ्या दरात विकले तर ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 16:52 IST

Amravati news कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुरेसा असून, कोणी ते चढ्या दरात विकताना आढळल्यास ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’ केला जाईल, अशी तंबी काळाबाजार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची तंबीजिल्ह्यात ४५०० रेमडेसिविरचा साठा, ऑक्सिजन बेड पुरेसे

 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुरेसा असून, कोणी ते चढ्या दरात विकताना आढळल्यास ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’ केला जाईल, अशी तंबी काळाबाजार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. ते गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलत होते.

जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, गत एप्रिल महिन्यात ३१ ते ४५ वयोगटातील ३० युवकांचा कोरोनाने मृत्यू झाला, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट कायम आहे. सावधगिरी बाळगणे, काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करणे कठीण होईल, असे ते म्हणाले. रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात तीन हजार तर, शासकीय रुग्णालयात १५०० इंजेक्शन आहेत. त्यामुळे निश्चित दरानुसारच रेमडेसिविर उपलब्ध आहे. जर कोणी चढ्या दरात रेमडेसिविर देत असेल तर, थेट माझ्याशी संपर्क साधा ते खरे आढळल्यास संबंधितावर ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’ दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. रेमडेसिविरप्रकरणी पाच रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आहे. पथकाचा अहवाल अप्राप्त असून, लवकरच याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यात रेमडेसिविर, ऑक्सिजन बेड, औषधसाठा पुरेसा असल्याची ग्वाही त्यांनी दिली. चार दिवस पुरेल एवढा रेमडेसिविरचा साठा आहे. एमआरपी दरानेच रेमडेसिविर घ्यावे, कुणी जादा पैसे मागितल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी नागरिकांना केले.

गावस्तरावर कोरोना संक्रमणमुक्त समिती

संचारबंदी २२ मेपर्यंत आहे. कोरोना संक्रमण कायम असून, ग्रामीण भागात त्याचा मोठा उद्रेक आहे. परिणामी गाव स्तरावर कोरोना संक्रमण मुक्त समिती गठित करण्यात येणार आहे. अद्यापही ५१ टक्के गावांत कोरोनाचा उद्रेक आहे. कोरोना संक्रमण मुक्त गाव करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात गावकऱ्यांनाच त्रिसूत्रीचे पालन करावे लागणार असून, आवश्यक त्या उपाययोजना करून गाव संक्रमण मुक्त केले जाईल, असे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.

कृषी निविष्ठा खरेदी, पीक कर्जासाठी टोकन पद्धत

येत्या काही दिवसांत खरीप हंगाम सुरू होणार आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी कृषी निविष्ठा खरेदी, पीक कर्जासाठी टोकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. वेळेत कृषी निविष्ठा मिळेल, त्याअनुषंगाने कृषी केंद्रांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. टोकन पद्धतीचा अवलंब करून गर्दी टाळण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी नवाल म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस