शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Coronavirus; रेमडेसिविर चढ्या दरात विकले तर ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 16:52 IST

Amravati news कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुरेसा असून, कोणी ते चढ्या दरात विकताना आढळल्यास ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’ केला जाईल, अशी तंबी काळाबाजार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची तंबीजिल्ह्यात ४५०० रेमडेसिविरचा साठा, ऑक्सिजन बेड पुरेसे

 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुरेसा असून, कोणी ते चढ्या दरात विकताना आढळल्यास ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’ केला जाईल, अशी तंबी काळाबाजार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. ते गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलत होते.

जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, गत एप्रिल महिन्यात ३१ ते ४५ वयोगटातील ३० युवकांचा कोरोनाने मृत्यू झाला, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट कायम आहे. सावधगिरी बाळगणे, काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करणे कठीण होईल, असे ते म्हणाले. रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात तीन हजार तर, शासकीय रुग्णालयात १५०० इंजेक्शन आहेत. त्यामुळे निश्चित दरानुसारच रेमडेसिविर उपलब्ध आहे. जर कोणी चढ्या दरात रेमडेसिविर देत असेल तर, थेट माझ्याशी संपर्क साधा ते खरे आढळल्यास संबंधितावर ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’ दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. रेमडेसिविरप्रकरणी पाच रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आहे. पथकाचा अहवाल अप्राप्त असून, लवकरच याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यात रेमडेसिविर, ऑक्सिजन बेड, औषधसाठा पुरेसा असल्याची ग्वाही त्यांनी दिली. चार दिवस पुरेल एवढा रेमडेसिविरचा साठा आहे. एमआरपी दरानेच रेमडेसिविर घ्यावे, कुणी जादा पैसे मागितल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी नागरिकांना केले.

गावस्तरावर कोरोना संक्रमणमुक्त समिती

संचारबंदी २२ मेपर्यंत आहे. कोरोना संक्रमण कायम असून, ग्रामीण भागात त्याचा मोठा उद्रेक आहे. परिणामी गाव स्तरावर कोरोना संक्रमण मुक्त समिती गठित करण्यात येणार आहे. अद्यापही ५१ टक्के गावांत कोरोनाचा उद्रेक आहे. कोरोना संक्रमण मुक्त गाव करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात गावकऱ्यांनाच त्रिसूत्रीचे पालन करावे लागणार असून, आवश्यक त्या उपाययोजना करून गाव संक्रमण मुक्त केले जाईल, असे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.

कृषी निविष्ठा खरेदी, पीक कर्जासाठी टोकन पद्धत

येत्या काही दिवसांत खरीप हंगाम सुरू होणार आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी कृषी निविष्ठा खरेदी, पीक कर्जासाठी टोकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. वेळेत कृषी निविष्ठा मिळेल, त्याअनुषंगाने कृषी केंद्रांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. टोकन पद्धतीचा अवलंब करून गर्दी टाळण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी नवाल म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस