शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात प्रवेशीत परदेशीय किंवा देशातंर्गत प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त पुणा, मुंबईसारख्या शहरातून आलेल्या व्यक्तीदेखील स्वताहून तपासणी करीत आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५३० चेवर झालेली आहे. यापैकी ५२५ व्यक्तींना गृह विलगीकरणात १४ दिवस राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देशुकशुकाट : रस्ते निर्मनुष्य, रेल्वे स्थानकांवर ‘नो एन्ट्री’, रिक्षा बंद, शहर बसची चाके थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रविवार उजाडताच रस्ते सुनसान झाले होते. अमरावती महानगरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजकमल चौक, जयस्तंभ चौक, जवाहरगेट, इतवारा बाजार, कॉटनमार्केट, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, अंबादेवी मार्ग, राजापेठ, गाडगेनगर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, इर्विन चौक, जवाहरगेट आदी भागातील दुकाने, बाजारपेठ बंद होत्या. राजकमल चौकासह अमरावतीच्या गजबजलेल्या भागांतही शुकशुकाट होता. रस्त्यावर केवळ पोलिसांची वाहने फिरताना दिसून आले. तर, चौका-चौकात पोलीस तैनात होते. रस्त्यावर फिरताना दिसताच कोण, कोठे चालल्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. जनता कर्फ्युने रविवारी अमरावती शांत झाल्याचे दिसून आले.गृह विलगीकरणात५२५ वर रुग्णजिल्ह्यात प्रवेशीत परदेशीय किंवा देशातंर्गत प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त पुणा, मुंबईसारख्या शहरातून आलेल्या व्यक्तीदेखील स्वताहून तपासणी करीत आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५३० चेवर झालेली आहे. यापैकी ५२५ व्यक्तींना गृह विलगीकरणात १४ दिवस राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत ५९ व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी पाठविले त्यापैकी ४८ निगेटिव्ह आलेत. अद्याप ८ व्यक्तींचे नमुने अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आहे.परदेशातून परतलेल्या नागरिकांचे शुक्रवारपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले ४८ थ्रोट स्वॅबचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाने रविवारी ११ व तत्पूर्वी ४४ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. दोन नमुने तपासणीसाठी तांत्रिकदृष्ट्या त्रुटीमुळे रिजेक्ट झालेत. त्यामुळे तो पुन्हा पाठविण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी, होम क्वारंटाईन आदी उपाययोजना होत आहे. पथकांकडून प्रवाश्यांशी संपर्क व पाठपुरावा होत आहे. जिल्ह्यात रेल्वे, एस. टी. व खासगी बसमधील प्रवाश्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आंतरराज्य सीमेवरही तपासणीसाठी पथके नेमण्यात आली आहेत. आवश्यक दक्षतेबाबत जनजागृतीही केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.कलम १४४ लागू‘जनता कर्फ्यू’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी स्वत: निर्बंध लावून घेतले, ही बाब कौतुकास्पद आहे. येत्या १० दिवसांत अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे. बळाचा वापर करावा लागू नये, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्याच्या शहरी भागात रविवारपासून कलम १४४ लागू करण्यात आले.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारीसहकार्य करा‘जनता कर्फ्यू’ शांततेत पार पडला. बंदोबस्तासाठी ७५० पोलीस, १५० अधिकारी तैनात होते. कर्फ्यू संपताच रात्री ९ ते पहाटे ५ वाजतादरम्यान संचारबंदी असणार आहे. २३ मार्चपासून जमावबंदी कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.- संजयकुमार बावीस्कर, पोलीस आयुक्त 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या