शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात प्रवेशीत परदेशीय किंवा देशातंर्गत प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त पुणा, मुंबईसारख्या शहरातून आलेल्या व्यक्तीदेखील स्वताहून तपासणी करीत आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५३० चेवर झालेली आहे. यापैकी ५२५ व्यक्तींना गृह विलगीकरणात १४ दिवस राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देशुकशुकाट : रस्ते निर्मनुष्य, रेल्वे स्थानकांवर ‘नो एन्ट्री’, रिक्षा बंद, शहर बसची चाके थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रविवार उजाडताच रस्ते सुनसान झाले होते. अमरावती महानगरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजकमल चौक, जयस्तंभ चौक, जवाहरगेट, इतवारा बाजार, कॉटनमार्केट, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, अंबादेवी मार्ग, राजापेठ, गाडगेनगर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, इर्विन चौक, जवाहरगेट आदी भागातील दुकाने, बाजारपेठ बंद होत्या. राजकमल चौकासह अमरावतीच्या गजबजलेल्या भागांतही शुकशुकाट होता. रस्त्यावर केवळ पोलिसांची वाहने फिरताना दिसून आले. तर, चौका-चौकात पोलीस तैनात होते. रस्त्यावर फिरताना दिसताच कोण, कोठे चालल्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. जनता कर्फ्युने रविवारी अमरावती शांत झाल्याचे दिसून आले.गृह विलगीकरणात५२५ वर रुग्णजिल्ह्यात प्रवेशीत परदेशीय किंवा देशातंर्गत प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त पुणा, मुंबईसारख्या शहरातून आलेल्या व्यक्तीदेखील स्वताहून तपासणी करीत आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५३० चेवर झालेली आहे. यापैकी ५२५ व्यक्तींना गृह विलगीकरणात १४ दिवस राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत ५९ व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी पाठविले त्यापैकी ४८ निगेटिव्ह आलेत. अद्याप ८ व्यक्तींचे नमुने अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आहे.परदेशातून परतलेल्या नागरिकांचे शुक्रवारपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले ४८ थ्रोट स्वॅबचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाने रविवारी ११ व तत्पूर्वी ४४ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. दोन नमुने तपासणीसाठी तांत्रिकदृष्ट्या त्रुटीमुळे रिजेक्ट झालेत. त्यामुळे तो पुन्हा पाठविण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी, होम क्वारंटाईन आदी उपाययोजना होत आहे. पथकांकडून प्रवाश्यांशी संपर्क व पाठपुरावा होत आहे. जिल्ह्यात रेल्वे, एस. टी. व खासगी बसमधील प्रवाश्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आंतरराज्य सीमेवरही तपासणीसाठी पथके नेमण्यात आली आहेत. आवश्यक दक्षतेबाबत जनजागृतीही केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.कलम १४४ लागू‘जनता कर्फ्यू’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी स्वत: निर्बंध लावून घेतले, ही बाब कौतुकास्पद आहे. येत्या १० दिवसांत अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे. बळाचा वापर करावा लागू नये, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्याच्या शहरी भागात रविवारपासून कलम १४४ लागू करण्यात आले.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारीसहकार्य करा‘जनता कर्फ्यू’ शांततेत पार पडला. बंदोबस्तासाठी ७५० पोलीस, १५० अधिकारी तैनात होते. कर्फ्यू संपताच रात्री ९ ते पहाटे ५ वाजतादरम्यान संचारबंदी असणार आहे. २३ मार्चपासून जमावबंदी कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.- संजयकुमार बावीस्कर, पोलीस आयुक्त 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या