शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

शेतकऱ्यांमधून व्हावा सभापती

By admin | Updated: February 20, 2017 00:08 IST

सहकारात प्रस्थापितांऐवजी शेतकरी प्रतिनिधी यावेत, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे.

बाजार समितीसाठी तज्ज्ञांची सूचना : समितीची पुण्यात बैठकअमरावती : सहकारात प्रस्थापितांऐवजी शेतकरी प्रतिनिधी यावेत, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे. बाजार समितीतदेखील सर्व शेतकऱ्यांना मताधिकार असावा, यासाठी शासनाने समिती गठित केली आहे. या समितीची १८ फेब्रुवारीला पहिली बैठक पुण्यात झाली. यामध्ये थेट शेतकऱ्यांमधून बाजार समिती सभापतीची निवड व्हावी, अशी सूचना शासन नियुक्त तज्ज्ञ संचालक विजय हाडोळे यांनी समितीस केली आहे. नगर विकास विभागाने केलेल्या सुधारणेनुसार नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून केली आहे. त्याच धर्तीवर थेट शेतकऱ्यांमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती पाच वर्षांसाठी निवडले जावेत, या प्रस्तावाचा विचार करण्यात यावा, अशी सूचना हाडोळे यांनी पणन संचालकांनी आयोजित केलेल्या पहिल्या बैठकीत केली आहे. कृषी मालाच्या विपणनात बाजार समित्यांची भूमिका ही समित्यांना बळकटी देण्यासाठी महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना विपणनासाठी पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करणे, या बाबी रास्त आहेत. मात्र यासाठी बाजार समित्यांचा कायदाच रद्द केल्यास शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखे होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. बाजार समितीच्या घटनेनुसार शेतकऱ्यांना १५ प्रतिनिधी निवडावे लागतात. पूर्वी बाजार क्षेत्रातील शेतकऱ्यास संचालक पदाकरिता निवडणूक लढविता येत होती. मात्र मतदान हे सोसायटींचे पंचकमेटी सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्यांना करता येत होते. यामध्ये बदल होऊन मतदार यादीत ज्यांचे नाव आहे किंवा तो ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनाच निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.बाजार समितीत नवीन दुरुस्तीप्रमाणे पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी बाजारपेठा स्थापन होत आहे. येथे माल विक्रीचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. या बाजारपेठांना बाजार समिती सारखेच अधिकार आहेत. नियंत्रण मात्र खासगी आहे. येथे शेतकऱ्यांना त्यांची तक्रार करण्यास वाव राहत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी अ‍ॅडव्हायरसी कमेटी स्थापन करण्याविषयी विचार झाल्यास सोईचे होणार आहे. आदींच्या प्रस्तावित बदलामुळे सहकार समृद्ध होऊन प्रस्थापितांच्या बेलगाम कारभाराला खिळ बसणार आहे व शेतकऱ्यांचे नेतृत्व बाजार समितीत उदयाला येणार आहे. (प्रतिनिधी)निवडणूक वैधतेला आव्हान दिल्यास अधिकार कुणाकडे ?बाजार समिती नियमनानुसार सर्व जबाबदारी ही महसूल विभागातील जिल्हाधिकारी व सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधकावर आहे. मात्र सध्याचे स्वरुप पाहता ही निवडणूक आयोगाने घेतल्यास सोईची होईल. विशेषत: नियम ८८ बाबत निवडणुकीची वैधता आव्हानित झाल्यास अधिकार कुणाकडे असेल याविषयीची शंका सुचनेत व्यक्त करण्यात आली.संचालकपद रिक्त झाल्यास पोटनिवडणूक घ्यावीबाजार समितीचे कलम १८ अन्वये बाजार समितीत रिक्त झालेले दोन संचालकपदांची स्वीकृत नियुक्ती करण्याचे अधिकार समित्यांना आहेत. मात्र नव्याने जर नियमनात बदल होत आहेत, तर यामध्ये सुधारणा करण्यात येऊन ही रिक्त पदे निवडणुकीद्वारा भरली जाणे महत्त्वाचे आहे व विधान परिषद निवडणुकीत संचालकांना मताधिकार असणे महत्त्वाचे आहे.