शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

चिमण्यांनो,परत फिरा रे, जाहल्या तिन्ही सांजा

By admin | Updated: October 21, 2014 22:43 IST

ज्यांच्या आयुष्यात या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे जीवन तेजोमय केले़, अशा कुटुंंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना

वृध्दाश्रमातून आर्त हाक : दिवाळीही जन्मदाते अधांतरीचमोहन राऊत - अमरावतीज्यांच्या आयुष्यात या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे जीवन तेजोमय केले़, अशा कुटुंंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणती पणती देखील दाखवीत नाही़ या चिमण्यांनो परत फिरा रे़़़ घराकडे परत फिरा रे जाहल्या तिन्ही सांजा, असे म्हणत वृध्दाश्रमातील जन्मदाते आपल्या कुलदीपकांची प्रतीक्षा दिवाळी सणाला करीत आहेत. आज मंगळवारी सायंकाळपर्यंतही या जन्मदात्यांना घेण्यासाठी काळजाचा तुकडा आला नसल्याने हे वृध्द आयुष्यातील घर म्हणून सायंकाळचे दिवे वृध्दाश्रमातच लावत आहेत.जिल्ह्यात शासनाच्या अनुदानावर संत गाडगेबाबा, मधुबन व मातोश्री असे तीन वृध्दाश्रम सुरु आहेत. समाजाचे ऋण फेडावे म्हणून स्वखर्चाने सुखशांती या वृध्दाश्रमासह आठ वृध्दाश्रम जिल्ह्यात आहेत. मंगळवारी सदर प्रतिनिधीने दीपावलीच्या पार्श्वभुमिवर या वृध्दाश्रमातील आई-वडिलांशी संवाद साधला असता आपल्या संपुर्ण आयुष्यात कुलदीपकासाठी किती कष्ट घेतले याची बेरीज-वजाबाकी त्यांनी मांडली. ते म्हणाले, सध्याच्या युगात पैसा मुबलक असल्यामुळे नाते संबंधातील प्रेम संपले आहे़ मुले पैशाने बायकांचे प्रेम विकत घेत आहे़ पण आई-वडीलांचे खरे प्रेम पैसे विकत घेता येत नाही़ हेच आजची पिढी विसरली आहे़ सध्याच्या पिढीला पाहिजे ते शिक्षण, हवा तेवढा पैसा मिळत आहे़ मात्र सस्कांराचे धडे कमी पडत असल्यामुळे म्हातारपणी आई-वडीलांना आश्रमात ठेऊन खोटी प्रतिष्ठा जपली जात आहे़ते फटाके व कपडे एका ७० वर्षीय वृध्दाने आपल्या नावाचा उल्लेख न करण्याचे सांगून वंशाच्या दिव्याची कथा विशद केली़ लहानपणी या कुलदीपकाला दिवाळीचे फटाके, फराळ, कपडे मिळावे म्हणून मी आपल्या जीवाचा आटापिटा केला. आज तोच मोठा झाल्यावर आम्हाला विसरला आहे़ दिवाळीसारख्या सणाला आम्हाला घरी नेण्यास टाळले आहे़ आयुष्यातील संध्याकाळ साजरी करतांना आपल्या कुटुंबांचा मुख्यत्वे मुलांचा आधार असावा लागतो़ मात्र वृध्दापकाळात आमच्या सारख्या आई-वडीलांना आश्रमाचा आधार घ्यावा लागत असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले़वर्षातून दहा मिनीट मिळतेय वेळवंशाच्या दिव्याला जन्म दिल्यानंतर आयुष्याच्या अंधारात आधार मिळेल, मृत्यूनंतर याच कुलदीपकाच्या खाद्यांवर शेवटची विश्रांती यात्रा पूर्ण होईल, परंतू लग्न झाल्या बरोबर या कुलदीपकांने आपल्याला वृध्दाश्रमाचा रस्ता दाखविला. वर्षातून केवळ दहा मिनिट आपल्याला भेटायला येतो, अशी माहिती संत गाडगेबाबा वृध्दाश्रमातील ६५ वर्षीय जन्मदात्रीने सांगितले. दिवाळी तरी आपल्या घरी साजरी व्हावी, तळहाताला चटके घेत त्यांना मोठे केले़ आज ते आम्हाला विसरले आहे़ त्यामुळे वृध्दाश्रमात आयुष्याच्या सायंकाळचे दिवे तेवत ठेवायची वेळ आणली आहे. अशा मुलांना दीपावलीच्या सायंकाळी आनंदाचे दिवे लावतांना वृध्द आई-वडीलांची आठवण होणार काय, चिमुकल्या हातांना धरून दीपावलीचा दिवा, फटाके कसे लावायचे या गोष्टी ज्या जन्मदात्यांनी शिकविल्या त्या आई-वडीलांची दीपावली वृध्दाश्रमात साजरी होत आहे़