शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

चिमण्यांनो,परत फिरा रे, जाहल्या तिन्ही सांजा

By admin | Updated: October 21, 2014 22:43 IST

ज्यांच्या आयुष्यात या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे जीवन तेजोमय केले़, अशा कुटुंंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना

वृध्दाश्रमातून आर्त हाक : दिवाळीही जन्मदाते अधांतरीचमोहन राऊत - अमरावतीज्यांच्या आयुष्यात या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे जीवन तेजोमय केले़, अशा कुटुंंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणती पणती देखील दाखवीत नाही़ या चिमण्यांनो परत फिरा रे़़़ घराकडे परत फिरा रे जाहल्या तिन्ही सांजा, असे म्हणत वृध्दाश्रमातील जन्मदाते आपल्या कुलदीपकांची प्रतीक्षा दिवाळी सणाला करीत आहेत. आज मंगळवारी सायंकाळपर्यंतही या जन्मदात्यांना घेण्यासाठी काळजाचा तुकडा आला नसल्याने हे वृध्द आयुष्यातील घर म्हणून सायंकाळचे दिवे वृध्दाश्रमातच लावत आहेत.जिल्ह्यात शासनाच्या अनुदानावर संत गाडगेबाबा, मधुबन व मातोश्री असे तीन वृध्दाश्रम सुरु आहेत. समाजाचे ऋण फेडावे म्हणून स्वखर्चाने सुखशांती या वृध्दाश्रमासह आठ वृध्दाश्रम जिल्ह्यात आहेत. मंगळवारी सदर प्रतिनिधीने दीपावलीच्या पार्श्वभुमिवर या वृध्दाश्रमातील आई-वडिलांशी संवाद साधला असता आपल्या संपुर्ण आयुष्यात कुलदीपकासाठी किती कष्ट घेतले याची बेरीज-वजाबाकी त्यांनी मांडली. ते म्हणाले, सध्याच्या युगात पैसा मुबलक असल्यामुळे नाते संबंधातील प्रेम संपले आहे़ मुले पैशाने बायकांचे प्रेम विकत घेत आहे़ पण आई-वडीलांचे खरे प्रेम पैसे विकत घेता येत नाही़ हेच आजची पिढी विसरली आहे़ सध्याच्या पिढीला पाहिजे ते शिक्षण, हवा तेवढा पैसा मिळत आहे़ मात्र सस्कांराचे धडे कमी पडत असल्यामुळे म्हातारपणी आई-वडीलांना आश्रमात ठेऊन खोटी प्रतिष्ठा जपली जात आहे़ते फटाके व कपडे एका ७० वर्षीय वृध्दाने आपल्या नावाचा उल्लेख न करण्याचे सांगून वंशाच्या दिव्याची कथा विशद केली़ लहानपणी या कुलदीपकाला दिवाळीचे फटाके, फराळ, कपडे मिळावे म्हणून मी आपल्या जीवाचा आटापिटा केला. आज तोच मोठा झाल्यावर आम्हाला विसरला आहे़ दिवाळीसारख्या सणाला आम्हाला घरी नेण्यास टाळले आहे़ आयुष्यातील संध्याकाळ साजरी करतांना आपल्या कुटुंबांचा मुख्यत्वे मुलांचा आधार असावा लागतो़ मात्र वृध्दापकाळात आमच्या सारख्या आई-वडीलांना आश्रमाचा आधार घ्यावा लागत असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले़वर्षातून दहा मिनीट मिळतेय वेळवंशाच्या दिव्याला जन्म दिल्यानंतर आयुष्याच्या अंधारात आधार मिळेल, मृत्यूनंतर याच कुलदीपकाच्या खाद्यांवर शेवटची विश्रांती यात्रा पूर्ण होईल, परंतू लग्न झाल्या बरोबर या कुलदीपकांने आपल्याला वृध्दाश्रमाचा रस्ता दाखविला. वर्षातून केवळ दहा मिनिट आपल्याला भेटायला येतो, अशी माहिती संत गाडगेबाबा वृध्दाश्रमातील ६५ वर्षीय जन्मदात्रीने सांगितले. दिवाळी तरी आपल्या घरी साजरी व्हावी, तळहाताला चटके घेत त्यांना मोठे केले़ आज ते आम्हाला विसरले आहे़ त्यामुळे वृध्दाश्रमात आयुष्याच्या सायंकाळचे दिवे तेवत ठेवायची वेळ आणली आहे. अशा मुलांना दीपावलीच्या सायंकाळी आनंदाचे दिवे लावतांना वृध्द आई-वडीलांची आठवण होणार काय, चिमुकल्या हातांना धरून दीपावलीचा दिवा, फटाके कसे लावायचे या गोष्टी ज्या जन्मदात्यांनी शिकविल्या त्या आई-वडीलांची दीपावली वृध्दाश्रमात साजरी होत आहे़