शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

एसपी आपल्या गावी, सामान्यांशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:36 IST

महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी पोलीस उपविभागीय कार्यालयात ठाणेस्तरावर सर्वसामान्यांशी संवाद साधणार असल्याचे अमरावती जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देदुसरा, चौथा बुधवार : ठाण्यांना देणार भेट, लोकाभिमुख पोलिसिंगसाठीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी पोलीस उपविभागीय कार्यालयात ठाणेस्तरावर सर्वसामान्यांशी संवाद साधणार असल्याचे अमरावती जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अवैध धंदे चालविणाºयांसह धार्मिक तेढ निर्माण करणाºया गावगुंडांवर यापुढे धडक कारवाई केली जाईल. हे जसे पोलिसांकडून अपेक्षित आहे तसेच समाजात वावरणाप्या प्रत्येक घटकाने कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचे सकारात्मक परिणाम समाजात दिसून येतील. पोलिसांचा कामाचा हुरूप वाढेल, असे पोलीस अधीक्षक म्हणाले.ते पुढे म्हणाले, परभणी व अमरावती जिल्ह्यातील कामकाजात खूप मोठा फरक आहे. एक तर हे विभागाचे मुख्यालय आहे. त्यामुळे कारभाराचा आवाका प्रचंड मोठा आहे. अमरावती येथे पदभार हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम पोलिसिंगच्या दृष्टीने माहिती घेतली आहे. यापुढील काळात मागील तीन महिन्यांच्या कार्यकाळातील अदखलपात्र (एन.सी.) प्रलंबित अर्ज, महिलाविषयक तक्रारी, कायदेशीर शिथिल प्रकरणे, त्याचबरोबर तहसील कार्यालयात न्यायप्रविष्ट मामलतदार शेती प्रकरणे आदी प्रकरणांवर महिन्याच्या दुसºया व चौथ्या बुधवारी घेण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय कार्यालयातील आढावा बैठक घेतली जाईल. पहिली आढावा बैठक अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात १४ नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर अंजनगाव सुर्जी पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात २८ नोव्हेंबर रोजी होईल, असे पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी स्पष्ट केले.आढावा बैठकीत संबंधित अर्जदार व गैरअर्जदार यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले जाणार आहेत. सदर बैठक दुपारी १२ पासून ते अर्ज निपटारा होईपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस उपविभागीय अधिकारी व संबंधित ठाणेदार उपस्थित राहतील. अचलपूर येथे १४ नोव्हेंबर रोजी परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा, चांदूर बाजार, ब्राह्मणवाडा थडी, शिरजगाव कसबा येथील ठाणेदार उपस्थित राहणार आहेत. अंजनगाव सुर्जी येथे २८ नोव्हेंबरला अंजनगाव सुर्जी, रहिमापूर, पथ्रोट येथील ठाणेदार उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.तक्रारदाराने आढावा बैठकीतील तक्रार सर्वप्रथम त्या पोलीस ठाण्याला दिलेली असावी. त्यामध्ये त्यांचे समाधान झाले नसल्यास, तेच अर्ज या आढावा बैठकीत स्वीकारले जातील. क्षुल्लक कारणावरून सतत भांडणे करून धार्मिक तेढ निर्माण करणाºयांवर आमचे विशेष लक्ष आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यावर आपला भर राहणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विस्तार लक्षात घेऊन मार्गदर्शक सूचना संबंधित ठाणेदारांना दिल्या असल्याचे दिलीप झळके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.गुन्ह्यांच्या निपटाऱ्यासाठी मोहीमठाणे स्तरावर दाखल प्रलंबित गुन्ह्यांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम राबविली जाणार आहे तसेच अवैध धंदे चालविणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.सोशल मीडियावर विशेष लक्षसोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले आहे. त्याचा वापर कायद्याच्या चौकटीत करावा.ठाणेदारांवरही वॉचपोलीस अधीक्षक कार्यालयाची दारे ठोठावणारेही अनेक जण असतात. ठाणेदारांनी न्याय दिला नसल्याची फिर्याद मांडतात. त्यांच्या तक्रारींसाठी वेगळे बूकलेट एसपी कार्यालयात तयार आहे. त्यावरून संबंधित ठाणेदारांवर ‘वॉच’ ठेवला जातो.