शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

एसपी आपल्या गावी, सामान्यांशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:36 IST

महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी पोलीस उपविभागीय कार्यालयात ठाणेस्तरावर सर्वसामान्यांशी संवाद साधणार असल्याचे अमरावती जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देदुसरा, चौथा बुधवार : ठाण्यांना देणार भेट, लोकाभिमुख पोलिसिंगसाठीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी पोलीस उपविभागीय कार्यालयात ठाणेस्तरावर सर्वसामान्यांशी संवाद साधणार असल्याचे अमरावती जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अवैध धंदे चालविणाºयांसह धार्मिक तेढ निर्माण करणाºया गावगुंडांवर यापुढे धडक कारवाई केली जाईल. हे जसे पोलिसांकडून अपेक्षित आहे तसेच समाजात वावरणाप्या प्रत्येक घटकाने कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचे सकारात्मक परिणाम समाजात दिसून येतील. पोलिसांचा कामाचा हुरूप वाढेल, असे पोलीस अधीक्षक म्हणाले.ते पुढे म्हणाले, परभणी व अमरावती जिल्ह्यातील कामकाजात खूप मोठा फरक आहे. एक तर हे विभागाचे मुख्यालय आहे. त्यामुळे कारभाराचा आवाका प्रचंड मोठा आहे. अमरावती येथे पदभार हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम पोलिसिंगच्या दृष्टीने माहिती घेतली आहे. यापुढील काळात मागील तीन महिन्यांच्या कार्यकाळातील अदखलपात्र (एन.सी.) प्रलंबित अर्ज, महिलाविषयक तक्रारी, कायदेशीर शिथिल प्रकरणे, त्याचबरोबर तहसील कार्यालयात न्यायप्रविष्ट मामलतदार शेती प्रकरणे आदी प्रकरणांवर महिन्याच्या दुसºया व चौथ्या बुधवारी घेण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय कार्यालयातील आढावा बैठक घेतली जाईल. पहिली आढावा बैठक अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात १४ नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर अंजनगाव सुर्जी पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात २८ नोव्हेंबर रोजी होईल, असे पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी स्पष्ट केले.आढावा बैठकीत संबंधित अर्जदार व गैरअर्जदार यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले जाणार आहेत. सदर बैठक दुपारी १२ पासून ते अर्ज निपटारा होईपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस उपविभागीय अधिकारी व संबंधित ठाणेदार उपस्थित राहतील. अचलपूर येथे १४ नोव्हेंबर रोजी परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा, चांदूर बाजार, ब्राह्मणवाडा थडी, शिरजगाव कसबा येथील ठाणेदार उपस्थित राहणार आहेत. अंजनगाव सुर्जी येथे २८ नोव्हेंबरला अंजनगाव सुर्जी, रहिमापूर, पथ्रोट येथील ठाणेदार उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.तक्रारदाराने आढावा बैठकीतील तक्रार सर्वप्रथम त्या पोलीस ठाण्याला दिलेली असावी. त्यामध्ये त्यांचे समाधान झाले नसल्यास, तेच अर्ज या आढावा बैठकीत स्वीकारले जातील. क्षुल्लक कारणावरून सतत भांडणे करून धार्मिक तेढ निर्माण करणाºयांवर आमचे विशेष लक्ष आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यावर आपला भर राहणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विस्तार लक्षात घेऊन मार्गदर्शक सूचना संबंधित ठाणेदारांना दिल्या असल्याचे दिलीप झळके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.गुन्ह्यांच्या निपटाऱ्यासाठी मोहीमठाणे स्तरावर दाखल प्रलंबित गुन्ह्यांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम राबविली जाणार आहे तसेच अवैध धंदे चालविणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.सोशल मीडियावर विशेष लक्षसोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले आहे. त्याचा वापर कायद्याच्या चौकटीत करावा.ठाणेदारांवरही वॉचपोलीस अधीक्षक कार्यालयाची दारे ठोठावणारेही अनेक जण असतात. ठाणेदारांनी न्याय दिला नसल्याची फिर्याद मांडतात. त्यांच्या तक्रारींसाठी वेगळे बूकलेट एसपी कार्यालयात तयार आहे. त्यावरून संबंधित ठाणेदारांवर ‘वॉच’ ठेवला जातो.