शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

सोयाबीन आले काढणीला पावसाचा धोका पिकाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:01 IST

१० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने हर्षभरित झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीची प्रतीक्षा लागली होती. शेंगाचे दाणे भरून हे पीक काढणीला आलेले असताना आता कापणी करून घेतल्यास हे पीक पावसाच्या माराने कुजणार किंवा शेतात तसेच उभे ठेवल्यास दाण्यांना कोंब फुटतील, अशी कुचंबणा शेतकऱ्यांपुढे आहे. या कालावधीत १० हजारांवर गेलेले दर चार हजारांवर स्थिरावले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाभरात कुठे मुसळधार, तर कुठे रिमझिम पाऊस सातत्याने कोसळत आहे. ऑक्टोबर जवळ येत असताना पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. आता तर विजांच्या कडकडाटासह तो कोसळत आहे. त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन काढायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने हर्षभरित झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीची प्रतीक्षा लागली होती. शेंगाचे दाणे भरून हे पीक काढणीला आलेले असताना आता कापणी करून घेतल्यास हे पीक पावसाच्या माराने कुजणार किंवा शेतात तसेच उभे ठेवल्यास दाण्यांना कोंब फुटतील, अशी कुचंबणा शेतकऱ्यांपुढे आहे. या कालावधीत १० हजारांवर गेलेले दर चार हजारांवर स्थिरावले आहेत. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचलपूर तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचलपूर नगरपालिका क्षेत्रातही धो-धो पाऊस कोसळला. मल्हारा, गौरखेडा धोतरखेडा, पथरोट, जवलापूर, भिलोनासह तालुक्यातील अन्य ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेकांचे. सोयाबीन भिजले. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे कपाशीची बोंड सडायला सुरुवात झाली आहे. संत्रा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. दर्यापूर तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारीदेखील सुमारे दोन तास पाऊस कोसळला. याशिवाय तिवस्यात अर्धा तास, अचलपूर तालुक्यात दीड तास, अंजनगाव सुर्जी तालुक्यात तासभर पाऊस कोसळला. वरूड तालुक्यात राजुरा बाजारसह परिसरात अचानक काळेकुट्ट ढग दाटून १०-१५ मिनिटे जोरदार सरी कोसळल्या. धामणगाव रेल्वे तालुक्यात विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. तळेगाव दशासर, कावली वसाड व अंजनसिंगी परिसरातही पाऊस कोसळला. चांदूर बाजार तालुक्यातही अर्धा तास पाऊस झाला. चांदूर रेल्वे तालुक्यात ढगाळ वातावरण होेते. मुसळधार पाऊस कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, तुरळक सरी कोसळून पाऊस बंद झाला. धारणी तालुक्यातही पावसाचे वातावरण कायम आहे. सोयाबीन सवंगणीची कामे सुरू असताना पाऊस व्यत्यय आणत आहे. शेतजमीन ओली झाल्याने मजुरांना सवंगणी अर्ध्यावर टाकून परतावे लागत आहे. त्यासोबतच उघड्यावर टाकलेल्या सोयाबीनच्या गंजी गोळा करून ती झाकण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस