शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वहिवाटीचे रस्ते चिखलात; सोयाबीनच्या गंज्या शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 13:36 IST

नांदगाव खंडेश्वर येथे सततच्या पावसात शेतातील कापून ठेवलेल्या गंज्या भिजल्याने सोयाबीन कुजले आहे.

ठळक मुद्देसंकट परतीच्या पावसाचे चिखलाने सर्वेक्षण बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: नांदगाव खंडेश्वर येथे सततच्या पावसात शेतातील कापून ठेवलेल्या गंज्या भिजल्याने सोयाबीन कुजले. उरलेसुरले घरी नेऊन ते वाळविता येईल, तर त्याचीही सोय नाही. कारण वहिवाटीच्या रस्त्यात २-३ फुटांचे खोल खड्डे. त्यात चिखल साचल्याने त्यातून ना बैलगाडी नेता येत, ना ट्रॅक्टर चालत. त्यामुळे नैसर्गिक संकटाने तालुक्यातील शेतकरी पुरता बेजार झाला आहे.शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तालुक्यातील अनेक गावांचे सर्वेक्षण बाधित झाले आहे. त्यातील पहूर हे प्रातिनिधिक उदाहरण. पावसामुळे शेतात जाणारे पांदण रस्ते खराब झाले. कुजलेल्या सोयाबीनच्या गंज्या अजूनही शेतात पडून आहेत. ट्रॅक्टर वा बैलगाडी जात नसल्याने पहूर येथील शेतकरी मोहन पुरी यांना सोयाबीनची गंजी घरी आणता आलेली नाही. पद्माकर भेंडे यांनाही त्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात मळणी यंत्र व सोयाबीनचे पोते वाहून नेणारे ट्रॅक्टर चिखलात फसल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक झाली. पावसात भिजल्याने सोयाबीन खराब झाले. ते कवडीमोल भावाने बाजारात विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. कुजलेल्या सोयाबीनला दमट वास सुटला आहे. कपाशी पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन हे शेतकºयांचे मुख्य पीक असून, त्यावर त्यांचे आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. ते कुजल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी विभागाचे पथक अद्यापही पहूर व पंचक्रोशीत पोहोचलेले नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी