शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

एका पावसाने जाणार का सोयाबीन पीक ?

By admin | Updated: August 24, 2016 00:02 IST

रावर : १६ दिवसांपासून पावसात खंड, शेतकरी चिंताग्रस्त अमरावती : जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ४० टक्के असणारे सोयाबीन पीक फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.

पीक फुलोरावर : १६ दिवसांपासून पावसात खंड, शेतकरी चिंताग्रस्त अमरावती : जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ४० टक्के असणारे सोयाबीन पीक फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या स्थितीमध्ये सोयाबीनला पावसाची नितांत आवश्यकता असताना १६ दिवसांपासून पावसात खंड पडला आहे. याचा थेट परिणाम उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे एका पावसाने पीक हातचे जाणार का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक १२६.६ टक्के पाऊस पडला. सतत पोषक पाऊस असल्याने पिकांची वाढदेखील समाधानकारक आहे. सद्यस्थितीत सोयाबीन पीक बहरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. यावेळी सोयाबीनला पावसाची आवश्यकता असते. यामुळे शेंगामधील दाणे भरतात. पाऊस नसला तर शेंगादेखील पोचट होतात. यंदा अधिक पाऊस असल्याने चोपन व काळ्या जमिनीत आर्द्रता आहे. मात्र, मध्यम व हलक्या स्वरूपाच्या जमिनीतील पिकांना पावसाची आवश्यकता आहे. मात्र, जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून पावसात खंड आहे. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी पाण्याची पाळी देऊ शकतात. मात्र, जिरायती क्षेत्रात पावसाच्या ताणासाठी वेळीच व्यवस्थापन करण्याची गरज आहे. यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ८९ हजार २१२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ८९.५ टक्केवारी आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १५ हजार ४२० हेक्टर, अचलपूर १४ हजार ३०, चांदूरबाजार १६ हजार २००, धामणगाव १८ हजार २३, चांदूररेल्वे २७ हजार ३३५, तिवसा २२ हजार ९१४, मोर्शी १९ हजार ५७७, वरुड २ हजार ८०, दर्यापूर १४ हजार २४३, धारणी ९ हजार ९३०, चिखलदरा ११ हजार ५४३, अमरावती ३८ हजार ९६०, भातकुली २८ हजार ६७९ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५० हजार २७८ हेक्टर क्षेत्रात सोयाबिनची पेरणी आहे.(प्रतिनिधी)चक्रभुंगा किडीसाठी उपाययोजना सोयाबीन पिकात फुलोरापूर्वी ३.५ वक्रभुंगा प्रतीलिटर ओळीत आढळल्याबरोबर प्रोफेनोफॉस ५० ई.सी.२० मिली किंवा थायक्लोप्रिड २१.७ एससी १५ मिली किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मिली किंवा एथिओन ५० ई.सी. १५.३० मिली किंवा क्लोरत्र्यनिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन प्रादेशिक संशोधन केंद्राचे कृषीतज्ज्ञ मंगेश दांडगे, योगेश इंगळे व केंद्राचे प्रमुख संजय साखरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.अशी करावी उपाययोजना वाढवृद्धी किंवा फुलोरावृद्धी रासायने ही कीटकनाशके/बुरशीनाशके व तत्सम रसायनांमध्ये एकत्रित करून फवारणी करू नये, यापासून पिकांना अपाय होण्याची शक्यता अधिक असते. सद्यस्थितीत पावसाचा खंड पडल्याने पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पोटाशियम नायट्रेट १% (१ किलो १०० लीटर पाणी) या बाष्परोधकाची फुलोरावर १५ दिवसांनी फवारणी करावी. पावसाचा खंड पडल्यास आधी ओलीत पिके फुलोऱ्यावर असताना व दुसरे ओलीत दाणे भरत असताना करावे. खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास एथिओन ५० इसी १५ ते ३० मिली किंवा इंडोक्सिकॅर्ब १५.८ एसी ६.६ मिली किंवा क्लोरत्र्यनिलीप्रोल १८.५ एसीसी ३ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.७ आॅगस्टपासून पावसाचा खंडसोयाबीन हे पावसासाठी अतिसंवेदनशील पीक आहे. यात ७ आॅगस्टपासून आजपर्यंत म्हणजे १६ दिवस पावसाचा खंड असल्याने मध्यम व हलक्या स्वरुपाच्या जमिनीतील पीक धोक्यात आले आहे.