शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण करणार सौर स्मार्ट स्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 20:46 IST

Amravati News आजतागायत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. परिणामी वन्यजीव आणि वन विभागाकडून कर्मचाऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणारी स्मार्ट स्टिक वापरण्याचा प्रस्ताव आहे.

ठळक मुद्देमानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष रोखता येणार

अमरावती : काही दिवसांपूर्वी ताडोबा अभयारण्यात माया नामक वाघिणीने महिला वनरक्षक स्वाती यांच्यावर अचानक हल्ला चढविला आणि जंगलात फरपटत नेऊन यमसदनी धाडले. आजतागायत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे जंगलात अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. परिणामी वन्यजीव आणि वन विभागाकडून कर्मचाऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणारी स्मार्ट स्टिक वापरण्याचा प्रस्ताव आहे.

मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष हा जगातील प्रजातीच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी मुख्य धोक्यांपैकी एक आहे, असे वर्ल्ड फंड फॉर नेचर (डब्ल्यू डब्ल्यृू एफ) आणि युनायटेड एन्व्हायर्नमेंट प्राेग्राम (यूएनईपी) यांनी ८ जुलै २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या नवीन अहवालात स्पष्ट केले आहे. राज्यात २०२० मध्ये मानव-वन्यजीव संघर्षात ८८ मानवी मृत्यूंसह अर्थव्यवस्था, मानवी आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण व पर्यावरणावर परिणाम जाणवला. २०१७ ते २०२० या कालावधीत संघर्ष दुप्पट झाला. यात ५४ लोक मारल्या गेले. ४.३२ कोटी नुकसान भरपाई दिली. बिबट्याच्या हल्ल्यात ३२ आणि वाघांच्या हल्ल्यात ३८ जणांचा मृत्यू झाला. वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यामुळे जंगल आणि व्याघ्र प्रकल्पात फिल्डवर काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना सौरऊर्जेवरील ही स्मार्ट स्टिक उपयोगी ठरणार आहे.

अशी आहे सोलर स्मार्ट स्टिक

ही एक बहुउद्देशीय सौरऊर्जेवर चालणारी स्मार्ट स्टिक आहे. जी कठीण प्रदेशात गिर्यारोहण आणीबाणीच्या परिस्थितीत वापरली जाऊ शकते. ती स्टन नगसह सुसज्ज आहे. जी कोणत्याही वन्य प्राण्यांशी धोकादायक चकमक झाल्यास एक शक्तिशाली सर्वात सुरक्षित स्वसंरक्षण प्रदान करू शकते. ती वजनाने खूप हलकी आणि बळकट आहे. जंगल, डोंगराळ, खडकाळ, मैदानी, मार्श, रेंजर्स, वनरक्षक आदींसाठी उपयुक्त आहे.

- वन अधिकाऱ्यांना जंगलात पाहणी, पायवाट, गस्त किंवा वन्यजीवांच्या हल्ल्यापासून संरक्षण करता येईल

- वनरक्षक या स्मार्ट स्टिकमधील पॅनिक बटण वापरून मदतीसाठी सतर्क होऊ शकतात.

- गस्तीच्या वेळी या स्मार्ट स्टिकवरील विविध मोडमधील लाईट्सचा वापर मार्गशोधक म्हणून करू शकतात

 

मानव- वन्यजीव संघर्षाच्या घटना दुर्देवी आहेत. यात वनअधिकारी, कर्मचारी बळी गेले आहेत.

त्यामुळे आता जंगलात संरक्षणाच्या दृष्टिने सौर उर्जेवरील स्मार्ट स्टिक वापरण्याचे प्रस्तावित आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव, महाराष्ट्र

टॅग्स :wildlifeवन्यजीव