शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

'...म्हणून शरद पवार, अशोक चव्हाणांची निवडणुकीतून माघार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 17:49 IST

देशात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवा बघून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या दोन्ही कॅप्टननी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची टीका अमरावतीत युतीचा विभागीय पदाधिकारी मेळावा

अमरावती : देशात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवा बघून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या दोन्ही कॅप्टननी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.

राज्यात भाजप-शिवसेना यांच्यात महायुती झाल्यानंतर पहिला विभागीय कार्यकर्ता मेळावा अमरावतीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शक म्हणून बोलत होते. युती का झाली, हा प्रश्न विरोधकांना गोंधळात टाकणारा आहे. मात्र, ही युती सत्तेसाठी नव्हे तर राष्ट्रीयत्त्वासाठी झाली आहे. युती होऊ नये, ही विरोधकांची मनोमन इच्छा होती. परंतु, आता युती झाली असून ती अजोड असेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

मोदी व राज्य सरकारने केलेली विविध विकास कामे, योजनांचा पाढा त्यांनी वाचला. केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजना, विकास कामांमुळे विरोधक लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची टीका त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा लढविणार असे जाहीर केले. पण, आता पवारांनी माघार घेतली. नांदेडमधून अशोक चव्हाण यांनीसुद्धा निवडणूक लढविणार नसून त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी लढणार असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार को हवा का रूख पता चलता है, असे म्हटले होते ते त्याचमुळे.अजित पवार तुम्ही कोठे आहात?तुम्ही जन्माला यायच्या पूर्वी शरद पवार हे राजकारणात आहेत, अशी टीका मध्यंतरी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी कॉन्व्हेंट, प्राथमिक शाळा, महाविद्यालय, आमदारकी अन मुख्यमंत्रीपदाची परीक्षा उत्तीर्ण केली. मी सर्वच परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. अजित पवार, तुम्ही कोठे आहात? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी चिचारताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस