शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील वाघांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर, शिकारीसाठी स्थानिकांची मिळते मदत

By गणेश वासनिक | Updated: July 28, 2023 22:43 IST

काही दिवसांपूर्वी वाघांच्या शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त

गणेश वासनिक, अमरावती: दिल्ली वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने २९ जून २०२३ रोजी दिलेल्या निर्देशानुसार मेळघाट आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्त चमू तसेच पोलिसांच्या संयुक्त चमुने २३ जुलै २०२३ रोजी गडचिरोलीजवळच्या आंबेशिवणी येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित ठिकाणी धाडसत्र राबविले. यात वाघांच्या शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य, धारदार शस्त्रे, तीन वाघ नखे व ४६ हजार रूपये रोख जप्त करण्यात आले. यावेळी संशयित सहा पुरुष, पाच महिला, पाच लहान मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

यापूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मध्य प्रदेशातील कटनी येथील बहेलिया टोळी वाघ तस्करीत सामील होती. मात्र, मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईने बहेलिया टोळीला जेरबंद करून कारागृहात रवानगी करण्तात आली. तेव्हापासून मेळघाटात वाघांच्या शिकारी थांबल्या आहेत. मात्र आता आसाम, हरियाणा, तेलंगाणा ते पंजाब राज्यातील बावरीया टोळीने वाघ तस्करीचे जाळे विणले आहेत. या टोळीचे चंद्रपूर, गडचिरोली पर्यंत कनेक्शन असून, स्थानिकांच्या मदतीने वाघ शिकारीची माेहीम फत्ते करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन आवश्यक

व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन रखडल्याने वाघांचे संवर्धन, संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अद्यापही १० गावांचे पुनर्वसन झाले नसून ५५ कोटी निधीची गरज आहे. पेंच मध्ये ११० लोकसंख्येच्या फुलझरी या गावचे पुनर्वसन रखडले आहे. ५७ जणांचा पुनर्वसनाला नकार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २४४ कुटुंब संख्या असलेल्या रानतडोदी या गावचे पुनर्वसन थांबले आहे.

व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी निधीची कमतरता नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आतापर्यत पाच गावांचे पुनर्वसन झाले आहे. एकमात्र रानतडोदी हे गाव राहिले असून, पावसाअभावी ते थांबले आहे. पुनर्वसन करताना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा देण्याकडे भर आहे. -जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा-अधारी व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :TigerवाघTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प