शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:19 IST

अमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. या ग्रामपंचायतींच्या जानेवारीत मतदान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच गटागटांची ...

अमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. या ग्रामपंचायतींच्या जानेवारीत मतदान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच गटागटांची तयारी सुरू झाली आहे. या सार्वत्रिक निवडणुकांचा जिल्ह्यातील तब्बल ५५३ ग्रामपंचायतींमध्ये धुराळा उडणार आहे.

जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ५५३ ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे. त्यांची प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने निवडणुका असलेल्या गावांत गावस्तरावर गटागटांची रणनीती ठरविली जात आहे. त्याकरिता गावस्तरीय नेत्यांकडून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निकालाचा भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालावरही काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची व्यूहरचना आखली जात आहे.

बॉक्स

इच्छुक लागले कामाला

प्रभाग आरक्षण निश्चित झाल्याने संभाव्य उमेदवारांची यादी गटाकडून तयार होऊ लागली आहे. इच्छुकांनीही तयारी चालविली आहे. पक्षीय पातळीपेक्षा प्रत्यक्ष स्थानिक गटाला अधिक महत्त्व जरी असले तरी स्थानिक प्रतिष्ठा आणि अस्तित्वासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांना या निवडणुकीसाठी कंबर कसावी लागणार आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

बॉक़्स

सुटीच्या दिवशीही स्वीकारणार हरकती, सूचना

माहे एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित तसेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत मदुत संपलेल्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रभाग प्रारुप मतदार यादी १ डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. यावर हरकती व सूचना १ ते ५ डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १० डिसेंबर रोजी प्रसिध्द केली जाईल. मतदार यादीवरील हरकती व सूचना स्वीकारण्यासाठीच्या कालावधीत आलेल्या सुटीच्या दिवशी तहसील कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करून हरकती व सूचना स्वीकारण्यात याव्यात, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक यंत्रणेला दिले आहेत.