शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

सुटीच्या दिवशी कार्यरत पोलिसांना तुटपुंजे वेतन

By admin | Updated: December 18, 2014 22:47 IST

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबराब राबणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावण्यासाठी तुटपुंजे वेतन देऊन बोळवण केली जात आहे.

चांदूरबाजार : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबराब राबणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावण्यासाठी तुटपुंजे वेतन देऊन बोळवण केली जात आहे. त्यामुळे पोलीस दलात राज्य शासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. राज्य शासनाच्या विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विविध ठिकाणी राजकीय पदावर मिरविणारे पदाधिकारी जनसेवेच्या नावाने लाखो रूपयांचा मलिदा लाटत आहेत. मात्र राज्य शासन पोलीस कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या नावाने सुटीच्या दिवशीही कर्तव्य बजावण्यास लावून तुटपुंजे वेतन देऊन त्यांची बोळवण करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही एक साप्ताहित सुटी असते. वर्षभरात त्यांना हक्काच्या ४८ सुट्या असतात. मात्र राज्यभरातील २ लाख पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतत कुठे ना कुठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने हक्काची सुटी उपभोगता येत नाही. हकाच्या सुट्यांपैकी केवळ दहा ते पंधरा सुट्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासोबत घालवावयास मिळतात. अन्य सुटीच्या दिवशी त्यांना कर्तव्यावर राहणे भाग पडते.पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या पोलीस अधिकाऱ्यांना सुटीच्या दिवशी कर्तव्यावर असल्यास त्यांना फक्त ११० रूपये वेतन दिले जाते तर सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार या पदावरील पोलीस कर्मचाऱ्यांना ८० ते ९० रूपये वेतन दिले जाते. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक या पदावरील पोलीस कर्मचाऱ्यांना ६८ रूपये वेतन दिले जाते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत वेतनाबद्दल कोणताही उल्लेख नाही. नियमानुसार या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या महिन्याच्या वेतनातील दिवसाप्रमाणे वेतन आकारणे आवश्यक आहे. त्यात सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांसाठी २ हजार ३३० रूपये, सहायक पोलीस निरीक्षक २ हजार २८२, पोलीस उपनिरीक्षक २ हजार २५० रूपये, सहायक पोलीस उपनिरीक्षक १ हजार ३२४ रूपये, पोलीस हवालदार १ हजार ३२० रूपये, पोलीस कॉन्स्टेबल १ हजार २८८ रूपये तर पोलीस नाईक १ हजार ३१० रूपये याप्रमाणे सुटीच्या दिवशीचा पगार मिळणे अपेक्षित असताना राज्य शासन मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून त्यांना सुटीच्या दिवशी कर्तव्यावर राबवून दोन वेळचे जेवणही मिळणार नाही एवढे अल्प वेतन देऊन पोलीस कर्मचाऱ्यांची बोळवण करीत असल्याचे दिसते.संचारबंदीच्या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळप्रसंगी पाणी व अन्नाचीही चणचण असते. अशाही परिस्थितीत ते रात्रंदिवस राबतात. अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुटीच्या दिवशी कर्तव्यावर राबण्याचे तुटपुंजे वेतन देणे कितपत योग्य आहे याचा विचार राज्य शासन केव्हा करेल, अशी प्रतिक्रिया पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)