शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सुटीच्या दिवशी कार्यरत पोलिसांना तुटपुंजे वेतन

By admin | Updated: December 18, 2014 22:47 IST

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबराब राबणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावण्यासाठी तुटपुंजे वेतन देऊन बोळवण केली जात आहे.

चांदूरबाजार : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबराब राबणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावण्यासाठी तुटपुंजे वेतन देऊन बोळवण केली जात आहे. त्यामुळे पोलीस दलात राज्य शासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. राज्य शासनाच्या विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विविध ठिकाणी राजकीय पदावर मिरविणारे पदाधिकारी जनसेवेच्या नावाने लाखो रूपयांचा मलिदा लाटत आहेत. मात्र राज्य शासन पोलीस कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या नावाने सुटीच्या दिवशीही कर्तव्य बजावण्यास लावून तुटपुंजे वेतन देऊन त्यांची बोळवण करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही एक साप्ताहित सुटी असते. वर्षभरात त्यांना हक्काच्या ४८ सुट्या असतात. मात्र राज्यभरातील २ लाख पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतत कुठे ना कुठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने हक्काची सुटी उपभोगता येत नाही. हकाच्या सुट्यांपैकी केवळ दहा ते पंधरा सुट्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासोबत घालवावयास मिळतात. अन्य सुटीच्या दिवशी त्यांना कर्तव्यावर राहणे भाग पडते.पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या पोलीस अधिकाऱ्यांना सुटीच्या दिवशी कर्तव्यावर असल्यास त्यांना फक्त ११० रूपये वेतन दिले जाते तर सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार या पदावरील पोलीस कर्मचाऱ्यांना ८० ते ९० रूपये वेतन दिले जाते. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक या पदावरील पोलीस कर्मचाऱ्यांना ६८ रूपये वेतन दिले जाते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत वेतनाबद्दल कोणताही उल्लेख नाही. नियमानुसार या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या महिन्याच्या वेतनातील दिवसाप्रमाणे वेतन आकारणे आवश्यक आहे. त्यात सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांसाठी २ हजार ३३० रूपये, सहायक पोलीस निरीक्षक २ हजार २८२, पोलीस उपनिरीक्षक २ हजार २५० रूपये, सहायक पोलीस उपनिरीक्षक १ हजार ३२४ रूपये, पोलीस हवालदार १ हजार ३२० रूपये, पोलीस कॉन्स्टेबल १ हजार २८८ रूपये तर पोलीस नाईक १ हजार ३१० रूपये याप्रमाणे सुटीच्या दिवशीचा पगार मिळणे अपेक्षित असताना राज्य शासन मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून त्यांना सुटीच्या दिवशी कर्तव्यावर राबवून दोन वेळचे जेवणही मिळणार नाही एवढे अल्प वेतन देऊन पोलीस कर्मचाऱ्यांची बोळवण करीत असल्याचे दिसते.संचारबंदीच्या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळप्रसंगी पाणी व अन्नाचीही चणचण असते. अशाही परिस्थितीत ते रात्रंदिवस राबतात. अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुटीच्या दिवशी कर्तव्यावर राबण्याचे तुटपुंजे वेतन देणे कितपत योग्य आहे याचा विचार राज्य शासन केव्हा करेल, अशी प्रतिक्रिया पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)