शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

भीषण आगीत सहा कुटुंब उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:35 IST

स्थानिक आदिवासीनगरात गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सहा कुटुंबीयांची घरे जळून खाक झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले. अग्निशमन दलाने अथक परिश्रमातून चार तासांनंतर आग नियंत्रणात आणली. मात्र, या आगीत सहा घरांतील सर्व साहित्य भस्मसात झाले.

ठळक मुद्देपत्र्याच्या घरांची राखरांगोळीआदिवासी नगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक आदिवासीनगरात गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सहा कुटुंबीयांची घरे जळून खाक झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले. अग्निशमन दलाने अथक परिश्रमातून चार तासांनंतर आग नियंत्रणात आणली. मात्र, या आगीत सहा घरांतील सर्व साहित्य भस्मसात झाले.हॉटेल महफील लगतच्या आदिवासीनगरात नाल्याच्या काठावर टिनांची घरे बांधून काही नागरिक वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री १ च्या सुमारास तेथील प्रमोद उईके नामक मुलगा लघुशंकेसाठी घराबाहेर निघाला असता, त्याला एका घराच्या मागील बाजूला लागलेल्या प्लास्टिकच्या पन्नीला आग लागल्याचे दिसले. प्रमोदने तात्काळ तेथील रहिवाशांना झोपेतून उठवून घटनेची माहिती दिली. त्यामुळे झोपलेली सर्व कुटुंबे घराबाहेर पडली.दरम्यान, काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने तेथील दिनेश धुर्वे, विनोद उईके, शंतनु धुर्वे, इंदिरा पेंदाम, राजू धुर्वे व अशोक पुरके यांची घरे आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेच्या माहितीवरून अत्यंत अरुंद रस्त्यावरून अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली. त्यांनी तात्काळ आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. तरीसुद्धा तीन ते चार तासांपर्यंत हा आगीचा तांडव सुरूच होता. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमनला यश मिळाले.पुन्हा सावरण्याचे प्रयत्नआगीत दिनेश धुर्वे, विनोद उईके, शंतनु धुर्वे, इंदिरा पेंदाम, राजू धुर्वे व अशोक पुरके यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शुक्रवारी सर्व कुटुंबीय आपआपल्या जळालेल्या घराचे निरीक्षण करून, पुन्हा संसार कसा सावरावा, या चिंतेत बसले होते. चिमुकल्या मुली आपल्या शालेय पुस्तकांचा शोध घेत होते. काही जण जळालेल्या छायाचित्रांना न्याहाळत होते. संसार कसा पुन्हा उभा राहील, याची चिंंता सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.तीन सिलिंडरचा स्फोटभीषण आगीत लागोपाठ तीन स्फोटाचे आवाज नागरिकांना आले. ते सिलिंडरचे होते. आगीचे तांडव पाहून आजूबाजूच्यांनी आपआपल्या घरातील सिलिंडर सुरक्षित ठिकाणी हलविली.दाहक अनुभवआगीचे लोळ ३० फूट उंचीपर्यंत उठल्याचे नागरिक सांगत आहे. आगीच्या रौद्र रूपामुळे शेजारी चिंतेत पडले होते. दरम्यान शेजाऱ्यांच्या घरापर्यंत आगीची दाहकता पोहोचल्यामुळे तेथेही आग लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, धनराज कुंभरे यांच्याकडील एमएच २७ वाय ६४२२ या क्रमांकाची दुचाकी एका बाजूने जळाली.