शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

भीषण आगीत सहा कुटुंब उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:35 IST

स्थानिक आदिवासीनगरात गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सहा कुटुंबीयांची घरे जळून खाक झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले. अग्निशमन दलाने अथक परिश्रमातून चार तासांनंतर आग नियंत्रणात आणली. मात्र, या आगीत सहा घरांतील सर्व साहित्य भस्मसात झाले.

ठळक मुद्देपत्र्याच्या घरांची राखरांगोळीआदिवासी नगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक आदिवासीनगरात गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सहा कुटुंबीयांची घरे जळून खाक झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले. अग्निशमन दलाने अथक परिश्रमातून चार तासांनंतर आग नियंत्रणात आणली. मात्र, या आगीत सहा घरांतील सर्व साहित्य भस्मसात झाले.हॉटेल महफील लगतच्या आदिवासीनगरात नाल्याच्या काठावर टिनांची घरे बांधून काही नागरिक वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री १ च्या सुमारास तेथील प्रमोद उईके नामक मुलगा लघुशंकेसाठी घराबाहेर निघाला असता, त्याला एका घराच्या मागील बाजूला लागलेल्या प्लास्टिकच्या पन्नीला आग लागल्याचे दिसले. प्रमोदने तात्काळ तेथील रहिवाशांना झोपेतून उठवून घटनेची माहिती दिली. त्यामुळे झोपलेली सर्व कुटुंबे घराबाहेर पडली.दरम्यान, काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने तेथील दिनेश धुर्वे, विनोद उईके, शंतनु धुर्वे, इंदिरा पेंदाम, राजू धुर्वे व अशोक पुरके यांची घरे आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेच्या माहितीवरून अत्यंत अरुंद रस्त्यावरून अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली. त्यांनी तात्काळ आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. तरीसुद्धा तीन ते चार तासांपर्यंत हा आगीचा तांडव सुरूच होता. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमनला यश मिळाले.पुन्हा सावरण्याचे प्रयत्नआगीत दिनेश धुर्वे, विनोद उईके, शंतनु धुर्वे, इंदिरा पेंदाम, राजू धुर्वे व अशोक पुरके यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शुक्रवारी सर्व कुटुंबीय आपआपल्या जळालेल्या घराचे निरीक्षण करून, पुन्हा संसार कसा सावरावा, या चिंतेत बसले होते. चिमुकल्या मुली आपल्या शालेय पुस्तकांचा शोध घेत होते. काही जण जळालेल्या छायाचित्रांना न्याहाळत होते. संसार कसा पुन्हा उभा राहील, याची चिंंता सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.तीन सिलिंडरचा स्फोटभीषण आगीत लागोपाठ तीन स्फोटाचे आवाज नागरिकांना आले. ते सिलिंडरचे होते. आगीचे तांडव पाहून आजूबाजूच्यांनी आपआपल्या घरातील सिलिंडर सुरक्षित ठिकाणी हलविली.दाहक अनुभवआगीचे लोळ ३० फूट उंचीपर्यंत उठल्याचे नागरिक सांगत आहे. आगीच्या रौद्र रूपामुळे शेजारी चिंतेत पडले होते. दरम्यान शेजाऱ्यांच्या घरापर्यंत आगीची दाहकता पोहोचल्यामुळे तेथेही आग लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, धनराज कुंभरे यांच्याकडील एमएच २७ वाय ६४२२ या क्रमांकाची दुचाकी एका बाजूने जळाली.