शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पश्चिम विदर्भातील मोठ्या तीन प्रकल्पांची १८ दारे उघडली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 22:53 IST

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग : प्रकल्पावर पर्याटकांची गर्दी 

अमरावती : गेल्या चार दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याचा येवा सुरूच असून त्यामुळे पश्चिम विदर्भातील तीन मोठ्या प्रकल्पांची एकूण १८ दारे आठवडाभरात उघडण्यात आली आहेत. पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी धरण परिसरात पर्याटकांची गर्दी उसळली आहे.

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा हा मोठा प्रकल्प दोन आठवड्यापूर्वीच शंभर टक्के भरला आहे. धरणाचे १३ दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहे. २१३ घ.मी. प्रतिसेंकदने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पसुद्धा शंभर टक्के भरला असून दोन दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आली अआहेत. २०.७३ घ.मी प्रतिसेंकदाने त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. बुलडाणा जिल्ह्याला गतवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. परंतु यंदा पेनटाकळी प्रकल्पात ९९.८२ टक्के पाणीसाठा झाल्याने तीन गेट १५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. ४७.८८ घ.मी प्रतिसेंकदने पाण्याचा विसर्ग होत आहे. नळगंगा प्रकल्पात ६३.८८ टक्के, तर खडकपूर्णा प्रकल्पात ९४.४० टक्के पाणीसाठा झाल्याने यंदा पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ९९.८३ टक्के, तर काटेपूर्णा प्रकल्पात ४९.३६ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ६३.८८ टक्के, तर अरुणावती प्रकल्पात फक्त १५.४८ टक्के  पाणीसाठा आहे. एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८२.१० टक्के पाणीसाठा आहे, अशी नोंद रविवारी सकाळी जलसंपदा विभागाने घेतली आहे.

टॅग्स :amravati-pcअमरावतीDamधरण