शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गिळंकृत वन जमिनींचा शोध घेण्यासाठी 'एसआयटी' गठीत पण गुंता सुटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:43 IST

'महसूल'ची कासवगती : विशेष जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर वनेतर कामांसाठी वापरण्यात आलेल्या वनजमिनी परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता राज्य शासनाने एसआयटी गठित केली असून, गिळंकृत वन जमिनींचा शोध घेण्यासाठी ६० दिवसांची डेडलाइन आहे. मात्र, गेल्या ४५ दिवसांत वन जमिनींचा शोध घेण्यासाठी 'महसूल'ने कोणतेही पाऊल उचलले नाही. आता केवळ १५ दिवस शिल्लक असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होणार की नाही?, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

वन (संवर्धन) अधिनियम १९८० लागू होण्यापूर्वी महसूल विभागाने मोठ्या प्रमाणात वनजमिनी वनेतर कामांसाठी अर्थात महसूल विभागावर आहे. वळविल्या होत्या. या जमिनींवर आज शेती, फार्महाउस, अपार्टमेंट आणि विविध इमारती उभ्या आहेत. २०१६ पासून महसूल विभागाने या गैरवापराकडे चालढकलची भूमिका घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने अखेर सक्तीचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य शासनाला विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करावे लागले. या समितीला १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत शिफारशींसह सूक्ष्म अहवाल शासनाकडे सादर करण्याची 'डेडलाइन' आहे. 

महसूल विभागावर विशेष जबाबदारी १९८० पूर्वी महसूल विभाग अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वन जमिनींचे वाटप केले आहे. या जमिनींचा वैधानिक दर्जा काढण्याची जबाबदारी 'महसूल'ची होती. मात्र, गत ४५ वर्षांनंतरही वाटप केलेल्या वन जमिनींचा दर्जा हा राखीव आणि संरक्षित वने असा कायम आहे. त्यावेळी एका कागदावर वनजमिनी वाटप झालेल्या आहेत. त्यामुळे या वनजमिनी पुन्हा परत आणण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी अर्थात महसूल विभागावर आहे. 

'एसआयटी'च्या अहवालाकडे लक्ष

शासन आदेशानुसार २५ ऑक्टोबर १९८० पूर्वी महसूल विभागाने वाटप केलेल्या वनजमिनी वन विभागास परत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. असे वनक्षेत्र तातडीने वन विभागाकडे हस्तांतरण करणे शक्य आहे अथवा नाही? याचे स्पष्टीकरण 'एसआयटी'ला द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता 'एसआयटी'च्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

'सर्वोच्च' निर्णयानंतर राज्य शासन हलले

  • सर्वोच्च न्यायालयाने १५ मे २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, महसूल विभागाने इतर कामांसाठी वळविलेले वनक्षेत्र पुन्हा वन विभागाच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे.
  • मात्र, काही प्रकरणांमध्ये हे वनक्षेत्र परत देणे शक्य नसल्यास, संबंधित व्यक्तीकडून त्याचे मूल्य वसूल करून त्या क्षेत्राचा वैधानिक दर्जा बदलावा, असा पर्याय विचाराधीन आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना होऊ नये, यासाठी शासनाने ही एसआयटी गठित केली आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : SIT formed to find encroached forest land, complications remain unresolved.

Web Summary : Maharashtra's SIT struggles to recover forest lands diverted before 1980, facing a tight deadline. Revenue department inaction raises concerns about compliance with Supreme Court orders to return land or collect its value. The SIT report is eagerly awaited.
टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलAmravatiअमरावती