शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
3
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
4
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
5
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
6
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
7
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
8
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
9
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
10
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
11
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
12
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
14
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
15
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
16
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; एक तरुण आला आणि...
17
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
18
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
19
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
20
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?

अकबरकालीन डाक व्यवस्थेच्या खुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

अचलपूर हे ऐतिहासिक शहर. पूर्वीपासून राजकीय आणि राजधानीचे शहर. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अचलपूरहून बऱ्हाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. मुगल साम्राज्याच्या बदलानंतर अचलपूर नेहमी निजाम-उल-मुल्कच्या बाजूने राहिले. निजामशाही (हैद्राबाद) च्या स्थापनेनंतर अचलपूर नवाबी शहर म्हणून पुढे आले.

ठळक मुद्देअचलपूर : फरमानपुरा, कासदपुऱ्याला वेगळेच महत्त्व

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अकबराच्या डाक व्यवस्थेतील खुणा आजही अचलपुरात बघायला मिळतात. यात अचलपुरातील फरमानपुरा, कासदपुरा आणि संदेशवाहक ‘हूमर’ कबुतराला वेगळेच महत्त्व प्राप्त आहे.११५० मध्ये बगदादच्या सुलतानाने कबुतरांच्या माध्यमातून डाक व्यवस्था सुरूकेली. चंगीजखान याच्या राज्यविस्ताराच्या धोरणाबरोबर पुढे हा डाकखाना विस्तारित झाला. सम्राट अकबराने मात्र या डाकव्यवस्थेला प्रशासनात रीतसर समाविष्ट केले. यात पत्र पाठविण्याकरिता, संदेशवहनाकरिता इराणी कबुतरांचा वापर केला जायचा. या कबुतराला हूमर म्हटले जायचे. या हूमर कबुतराची चोच जाड-मोठी असते. हे कबुतर पन्नास किलोमीटरपर्यंत संदेश, पत्र घेवून जायचे. हे हूमर कबुतर आजही अचपूर शहरात बघायला मिळतात. शौकिनांनी ते पाळले आहेत.अचलपूर हे ऐतिहासिक शहर. पूर्वीपासून राजकीय आणि राजधानीचे शहर. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अचलपूरहून बऱ्हाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. मुगल साम्राज्याच्या बदलानंतर अचलपूर नेहमी निजाम-उल-मुल्कच्या बाजूने राहिले. निजामशाही (हैद्राबाद) च्या स्थापनेनंतर अचलपूर नवाबी शहर म्हणून पुढे आले. यात संदेशवहन व मनोरंजनाकरिता मोठ्या प्रमाणात कबुतरांचा वापर होत होता. त्याकाळी राजा, सुलतान, नवाब यांच्या आदेशाला फर्मान म्हटले जायचे. जेथून फर्मान सोडले जायचे, तो म्हणजे फर्मानपूरा. हे फर्मान पोहचविण्याचे काम काशीद करायचे. काशीद पूर्वी संदेश पायी पोहचवित. काशिदांनी ही पारंपरिक पद्धत नाकारली आणि कबुतरांच्या माध्यमातून संदेशवहन सुरू केले. काशीद जिथे राहायचे, तो कासदपुरा. दोन्ही भाग एकमेकांना खेटून आहेत. जुन्या राजधान्यांमध्ये फर्मानपुरा आणि काशीदपुरा या जागा मिळतात. लखनौ (उत्तरप्रदेश), बिदर (कर्नाटक), भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ते आहेत. यामुळे अचलपूरचे महत्त्व अधोरेखित होत आहे.अकबराच्या डाक व्यवस्थेत २० हजार कबुतरे होती. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेत अचलपूरहून बºहाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. आज या व्यवस्थेच्या उल्लेख व ऐतिहासिक खुना फत्तेपुरा शिक्रीला बघायला मिळतात.- अनिरुद्ध पाटीलइतिहासक अभ्यासक, अमरावती

टॅग्स :Socialसामाजिक