शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अकबरकालीन डाक व्यवस्थेच्या खुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

अचलपूर हे ऐतिहासिक शहर. पूर्वीपासून राजकीय आणि राजधानीचे शहर. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अचलपूरहून बऱ्हाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. मुगल साम्राज्याच्या बदलानंतर अचलपूर नेहमी निजाम-उल-मुल्कच्या बाजूने राहिले. निजामशाही (हैद्राबाद) च्या स्थापनेनंतर अचलपूर नवाबी शहर म्हणून पुढे आले.

ठळक मुद्देअचलपूर : फरमानपुरा, कासदपुऱ्याला वेगळेच महत्त्व

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अकबराच्या डाक व्यवस्थेतील खुणा आजही अचलपुरात बघायला मिळतात. यात अचलपुरातील फरमानपुरा, कासदपुरा आणि संदेशवाहक ‘हूमर’ कबुतराला वेगळेच महत्त्व प्राप्त आहे.११५० मध्ये बगदादच्या सुलतानाने कबुतरांच्या माध्यमातून डाक व्यवस्था सुरूकेली. चंगीजखान याच्या राज्यविस्ताराच्या धोरणाबरोबर पुढे हा डाकखाना विस्तारित झाला. सम्राट अकबराने मात्र या डाकव्यवस्थेला प्रशासनात रीतसर समाविष्ट केले. यात पत्र पाठविण्याकरिता, संदेशवहनाकरिता इराणी कबुतरांचा वापर केला जायचा. या कबुतराला हूमर म्हटले जायचे. या हूमर कबुतराची चोच जाड-मोठी असते. हे कबुतर पन्नास किलोमीटरपर्यंत संदेश, पत्र घेवून जायचे. हे हूमर कबुतर आजही अचपूर शहरात बघायला मिळतात. शौकिनांनी ते पाळले आहेत.अचलपूर हे ऐतिहासिक शहर. पूर्वीपासून राजकीय आणि राजधानीचे शहर. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अचलपूरहून बऱ्हाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. मुगल साम्राज्याच्या बदलानंतर अचलपूर नेहमी निजाम-उल-मुल्कच्या बाजूने राहिले. निजामशाही (हैद्राबाद) च्या स्थापनेनंतर अचलपूर नवाबी शहर म्हणून पुढे आले. यात संदेशवहन व मनोरंजनाकरिता मोठ्या प्रमाणात कबुतरांचा वापर होत होता. त्याकाळी राजा, सुलतान, नवाब यांच्या आदेशाला फर्मान म्हटले जायचे. जेथून फर्मान सोडले जायचे, तो म्हणजे फर्मानपूरा. हे फर्मान पोहचविण्याचे काम काशीद करायचे. काशीद पूर्वी संदेश पायी पोहचवित. काशिदांनी ही पारंपरिक पद्धत नाकारली आणि कबुतरांच्या माध्यमातून संदेशवहन सुरू केले. काशीद जिथे राहायचे, तो कासदपुरा. दोन्ही भाग एकमेकांना खेटून आहेत. जुन्या राजधान्यांमध्ये फर्मानपुरा आणि काशीदपुरा या जागा मिळतात. लखनौ (उत्तरप्रदेश), बिदर (कर्नाटक), भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ते आहेत. यामुळे अचलपूरचे महत्त्व अधोरेखित होत आहे.अकबराच्या डाक व्यवस्थेत २० हजार कबुतरे होती. औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेत अचलपूरहून बºहाणपूरला पत्रव्यवहार होत असे. याकरिता कबुतर आणि काशीद यांचा वापर केला जायचा. आज या व्यवस्थेच्या उल्लेख व ऐतिहासिक खुना फत्तेपुरा शिक्रीला बघायला मिळतात.- अनिरुद्ध पाटीलइतिहासक अभ्यासक, अमरावती

टॅग्स :Socialसामाजिक