शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

शेतकरी संघटनेचे कृषी कार्यालयाला घेराव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

वनोजा बाग/अंजनगाव सुर्जी : तालुक्यात अतिवृष्टीने सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सदर पिकाचा ...

वनोजा बाग/अंजनगाव सुर्जी : तालुक्यात अतिवृष्टीने सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सदर पिकाचा विमा भरूनही आजपर्यंत शेतकऱ्यांना सरकार व विमा कंपनीकडून लाभ मिळाला नाही. यामुळे शेतकरी संघटनेने १४ सप्टेंबर रोजी कृषी कार्यालयाला घेराव घातला होता. या आंदोलनात शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

विम्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देण्यात आली. रास्ता रोको आंदोलनसुद्धा करण्यात आले. परंतु, या मागणीला सरकारने व विमा कंपनीने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या अंजनगाव सुर्जी शाखेच्यावतीने १४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने दुपारी १ ते ५ या वेळेत कृषी कार्यालयाला घेराव घालण्यात आला. या घेराव सभेत कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीही मार्गदर्शन करताना विमा परतावा देताना लावण्यात येणारे निकष याबाबत माहिती दिली. सात वर्षांचे उंबरठा उत्पन्न, सरासरी व वातावरण बदल या सर्व बाबी गृहीत धरून निकष लावले जातात. त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांना विमा मिळूच नये, अशाच निकषावर जोर दिला जातो. संघटनेकडून यावर आक्षेप घेण्यात आला.

गतवर्षी सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान होऊनसुद्धा विम्याचा लाभ मिळाला नाही. यामुळे प्रत्येक मौजाचे पंचनामे कृषी विभागाकडून मागण्यात आले आहेत. पंचनामे खोटे आढळल्यास न्यायालयीन कारवाई करण्याचे संकेत शेतकरी संघटनेने दिले. मोबाइल कंपन्यांच्या सेवेमुळे ठिकाणी रेंज मिळत नाही. त्यामुळे ई-पीक पाहणीसह ऑनलाईन कामे शेतकऱ्यांवर लादू नये, असे जिल्हाध्यक्ष माधवराव गावंडे म्हणाले.

घेराव आंदोलनात तालुकाध्यक्ष संजय हाडोळे, स्वभापचे तालुकाध्यक्ष गजानन पाटील दुधाट , विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील साबळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद दाळू, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर हुरबडे, ग्रामगीताचार्य मनोहर रेचे, हभप सुरेश मानकर, माजी तालुकाप्रमुख अशोक गिते यांनी पीक विम्यावर शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. किशोर काळमेघ, देविदास ढोक, संजय हिंगे, बाबूराव साबळे, ओमप्रकाश मुरतकर, अच्युतराव गोबरे, विलास धुमाळे, जगदीश पोटे, वामनराव पवार, प्रभाकर अण्णा गावनेर, भाऊराव साबळे, भास्करराव मोरे, ज्ञानेश्वर वानखडे, गणेश चिंचोळकर, हरिभाऊ गोळे, अरुण गोंडचोर, शरद बहादुरे, नितीन खडसे, मधुकर मोरे, प्रसिद्धी प्रमुख अभिजित गोबरे यांनी परिश्रम घेतले.