शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

शेतकरी संघटनेचे कृषी कार्यालयाला घेराव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

वनोजा बाग/अंजनगाव सुर्जी : तालुक्यात अतिवृष्टीने सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सदर पिकाचा ...

वनोजा बाग/अंजनगाव सुर्जी : तालुक्यात अतिवृष्टीने सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सदर पिकाचा विमा भरूनही आजपर्यंत शेतकऱ्यांना सरकार व विमा कंपनीकडून लाभ मिळाला नाही. यामुळे शेतकरी संघटनेने १४ सप्टेंबर रोजी कृषी कार्यालयाला घेराव घातला होता. या आंदोलनात शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

विम्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देण्यात आली. रास्ता रोको आंदोलनसुद्धा करण्यात आले. परंतु, या मागणीला सरकारने व विमा कंपनीने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या अंजनगाव सुर्जी शाखेच्यावतीने १४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने दुपारी १ ते ५ या वेळेत कृषी कार्यालयाला घेराव घालण्यात आला. या घेराव सभेत कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीही मार्गदर्शन करताना विमा परतावा देताना लावण्यात येणारे निकष याबाबत माहिती दिली. सात वर्षांचे उंबरठा उत्पन्न, सरासरी व वातावरण बदल या सर्व बाबी गृहीत धरून निकष लावले जातात. त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांना विमा मिळूच नये, अशाच निकषावर जोर दिला जातो. संघटनेकडून यावर आक्षेप घेण्यात आला.

गतवर्षी सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान होऊनसुद्धा विम्याचा लाभ मिळाला नाही. यामुळे प्रत्येक मौजाचे पंचनामे कृषी विभागाकडून मागण्यात आले आहेत. पंचनामे खोटे आढळल्यास न्यायालयीन कारवाई करण्याचे संकेत शेतकरी संघटनेने दिले. मोबाइल कंपन्यांच्या सेवेमुळे ठिकाणी रेंज मिळत नाही. त्यामुळे ई-पीक पाहणीसह ऑनलाईन कामे शेतकऱ्यांवर लादू नये, असे जिल्हाध्यक्ष माधवराव गावंडे म्हणाले.

घेराव आंदोलनात तालुकाध्यक्ष संजय हाडोळे, स्वभापचे तालुकाध्यक्ष गजानन पाटील दुधाट , विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील साबळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद दाळू, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर हुरबडे, ग्रामगीताचार्य मनोहर रेचे, हभप सुरेश मानकर, माजी तालुकाप्रमुख अशोक गिते यांनी पीक विम्यावर शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. किशोर काळमेघ, देविदास ढोक, संजय हिंगे, बाबूराव साबळे, ओमप्रकाश मुरतकर, अच्युतराव गोबरे, विलास धुमाळे, जगदीश पोटे, वामनराव पवार, प्रभाकर अण्णा गावनेर, भाऊराव साबळे, भास्करराव मोरे, ज्ञानेश्वर वानखडे, गणेश चिंचोळकर, हरिभाऊ गोळे, अरुण गोंडचोर, शरद बहादुरे, नितीन खडसे, मधुकर मोरे, प्रसिद्धी प्रमुख अभिजित गोबरे यांनी परिश्रम घेतले.