शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा अहवाल तहसीलदारांनी मागून सुद्धा दिला नसल्याचा धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:27 IST

Amravati : तहसीलदारांच्या पत्राला पोलिसांकडून केराची टोपली? जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील मडकी येथील आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा अहवाल तहसीलदारांनी मागूनसुद्धा चिखलदरा पोलिसांनी दिला नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यामुळे आदिवासी कुटुंब मदतीपासून वंचित झाले. जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ठाणेदार व संबंधित जमादाराची बेपर्वाई पुन्हा पुढे आली आहे.

राजा मधू नाईक (३६, रा. मडकी) या शेतकऱ्याने ८ डिसेंबर रोजी वडिलांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृताची आत्महत्या असल्यास शासनाने नियमानुसार १५ दिवसांच्या आत शासकीय मदत देण्याचे दृष्टिकोनातून प्रकरणात शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मृताच्या कुटुंबातील व्यक्तींचे बयाण आदी कागदपत्रांसह अभिप्राय आठ दिवसांच्या आत खास दूतामार्फत तहसील कार्यालयाला सादर करण्याचे आदेश तहसीलदार जीवन मोरणकर यांनी ठाणेदारांना एका पत्राद्वारे व वारंवार फोन करून दिले होते.

जिल्हाधिकाऱ्यांची तीव्र नाराजीघटना घडल्यापासून आठ दिवसांच्या आत संबंधित अहवाल तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा लागतो. परंतु, अहवाल प्राप्त न झाल्याने २१ जानेवारी रोजी झालेल्या आढावा सभेत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे पत्रात नमूद आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन हे तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांचेही ऐकत नसल्याचे पुढे आले आहे.

दीड महिन्यानंतरही अहवाल नाहीदीड महिन्यानंतरी शेतकरी आत्महत्या प्रकरणी अहवाल कार्यालयाला मिळाला नसल्याचे पत्रच तहसीलदारांनी ठाणेदाराला पाठविले. त्यामुळे हा सर्व भोंगळ कारभार पुढे आला आहे.

रेट्याखेडा प्रकरणात तोच प्रकारसंबंधित जमादार व ठाणेदार यांनी आदिवासी महिलेच्या धिंड प्रकरणात फिर्यादीचे तर ऐकले नाहीच, उलट आमदारांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली गेली, हे विशेष.

"मृत शेतकऱ्याच्या अहवाल प्रकरणात चिखलदरा येथील ठाणेदारांना पत्र दिले आहे. तातडीने अहवाल पाठविण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत."- जीवन मोरणकर, तहसीलदार, चिखलदरा

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAmravatiअमरावती