शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धक्कादायक! धामणगाव तालुक्यातील २० गावांना दूषित पाण्याचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

मोहन राऊत - धामणगाव रेल्वे : पावसाळ्यात प्रत्येक ग्रामस्थाला स्वच्छ पाणी देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ...

मोहन राऊत - धामणगाव रेल्वे : पावसाळ्यात प्रत्येक ग्रामस्थाला स्वच्छ पाणी देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे तब्बल २० गावांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या गावातील पाण्याचे नमुने दूषित आल्याने आता उच्चस्तरावरून चौकशी होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी तालुकास्तरावर आढावा घेत ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर ग्रामपंचायतींनी करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखविली असल्याचे पाहायला मिळत आहे .

या गावातील पाणी नमुने आले दूषित

निंबोली परिसरातील भातकुली रेणुकापूर, बोरवघड, बोरगाव धांदे, रायपूर कासारखेड, गिरोली, विटाळा ,उसळगव्हाण, हिगणगाव, मलातपूर, वाढोणा यांसह अजनसिंगी, मंगरूळ दस्तगिर परिरातील अशा तब्बल २० गावांतील पाणी नमुने दूषित आले आहेत.

ग्रामपंचायत रेकार्डच्या नावावर लावतात बनावट बिले

धामणगाव तालुक्यात पेपरलेस ग्रामपंचायतींवर अद्यापही भर दिला जात नाही. चांदूर रेल्वे, अमरावती येथून चढ्या भावाने ग्रामपंचायतीला लागणारे रेकार्ड खरेदी केले जाते. यातच ब्लिचिंग पावडर खरेदी केल्याचे बिल लावण्यात येतात. मात्र, अशा पिशव्या मुळात आणल्या जात नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. थोड्या कमिशनसाठी काही ग्रामसेवक ग्रामस्थांच्या जिवाशी खेळतात, ही वस्तुस्थिती आहे. याविषयी दूषित पाणी नमुन्यांवरून काही जागरूक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे.

लोकप्रतिनिधी राहावे जागरूक

गावातील पाण्याची टाकी स्वच्छ आहेत का? पाणीपुरवठा कर्मचारी दररोज आरोग्य विभागाच्या निर्देशांप्रमाणे ब्लिचिंगचा वापर करतो का? ब्लिचिंग खरेदी करताना रेकार्ड खरेदीची बिले लावली जातात का? ग्रामसेवक ब्लिचिंग पावडर खरेदीत टाळाटाळ करतात का? अशा प्रश्नांविषयी सरपंच, उपसरपंच यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.

--------------------

पावसाळ्याच्या दिवसांत तथा वर्षभर ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा उपयाेग करणे आवश्यक असते. मात्र, जे ब्लिचिंगचा वापर करीत नाहीत, अशा ग्रामसेवकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

- सुनील शिसोदे, माजी उपसभापती, पंचायत समिती, धामणगाव रेल्वे

---------------

धामणगाव तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंगचा योग्य वापर होत नाही, त्यांची चौकशी करून अशा ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल.

- माया वानखडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, धामणगाव रेल्वे