शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीहून दर्यापूर मार्गे अकोल्याला प्रथमच ‘शिवशाही’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला. दृष्ट लागावी असा हा रस्ता झाल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास कुणालाही आवडेल. आतापर्यंत दर्यापूरवरून एसटी महामंडळाच्या  साधारण (लाल) बस अकोलाकरिता सुटायच्या.

ठळक मुद्देविभाग नियंत्रकाची माहिती, मंगळवारपासून फेरी, जिल्ह्यातून सहा बस धावणार

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘लाल परी’नंतर प्रवाशआंची सर्वाधिक पसंती लाभलेल्या शिवशाही बस मंगळवारपासून अमरावती मध्यवर्ती आगारातून इतर जिल्ह्यांत सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. एकूण सहा बसपैकी एक अमरावतीहून अकोल्याला दर्यापूर, म्हैसांग मार्गे प्रथमच सुरू करण्यात येत आहे. हा रस्ता ही महिन्यांपूर्वीच गुळगुळीत झाला आहे.अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला. दृष्ट लागावी असा हा रस्ता झाल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास कुणालाही आवडेल. आतापर्यंत दर्यापूरवरून एसटी महामंडळाच्या  साधारण (लाल) बस अकोलाकरिता सुटायच्या. मात्र, आता रस्ता गुळगुळीत झाल्यामुळे या मार्गावरुन प्रवासी व वाहनांची संख्या वाढली आहे. दर्यापूरहून जाणारे नोकरदार व किराणा व्यावसायिकांची बाजारपेठसुद्धा अकोला आहे. त्यामुळे शिवशाही बसला या मार्गावर प्रवासी मिळतील, हे निश्चित. मंगळवारी सकाळी ८ वाजता शिवशाही बस अमरावतीहून निघेल. ९.३० वाजता ही बस दर्यापूवरून अकोल्याला रवाना होईल. या मार्गावरील हा पहिलाच प्रयोग आहे. 

नागपूरकरिता चार शिवशाही बस अमरावती मध्यवर्ती आगारातून सहा शिवशाही बस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. यामध्ये चार शिवशाही बस नागपूरकरिता, तर दोन अकोल्याकरिता सोडल्या जातील. ॲनलॉकमध्ये प्रवासी संख्या वाढल्यानंतर बस वाढविण्यात येतील. 

पूर्वी व्हायच्या १७०० फेऱ्या कोरोनापूर्वी जिल्ह्यातील ३७५ बसच्या १६०० ते १७०० फेऱ्या व्हायच्या. यामध्ये ७३ शिवशाही बस आहेत. आता कोविड नियमावलीनुसार १५० ते २५० बस विविध मार्गांवर सोडण्यात येणार असून, त्याच्या ५०० ते ६०० फेऱ्या होणार आहेत. सोमवारपासून जिल्हा व तालुका पातळीवर बस सोडण्यात येतील. तूर्तास ग्रामीण भागात बस धावणार नसल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी स्पष्ट केले. 

एसटीला रोज ३० लाखांचा फटकाकोरोना काळापूर्वी एसटीला रोज ३० ते ३५ लाखांचे उत्पन्न मिळायचे. मात्र, पहिल्या लॉकडाऊनमध्ये सहा महिने एसटीची चाके थांबली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येसुद्धा प्रवासी नव्हते. आता अनलॉकमध्ये फक्त दोन ते तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे. एसटीला दररोज ३० ते ३२ लाखांचा फटका बसत आहे.

 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी