शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

अमरावतीहून दर्यापूर मार्गे अकोल्याला प्रथमच ‘शिवशाही’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला. दृष्ट लागावी असा हा रस्ता झाल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास कुणालाही आवडेल. आतापर्यंत दर्यापूरवरून एसटी महामंडळाच्या  साधारण (लाल) बस अकोलाकरिता सुटायच्या.

ठळक मुद्देविभाग नियंत्रकाची माहिती, मंगळवारपासून फेरी, जिल्ह्यातून सहा बस धावणार

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘लाल परी’नंतर प्रवाशआंची सर्वाधिक पसंती लाभलेल्या शिवशाही बस मंगळवारपासून अमरावती मध्यवर्ती आगारातून इतर जिल्ह्यांत सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. एकूण सहा बसपैकी एक अमरावतीहून अकोल्याला दर्यापूर, म्हैसांग मार्गे प्रथमच सुरू करण्यात येत आहे. हा रस्ता ही महिन्यांपूर्वीच गुळगुळीत झाला आहे.अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला. दृष्ट लागावी असा हा रस्ता झाल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास कुणालाही आवडेल. आतापर्यंत दर्यापूरवरून एसटी महामंडळाच्या  साधारण (लाल) बस अकोलाकरिता सुटायच्या. मात्र, आता रस्ता गुळगुळीत झाल्यामुळे या मार्गावरुन प्रवासी व वाहनांची संख्या वाढली आहे. दर्यापूरहून जाणारे नोकरदार व किराणा व्यावसायिकांची बाजारपेठसुद्धा अकोला आहे. त्यामुळे शिवशाही बसला या मार्गावर प्रवासी मिळतील, हे निश्चित. मंगळवारी सकाळी ८ वाजता शिवशाही बस अमरावतीहून निघेल. ९.३० वाजता ही बस दर्यापूवरून अकोल्याला रवाना होईल. या मार्गावरील हा पहिलाच प्रयोग आहे. 

नागपूरकरिता चार शिवशाही बस अमरावती मध्यवर्ती आगारातून सहा शिवशाही बस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. यामध्ये चार शिवशाही बस नागपूरकरिता, तर दोन अकोल्याकरिता सोडल्या जातील. ॲनलॉकमध्ये प्रवासी संख्या वाढल्यानंतर बस वाढविण्यात येतील. 

पूर्वी व्हायच्या १७०० फेऱ्या कोरोनापूर्वी जिल्ह्यातील ३७५ बसच्या १६०० ते १७०० फेऱ्या व्हायच्या. यामध्ये ७३ शिवशाही बस आहेत. आता कोविड नियमावलीनुसार १५० ते २५० बस विविध मार्गांवर सोडण्यात येणार असून, त्याच्या ५०० ते ६०० फेऱ्या होणार आहेत. सोमवारपासून जिल्हा व तालुका पातळीवर बस सोडण्यात येतील. तूर्तास ग्रामीण भागात बस धावणार नसल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी स्पष्ट केले. 

एसटीला रोज ३० लाखांचा फटकाकोरोना काळापूर्वी एसटीला रोज ३० ते ३५ लाखांचे उत्पन्न मिळायचे. मात्र, पहिल्या लॉकडाऊनमध्ये सहा महिने एसटीची चाके थांबली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येसुद्धा प्रवासी नव्हते. आता अनलॉकमध्ये फक्त दोन ते तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे. एसटीला दररोज ३० ते ३२ लाखांचा फटका बसत आहे.

 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी