शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

जिल्ह्यात तीन केंद्रांमध्ये शिवभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

योजनेचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पहिली थाळी लाभाथ्यार्ला दिली. वरण, भात, चपाती, भाजी आदी पदार्थांचा समावेश असलेल्या या थाळीचा आस्वाद अनेक लाभार्थ्यांनी घेतला. पालकमंत्र्यांनी यावेळी उपाहारगृहाची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवादही साधला. शहरात तीन केंद्रांवर रोज प्रत्येकी १०० थाळी १० रुपये प्रतिदराप्रमाणे विक्रीस परवानगी दिल्याचे पुरवठा विभागाने सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : गरजू, गरिबांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी उपाहारगृहात झाला.बाजार समितीसह अमरावती बसस्थानकातील उपाहारगृह, पीडीएमसी येथे शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहिकर, संचालक प्रफुल्ल राऊत, प्रकाश कोकाटे, प्रवीण बिचकुले, उमेश गोरडे, मिलिंद तायडे, प्रवीण भुगूल, सचिव दीपक विजयकर, धीरज कोकाटे, राजेद्रकुमार भटकर आदी उपस्थित होते.योजनेचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पहिली थाळी लाभाथ्यार्ला दिली. वरण, भात, चपाती, भाजी आदी पदार्थांचा समावेश असलेल्या या थाळीचा आस्वाद अनेक लाभार्थ्यांनी घेतला. पालकमंत्र्यांनी यावेळी उपाहारगृहाची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवादही साधला. शहरात तीन केंद्रांवर रोज प्रत्येकी १०० थाळी १० रुपये प्रतिदराप्रमाणे विक्रीस परवानगी दिल्याचे पुरवठा विभागाने सांगितले. या सर्व ठिकाणांवरून गरजूंनाच लाभ दिला जातो काय, याचे नियंत्रण ऑनलाईन केले जाणार आहे. पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांनी आठवड्यात एकदा, जिल्हापुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी आदींनी १५ दिवसांत एकदा व जिल्हाधिकारी, नियंत्रक शिधावाटप यांनी महिनाभरात एकदा तरी या केंद्रांना भेटी देऊन आढावा व अहवाल सादर करण्याचे अवर सचिवांचे निर्देश आहेत.केंद्रावर या सुविधा, दक्षता आवश्यकशिवभोजन थाळी बनविण्यासाठी स्वतंत्र किचन, स्वच्छतेचे सर्व निकष पाळले जावे, वापरायची भांडी स्टेनलेस स्टिलची असावी, कर्मचाऱ्यांच्या हाताची स्वच्छता, कपड्यांची स्वच्छता असावी, तयार केलेले अन्नपदार्थ स्टिलच्या भांड्यात साठविले जातील. शिळे वापरले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. खाद्यपदार्थ दूषित होणार नाही. आवश्यकतेनुसार फ्रिजचा वापर, पिण्यासाठी तसेच अन्नपदार्थ तयार करण्यासाठी फिल्टर्ड, पिण्यायोग्य पाण्याचा वापर, स्वच्छ टेबल, खुर्चीची व्यवस्था या सुविधा व दक्षता आवश्यक आहे.\४अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी या केंद्रावरील अन्नाचा दर्जा उत्तम राखण्याच्या दृष्टीने व अन्नातील भेसळ रोखण्यासाठी बाजारातून लागणारे साहित्य खाण्यायोग्य असल्याबाबतचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश पुरवठा विभागाचे अवर सचिव दीपक केंदे्र यांनी दिले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करणे, भोजनालय परिसरात डास कीटक आदींची वाढ होऊ न देणे व परिसर स्वच्च ठेवण्याविषयी मार्गदर्शन करण्याचे तसेच आरोग्य विभागाने पोषक तत्त्व असलेल्या भाज्यांची निवड करण्याचे प्रशिक्षण या केंद्रचालकांना द्यावे, असे निर्देश आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक