शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

केवळ १०० रुपयांसाठी हूक, चाकूने वार करून शिवभक्त गोलूचा खून !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:00 IST

कुटुंबीय, जमावाचा सिटी कोतवालीसमोर ठिय्या : दोन्ही आरोपींना तातडीने अटक

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शंभर रुपये मागितल्यावर केवळ २० रुपयेच दिल्याने झालेल्या वादात एकाची चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आली. १५ ऑक्टोबर रोजी रात्री १०:४५ च्या चित्रा चौकात ही थरारक घटना घडली. निशांत ऊर्फ गोलू सुनील उसरेटे (३१, रा. तिसरा नागोबा, रतनगंज, अमरावती) असे मृताचे नाव आहे. 

आरोपींना त्वरेने पकडण्याची मागणी करून गोलूच्या कुटुंबीयांसह त्याची मित्रमंडळी व जमावाने बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास सिटी कोतवाली पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला. ४०० ते ५०० च्या संख्येत असलेल्या त्या जमावाने पोलिसांविरुद्ध घोषणाबाजीही केली. त्यानंतर दोन्ही आरोपींसह अन्य एकाला अटक करण्यात आली. 

दरम्यान, या प्रकरणी, गोपाल चव्हाण (वय ४१, रा. रतनगंज) याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी १६ ऑक्टोबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास आरोपी विक्की परशूराम गुप्ता (३५, रतनगंज) व योगेश गजानन गरूड (३०, रा. विलासनगर) या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यात विक्की व योगेशसह कमल उर्फ रोशन रमेश साहू (३२, रा. रतनगंज) याला देखील अटक करण्यात आली. विक्की व रोशनला पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले यांच्या स्पेशल स्कॉडने तर, एपीआय महेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वातील सीआययूने ताब्यात घेतले. निशांत ऊर्फ गोलू हा सन २००७ पासून जयभोले कावडयात्रा काढत होता. 

गोलूच्या मृत्यूमुळे त्याची केवळ दहा दिवसांची नवजात कन्या पोरकी झाली आहे. शिवभक्त गोलूची हत्या झाल्याचे समजताच शेकडोंचा जमाव कोतवाली ठाण्यासमोर जमा झाला. आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. उपायुक्त गणेश शिंदे, एसीपी जयदत्त भंवर, कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. आ. रवी राणा, डॉ. सुनील देशमुख, विलास इंगोले व बबलू शेखावत हे देखील कोतवालीसमोर पोहोचले. मात्र जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. दरम्यान, आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ती माहिती संतप्त जमावाला देण्यात आली. त्यानंतर सुमारे ४०० ते ५०० लोकांचा तो जमाव शांत झाला. मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. 

एकाने हूक, दुसऱ्याने चाकू भोसकला गोलू हा विक्की गुप्ताशी बोलत होता. त्याचवेळी विक्कीने लोखंडी हुकने त्याच्यावर हल्ला चढविला; तर योगेश गरुड याने गोलूच्या डोक्यावर व छातीवर चाकूने भोसकले. त्यामुळे गोलू रक्तबंबाळ झाला. त्याला तसेच टाकून आरोपींनी पळ काढला. गोपाल व समीर यांनी गोलूला इर्विनमध्ये आणले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यावेळी इर्विन व घटनास्थळीही मोठा जमाव जमला होता. तेथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

अशी घडली घटनाफिर्यादी गोपाल चव्हाण, निशांत ऊर्फ गोलू उसरेटे व समीर तायडे हे तिघे त्यांच्या अपघातग्रस्त मित्रांना पाहण्यासाठी मंगळवारी रात्री इर्विनला गेले होते. तेथून घरी परतत असताना गोलू हा गोपालची बाईक चालवत होता. ते चित्रा चौकात आले असता मोपेडवर असलेल्या त्यांच्याच मोहल्ल्यातील आरोपी विकी गुप्ता व योगेश गरूडने गोलूला थांबविले. विक्कीने गोलूकडे १०० रुपये मागितले. त्यावर त्याने केवळ २० रुपये दिले. वीसच रुपये दिल्याने योगेश गरुडने गोलूला चाकूने मारण्याची धमकी दिली. त्यावर ये हमारे मोहल्ले की बात है, तू क्यूँ बोल रहा?' अशी विचारणा गोलूने त्याला केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती