शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

संत्र्यांच्या भावात कमालीची घसरण

By admin | Updated: October 9, 2015 00:55 IST

विदर्भातील एकूण हेक्टरपैकी संत्रा लागवडीचे क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे.

शासनाचे दुर्लक्ष : जिल्ह्यात ९०० कोटींची उलाढालसंजय खासबागे वरूडविदर्भातील एकूण हेक्टरपैकी संत्रा लागवडीचे क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे. संत्रा व्यवसायातून ९०० कोटी रुपयांची उलाढाल येथे होते. परंतु बाजारभाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादकांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले आहे. सध्या आंबिया बहराची संत्री कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. दरवर्षी संत्रा लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत असली तरी भाव मात्र मिळत नसल्याने उत्पादित होणारा संत्रा माघारला आहे. बहुगुणी संत्र्याला राजाश्रयाची गरज निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातून वरुड मोर्शी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३५ हजार हेक्टर जमिनीत संत्राचे पीक घेण्यात येते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून देश-विदेशात परिचित असलेला वरुड तालुका ंसंत्र्याकरिता प्रसिध्द आहे. तालुक्यात संत्रा लागवडीखाली २१ हजार हेक्टर शेतजमीन असून उत्पादन घेणारी संत्रा झाडे १७ हजार ६७१ हेक्टर ६७ आर जमिनीवर आहे. या परिसरात ३५ टक्क्यांपेक्षा अधिक जमिनीवर संत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातात. दरवर्षी मृग बहराचा संत्रा उत्पादन घेतला जात होता. परंतु गत चार वर्षांपासून सतत गारपीट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असून मृग बहरापेक्षा आंबिया बहराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली आहे. आंबिया बहराच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना कमी जोखीम पत्करावी लागते. नैसर्गिक जोखीमेपेक्षा आता संत्रा मोठ्या प्रमाणात असल्याने परप्रांतीय व्यापाऱ्यांनी संत्राच्या दरात कमालीची घसरण केली आहे. जिल्ह्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादित केला जातो. यामध्ये साडेतीन लाख टन आंबिया बहराची संत्रा तर दोन लाख टन मृग बहराचे संत्रा उत्पादन घेतले जाते. ७० टक्के आंबिया बहर घेतला जातो. संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येण्याकरिता मध्यस्थी करून संत्रा विकला जाण्याची पध्दत बंद होऊन थेट मार्केटिंगची व्यवस्था आणि अधिक क्षमतेची प्रक्रिया प्रकल्प उभारल्यास संत्रा उत्पादकांना चांगले दिवस येतील. परंतु हे होणार तरी कधी, हा प्रश्नच आहे. यापासून ९०० कोटी रुपयांची उलाढाल संत्रामुळे होते. परंतु भावात घसरण आणि योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने उलाढालीवर विपरीत परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्राफळाला ८०० ते एक हजार रुपये प्रतिहजार रुपये मोजावे लागतात. मध्यन प्रतिच्या एका संत्रा झाडावर साधारणत: ८०० ते १२०० फळे असतात. एका झाडाच्या देखभालीचा आणि मशागतीचा खर्च बेगण्या लावणीपर्यंत ८०० ते एक हजार रुपये असल्याने मेहनत काढणेही कठीण झाले आहे. आंबिया बहराचा संत्रा उत्तर आणि दक्षिण भारतात विकला जात असून परप्रांतीय बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने संत्राच्या भावात कमालीची घसरण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेच सावट पसरले आहे. संत्राला राजाश्रय मिळावा म्हणून तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी राष्ट्रीय संत्रा परिषद घेतली होती. आता विद्यमान आ. अनिल बोंडे यांनी संत्राचे महत्त्व देशात पटवून देऊन संत्राला राजाश्रय मिळावा म्हणून राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सव आयोजित केला होता. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीसुध्दा प्रक्रिया केंद्राचे आश्वासन राष्ट्रीय संत्रा परिषदेत दिले होते. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेदं्र फडणवीस यांनीसुध्दा मोर्शीला संत्रा रस प्रक्रिया केंद्र आणि वरुडला राज्यातून पहिला संत्रा डिहायड्रेशन (निर्जलीकरण) प्रकल्पाची घोषणा केली आहे. परंतु या घोषणा घोषणाच राहतील की, प्रत्यक्षात उतरतील, याबाबत संत्रा उत्पादक शंका उपस्थित करीत आहेत.