शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्यांच्या भावात कमालीची घसरण

By admin | Updated: October 9, 2015 00:55 IST

विदर्भातील एकूण हेक्टरपैकी संत्रा लागवडीचे क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे.

शासनाचे दुर्लक्ष : जिल्ह्यात ९०० कोटींची उलाढालसंजय खासबागे वरूडविदर्भातील एकूण हेक्टरपैकी संत्रा लागवडीचे क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे. संत्रा व्यवसायातून ९०० कोटी रुपयांची उलाढाल येथे होते. परंतु बाजारभाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादकांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले आहे. सध्या आंबिया बहराची संत्री कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. दरवर्षी संत्रा लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत असली तरी भाव मात्र मिळत नसल्याने उत्पादित होणारा संत्रा माघारला आहे. बहुगुणी संत्र्याला राजाश्रयाची गरज निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातून वरुड मोर्शी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३५ हजार हेक्टर जमिनीत संत्राचे पीक घेण्यात येते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून देश-विदेशात परिचित असलेला वरुड तालुका ंसंत्र्याकरिता प्रसिध्द आहे. तालुक्यात संत्रा लागवडीखाली २१ हजार हेक्टर शेतजमीन असून उत्पादन घेणारी संत्रा झाडे १७ हजार ६७१ हेक्टर ६७ आर जमिनीवर आहे. या परिसरात ३५ टक्क्यांपेक्षा अधिक जमिनीवर संत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातात. दरवर्षी मृग बहराचा संत्रा उत्पादन घेतला जात होता. परंतु गत चार वर्षांपासून सतत गारपीट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असून मृग बहरापेक्षा आंबिया बहराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली आहे. आंबिया बहराच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना कमी जोखीम पत्करावी लागते. नैसर्गिक जोखीमेपेक्षा आता संत्रा मोठ्या प्रमाणात असल्याने परप्रांतीय व्यापाऱ्यांनी संत्राच्या दरात कमालीची घसरण केली आहे. जिल्ह्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादित केला जातो. यामध्ये साडेतीन लाख टन आंबिया बहराची संत्रा तर दोन लाख टन मृग बहराचे संत्रा उत्पादन घेतले जाते. ७० टक्के आंबिया बहर घेतला जातो. संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येण्याकरिता मध्यस्थी करून संत्रा विकला जाण्याची पध्दत बंद होऊन थेट मार्केटिंगची व्यवस्था आणि अधिक क्षमतेची प्रक्रिया प्रकल्प उभारल्यास संत्रा उत्पादकांना चांगले दिवस येतील. परंतु हे होणार तरी कधी, हा प्रश्नच आहे. यापासून ९०० कोटी रुपयांची उलाढाल संत्रामुळे होते. परंतु भावात घसरण आणि योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने उलाढालीवर विपरीत परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्राफळाला ८०० ते एक हजार रुपये प्रतिहजार रुपये मोजावे लागतात. मध्यन प्रतिच्या एका संत्रा झाडावर साधारणत: ८०० ते १२०० फळे असतात. एका झाडाच्या देखभालीचा आणि मशागतीचा खर्च बेगण्या लावणीपर्यंत ८०० ते एक हजार रुपये असल्याने मेहनत काढणेही कठीण झाले आहे. आंबिया बहराचा संत्रा उत्तर आणि दक्षिण भारतात विकला जात असून परप्रांतीय बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने संत्राच्या भावात कमालीची घसरण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेच सावट पसरले आहे. संत्राला राजाश्रय मिळावा म्हणून तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी राष्ट्रीय संत्रा परिषद घेतली होती. आता विद्यमान आ. अनिल बोंडे यांनी संत्राचे महत्त्व देशात पटवून देऊन संत्राला राजाश्रय मिळावा म्हणून राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सव आयोजित केला होता. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीसुध्दा प्रक्रिया केंद्राचे आश्वासन राष्ट्रीय संत्रा परिषदेत दिले होते. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेदं्र फडणवीस यांनीसुध्दा मोर्शीला संत्रा रस प्रक्रिया केंद्र आणि वरुडला राज्यातून पहिला संत्रा डिहायड्रेशन (निर्जलीकरण) प्रकल्पाची घोषणा केली आहे. परंतु या घोषणा घोषणाच राहतील की, प्रत्यक्षात उतरतील, याबाबत संत्रा उत्पादक शंका उपस्थित करीत आहेत.