शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

पुन्हा संचारणार शंकरपटाचा उत्साह

By admin | Updated: April 13, 2017 00:15 IST

शंकरपटावर घालण्यात आलेली बंदी मागे घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते.

तळेगावात आनंद : कायद्याचे सावट निवळले, ऐतिहासिक स्पर्धेला संजीवनीतळेगाव दशासर : शंकरपटावर घालण्यात आलेली बंदी मागे घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते. यानिर्णयामुळे तळेगावच्या शंकरपटास गतवैभव प्राप्त होणार आहे. मागील तीन वर्षांपासून तळेगावचा प्रसिद्ध शंकरपट भरला नसल्याने नैराश्याचे वातावरण होते. विशेष म्हणजे यामुळे शेतीपुरक व्यवसायावरही मोठा परिणाम झाला होता. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तळेगावच्या शंकरपटावर तीन वर्षांपूर्वी न्यायालयाच्या निर्णयामुळे बंदी आली होती. येथील शंकरपटाला शंभर वर्षांचा इतिहास आहे. कृषक सुधार मंडळाद्वारे सुरू करण्यात आलेला हा ऐतिहासिक शंकरपट दरवर्षी संक्रातीच्या मुहूर्तावर १५ ते १८ जानेवारीपर्यंत येथील बसस्थानकाच्या उत्तरेस असलेल्या २७ एकर शासकीय जागेत भरविण्यात येतो. देशातील पहिला महिला शंकरपट देखील याच ठिकाणी दहा वर्षांपूर्वी भरविण्यात आला होता. तेव्हापासून येथील शंकरपटात महिला देखील सहभागी होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात कुस्ती स्पर्धा व पटेश्वर यात्रा देखील भरविली जाते. केवळ स्पर्धेसाठीच नव्हे तर या शंकरपटाच्या माध्यामतून अनेक शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यावर येथे येणाऱ्यांचा भर असतो. शंकरपटात शेतीपयोगी सर्वच साहित्य, करमणुकीची साधने, बैलबाजार, पशू प्रदर्शनी, बचतगट स्टॉल आदींचा भरणा असल्याने यापटाला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त होते आणि येथे कोट्यवधींची उलाढालही होते. शासनाने २७ एकर शासकीय जमीन दहा दिवसांसाठी शेतकऱ्यांशी संबंधित कार्यक्रमासाठी राखून ठेवली आहे. आ. जगताप यांच्या प्रयत्नाने यात्रेचे उत्पन्न कृषक सुधार मंडळास मिळवून दिले आहे. (वार्ताहर)बैलांवर अन्याय नाहीराज्यातील पटशौकीन आपल्या नामांकित जोड्या घेऊन येथे लवाजाम्यासह डेरेदाखल होतात. तसेच लांबून व्यापारी, ग्राहक व शेतकरी लाखोंच्या संख्येने पटात सहभागी होत असतात. या शंकरपटात बैलांवर कोणताही अन्याय होत नाही व जोडी हाकताना पुराणी, आरू व काठीचा वापर करण्यास धुरकऱ्यास सक्त मनाई कृषक सुधार मंडळाने केली आहे. शंकरपट सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. परंतु, पटविरोधक सुप्रीम कोर्टात गेल्यास अडचण येऊ नये. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना विश्वासात घ्यावे. - आ.वीरेंद्र जगताप,धामणगावहा पट अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्याचे भूषण आहे. या शंकरपटाला आजपर्यंत कोणतेही गालबोट लागले नाही. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. - रावसाहेब देशमुख, कृषक सुधार मंडळ