शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

पुन्हा संचारणार शंकरपटाचा उत्साह

By admin | Updated: April 13, 2017 00:15 IST

शंकरपटावर घालण्यात आलेली बंदी मागे घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते.

तळेगावात आनंद : कायद्याचे सावट निवळले, ऐतिहासिक स्पर्धेला संजीवनीतळेगाव दशासर : शंकरपटावर घालण्यात आलेली बंदी मागे घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते. यानिर्णयामुळे तळेगावच्या शंकरपटास गतवैभव प्राप्त होणार आहे. मागील तीन वर्षांपासून तळेगावचा प्रसिद्ध शंकरपट भरला नसल्याने नैराश्याचे वातावरण होते. विशेष म्हणजे यामुळे शेतीपुरक व्यवसायावरही मोठा परिणाम झाला होता. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तळेगावच्या शंकरपटावर तीन वर्षांपूर्वी न्यायालयाच्या निर्णयामुळे बंदी आली होती. येथील शंकरपटाला शंभर वर्षांचा इतिहास आहे. कृषक सुधार मंडळाद्वारे सुरू करण्यात आलेला हा ऐतिहासिक शंकरपट दरवर्षी संक्रातीच्या मुहूर्तावर १५ ते १८ जानेवारीपर्यंत येथील बसस्थानकाच्या उत्तरेस असलेल्या २७ एकर शासकीय जागेत भरविण्यात येतो. देशातील पहिला महिला शंकरपट देखील याच ठिकाणी दहा वर्षांपूर्वी भरविण्यात आला होता. तेव्हापासून येथील शंकरपटात महिला देखील सहभागी होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात कुस्ती स्पर्धा व पटेश्वर यात्रा देखील भरविली जाते. केवळ स्पर्धेसाठीच नव्हे तर या शंकरपटाच्या माध्यामतून अनेक शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यावर येथे येणाऱ्यांचा भर असतो. शंकरपटात शेतीपयोगी सर्वच साहित्य, करमणुकीची साधने, बैलबाजार, पशू प्रदर्शनी, बचतगट स्टॉल आदींचा भरणा असल्याने यापटाला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त होते आणि येथे कोट्यवधींची उलाढालही होते. शासनाने २७ एकर शासकीय जमीन दहा दिवसांसाठी शेतकऱ्यांशी संबंधित कार्यक्रमासाठी राखून ठेवली आहे. आ. जगताप यांच्या प्रयत्नाने यात्रेचे उत्पन्न कृषक सुधार मंडळास मिळवून दिले आहे. (वार्ताहर)बैलांवर अन्याय नाहीराज्यातील पटशौकीन आपल्या नामांकित जोड्या घेऊन येथे लवाजाम्यासह डेरेदाखल होतात. तसेच लांबून व्यापारी, ग्राहक व शेतकरी लाखोंच्या संख्येने पटात सहभागी होत असतात. या शंकरपटात बैलांवर कोणताही अन्याय होत नाही व जोडी हाकताना पुराणी, आरू व काठीचा वापर करण्यास धुरकऱ्यास सक्त मनाई कृषक सुधार मंडळाने केली आहे. शंकरपट सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. परंतु, पटविरोधक सुप्रीम कोर्टात गेल्यास अडचण येऊ नये. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना विश्वासात घ्यावे. - आ.वीरेंद्र जगताप,धामणगावहा पट अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्याचे भूषण आहे. या शंकरपटाला आजपर्यंत कोणतेही गालबोट लागले नाही. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. - रावसाहेब देशमुख, कृषक सुधार मंडळ