शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२५ मे रोजी अनुभवता येणार शून्य सावलीचा थरार

By admin | Updated: May 19, 2016 00:13 IST

गुरुवार २५ मे रोजी दुपारी १२ वाजता सूर्य अमरावतीकरांच्या अगदी डोक्यावर येणार आहे.

खगोलीय घटना : पृथ्वीचा अक्ष कलल्याने अनुभवता येणार स्थिती अमरावती : गुरुवार २५ मे रोजी दुपारी १२ वाजता सूर्य अमरावतीकरांच्या अगदी डोक्यावर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूची सावली ९० अंशाच्या कोनात राहील. सरळ उभ्या वस्तुंची तर सावलीच दिसणार नाही. २२ मार्च रोजी पृथ्वीचे दोन्ही ध्रूव हे सूर्याकडे असतात. त्यामुळे यादिवशी समान दिवस व रात्र असते. या दिवशी विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. मात्र त्यानंतर पृथ्वी जसजसी आपल्या कक्षेत पुढे जाते, तसतसा पृथ्वीचा उत्तर ध्रूव अधिकाअधिक सूर्याकडे झुकतो. त्यामुळे २२ मार्चनंतर विषुववृत्ताच्या उत्तरेकडील अक्षावर सूर्यकिरण क्रमाक्रमाने लंबरूप पडतात. जास्तीत जास्त २१ जूनपर्यंत २३.३० अंश उत्तर अक्षवृत्तावर मध्यान्हाला सूर्यकिरण लंबरुप पडतात. या वृत्तास कर्कवृत्त, असे म्हणतात. २१ जूननंतर पृथ्वी, प्रदक्षिणा मार्गावर पुढे जात राहते. तेव्हा २३ सप्टेंबर या दिवशी पुन्हा पृथ्वीचे दोन्ही ध्रूव सूर्यासमोर येतात व विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरुप पडतात. अर्थातच या दिवशी पुन्हा दिनमान सारखे अनुभवण्यास मिळते. परंतु यानंतर पृथ्वी जसजसी आपल्या कक्षेवरून पुढे जाते, तसतसा पृथ्वीचा दक्षिण ध्रूव अधिकाअधिक सूर्याकडे कलतो. २३ सप्टेंबरनंतर विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील अक्षवृत्तावर सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरुप पडत जातो व शेवटी २२ डिसेंबर या दिवशी २३.३० अंश दक्षिण अक्षवृत्तावर मध्यान्हीला सूर्यकिरण लंबरुप पडत जातात. व शेवटी २२ डिसेंबर या दिवशी २३.३० अंश दक्षिण अक्षवृत्तावर मध्यान्हाला सूर्यकिरण लंबरुप पडतात. या वृत्तास मकरवृत्त, असे म्हणणात. या दिवशी मध्यान्हाला सूर्य मकरवृत्तावर बरोबबर डोक्यावर येतो. दक्षिण गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस असतो. उत्तर गोलार्धात या दिवशी रात्र सर्वात मोठी असते. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन रेषेच्या मध्य पट्ट्यातच सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरुप पडत असतात. त्यामुळे या भागातच शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे व मकरवृत्ताच दक्षिणेकडे कधीच सूर्य डोक्यावर येत नाही. त्यामुळे येथे नेहमीच तिरपी सावली पडते. पृथ्वीचा अक्ष जर सरळ ९० अंशात असता तर फक्त विषुवत्तावरच नेहमीसाठी शून्य सावली अनुभवता आली असती. आपला भारत देश उत्तर गोलार्धात असून गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोरमा प्रांतातून कर्कवृत्ताची रेषा गेली आहे. तेव्हा भारताच्या दक्षिण टोकांपासून सूर्य क्रमाक्रमाने सरकत जाऊन या रेषेपर्यंत २१ जूनला डोक्यावर आलेला असेल. यापुढील उत्तरेकडील प्रदेशात सूर्य कधी डोक्यावर येणार नाही. २५ मे अमरावती नंतर २६ मे भुसावळ, जळगांव व नागपूर येथे शून्य सावलीचा आनंद घेता येणार असल्याचे मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे प्रवीण गुल्हाने, रोहित कोठाडे, भूषण ब्राम्हणे व पंकज गोपतवार यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)