शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

२५ मे रोजी अनुभवता येणार शून्य सावलीचा थरार

By admin | Updated: May 19, 2016 00:13 IST

गुरुवार २५ मे रोजी दुपारी १२ वाजता सूर्य अमरावतीकरांच्या अगदी डोक्यावर येणार आहे.

खगोलीय घटना : पृथ्वीचा अक्ष कलल्याने अनुभवता येणार स्थिती अमरावती : गुरुवार २५ मे रोजी दुपारी १२ वाजता सूर्य अमरावतीकरांच्या अगदी डोक्यावर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूची सावली ९० अंशाच्या कोनात राहील. सरळ उभ्या वस्तुंची तर सावलीच दिसणार नाही. २२ मार्च रोजी पृथ्वीचे दोन्ही ध्रूव हे सूर्याकडे असतात. त्यामुळे यादिवशी समान दिवस व रात्र असते. या दिवशी विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. मात्र त्यानंतर पृथ्वी जसजसी आपल्या कक्षेत पुढे जाते, तसतसा पृथ्वीचा उत्तर ध्रूव अधिकाअधिक सूर्याकडे झुकतो. त्यामुळे २२ मार्चनंतर विषुववृत्ताच्या उत्तरेकडील अक्षावर सूर्यकिरण क्रमाक्रमाने लंबरूप पडतात. जास्तीत जास्त २१ जूनपर्यंत २३.३० अंश उत्तर अक्षवृत्तावर मध्यान्हाला सूर्यकिरण लंबरुप पडतात. या वृत्तास कर्कवृत्त, असे म्हणतात. २१ जूननंतर पृथ्वी, प्रदक्षिणा मार्गावर पुढे जात राहते. तेव्हा २३ सप्टेंबर या दिवशी पुन्हा पृथ्वीचे दोन्ही ध्रूव सूर्यासमोर येतात व विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरुप पडतात. अर्थातच या दिवशी पुन्हा दिनमान सारखे अनुभवण्यास मिळते. परंतु यानंतर पृथ्वी जसजसी आपल्या कक्षेवरून पुढे जाते, तसतसा पृथ्वीचा दक्षिण ध्रूव अधिकाअधिक सूर्याकडे कलतो. २३ सप्टेंबरनंतर विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील अक्षवृत्तावर सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरुप पडत जातो व शेवटी २२ डिसेंबर या दिवशी २३.३० अंश दक्षिण अक्षवृत्तावर मध्यान्हीला सूर्यकिरण लंबरुप पडत जातात. व शेवटी २२ डिसेंबर या दिवशी २३.३० अंश दक्षिण अक्षवृत्तावर मध्यान्हाला सूर्यकिरण लंबरुप पडतात. या वृत्तास मकरवृत्त, असे म्हणणात. या दिवशी मध्यान्हाला सूर्य मकरवृत्तावर बरोबबर डोक्यावर येतो. दक्षिण गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस असतो. उत्तर गोलार्धात या दिवशी रात्र सर्वात मोठी असते. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन रेषेच्या मध्य पट्ट्यातच सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरुप पडत असतात. त्यामुळे या भागातच शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे व मकरवृत्ताच दक्षिणेकडे कधीच सूर्य डोक्यावर येत नाही. त्यामुळे येथे नेहमीच तिरपी सावली पडते. पृथ्वीचा अक्ष जर सरळ ९० अंशात असता तर फक्त विषुवत्तावरच नेहमीसाठी शून्य सावली अनुभवता आली असती. आपला भारत देश उत्तर गोलार्धात असून गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोरमा प्रांतातून कर्कवृत्ताची रेषा गेली आहे. तेव्हा भारताच्या दक्षिण टोकांपासून सूर्य क्रमाक्रमाने सरकत जाऊन या रेषेपर्यंत २१ जूनला डोक्यावर आलेला असेल. यापुढील उत्तरेकडील प्रदेशात सूर्य कधी डोक्यावर येणार नाही. २५ मे अमरावती नंतर २६ मे भुसावळ, जळगांव व नागपूर येथे शून्य सावलीचा आनंद घेता येणार असल्याचे मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे प्रवीण गुल्हाने, रोहित कोठाडे, भूषण ब्राम्हणे व पंकज गोपतवार यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)