शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात हजार शेतकरी वीज जोडणीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:45 IST

गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़

ठळक मुद्देवर्षभर यादी प्रलंबित : शेतकऱ्यांना आधाराची गरज

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़विदर्भात सर्वाधिक कमी पावसाची नोंद गतवर्षी अमरावती जिल्ह्यात झाली़ शेतकºयांनी अल्प पावसात आपल्या शेतातून खरिपाचे उत्पन्न घेतले. मात्र रबी हंगामात विहिरीला काहीअंशी पाणी असताना कृषिपंपाची वीज नसल्याने कोणतेही उत्पन्न घेता येत नाही़ यंदा जिल्ह्यात विंधन, सिंचन विहिरीचे खोदकाम करण्यात आले. मात्र वीज जोडण्या मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.एचव्हीडीएस लाभ मिळणार कधी?पैसे भरून प्रलंबित कृषिपंप ग्राहकांना आता उच्च वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती़ सध्याच्या पध्दतीनुसार शेतकºयांना ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून १५ ते २० कृषिग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो़ त्यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते व वीजहानी होते़ वीज पुरवठ्यात नेहमी तांत्रिक बिघाड होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ किमान दोन ते तीन शेतकºयांना एक रोहीत्र देण्यात येऊन एचव्हीडीएस या नव्या प्रणालीद्वारे कधी वीज देण्यात येणार, असा सवाल शेतकºयांनी केला आहे़१३ तालुके उपेक्षितगत एक वर्षापासून सर्वाधिक अचलपूर तालुक्यातील ९५५ शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहे़नांदगाव खंडेश्वर ९४२, धामणगाव रेल्वे ७८०, दर्यापूर ७५०, अंजनगाव सुर्जी ७१४, मोर्शी ५९७, चांदूर रेल्वे ४५९, अमरावती ५५२, भातकुली २८८, तिवसा ४६४, चांदूर बाजार ५३५, वरूड ४३५, धारणी १०५, चिखलदरा ६५ या तालुक्यातील शेतकºयांची संख्या दररोज विज मंडळाच्या कार्यालयात वीज जोडणीसाठी चकरा मारत आहे़शासनाच्या सिंचन विहीर योजनेअंतर्गत वर्षभरापूर्वी विहीर खोदली. मात्र, कृषिपंपाना वीजपुरवठा मिळत नसल्याने कोणताच लाभ होत नाही़ शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे़- अशोक क्षीरसागर, शेतकरी, जळगाव