शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात हजार शेतकरी वीज जोडणीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:45 IST

गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़

ठळक मुद्देवर्षभर यादी प्रलंबित : शेतकऱ्यांना आधाराची गरज

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़विदर्भात सर्वाधिक कमी पावसाची नोंद गतवर्षी अमरावती जिल्ह्यात झाली़ शेतकºयांनी अल्प पावसात आपल्या शेतातून खरिपाचे उत्पन्न घेतले. मात्र रबी हंगामात विहिरीला काहीअंशी पाणी असताना कृषिपंपाची वीज नसल्याने कोणतेही उत्पन्न घेता येत नाही़ यंदा जिल्ह्यात विंधन, सिंचन विहिरीचे खोदकाम करण्यात आले. मात्र वीज जोडण्या मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.एचव्हीडीएस लाभ मिळणार कधी?पैसे भरून प्रलंबित कृषिपंप ग्राहकांना आता उच्च वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती़ सध्याच्या पध्दतीनुसार शेतकºयांना ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून १५ ते २० कृषिग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो़ त्यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते व वीजहानी होते़ वीज पुरवठ्यात नेहमी तांत्रिक बिघाड होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ किमान दोन ते तीन शेतकºयांना एक रोहीत्र देण्यात येऊन एचव्हीडीएस या नव्या प्रणालीद्वारे कधी वीज देण्यात येणार, असा सवाल शेतकºयांनी केला आहे़१३ तालुके उपेक्षितगत एक वर्षापासून सर्वाधिक अचलपूर तालुक्यातील ९५५ शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहे़नांदगाव खंडेश्वर ९४२, धामणगाव रेल्वे ७८०, दर्यापूर ७५०, अंजनगाव सुर्जी ७१४, मोर्शी ५९७, चांदूर रेल्वे ४५९, अमरावती ५५२, भातकुली २८८, तिवसा ४६४, चांदूर बाजार ५३५, वरूड ४३५, धारणी १०५, चिखलदरा ६५ या तालुक्यातील शेतकºयांची संख्या दररोज विज मंडळाच्या कार्यालयात वीज जोडणीसाठी चकरा मारत आहे़शासनाच्या सिंचन विहीर योजनेअंतर्गत वर्षभरापूर्वी विहीर खोदली. मात्र, कृषिपंपाना वीजपुरवठा मिळत नसल्याने कोणताच लाभ होत नाही़ शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे़- अशोक क्षीरसागर, शेतकरी, जळगाव