शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

साडेसात हजार शेतकरी वीज जोडणीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:45 IST

गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़

ठळक मुद्देवर्षभर यादी प्रलंबित : शेतकऱ्यांना आधाराची गरज

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़विदर्भात सर्वाधिक कमी पावसाची नोंद गतवर्षी अमरावती जिल्ह्यात झाली़ शेतकºयांनी अल्प पावसात आपल्या शेतातून खरिपाचे उत्पन्न घेतले. मात्र रबी हंगामात विहिरीला काहीअंशी पाणी असताना कृषिपंपाची वीज नसल्याने कोणतेही उत्पन्न घेता येत नाही़ यंदा जिल्ह्यात विंधन, सिंचन विहिरीचे खोदकाम करण्यात आले. मात्र वीज जोडण्या मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.एचव्हीडीएस लाभ मिळणार कधी?पैसे भरून प्रलंबित कृषिपंप ग्राहकांना आता उच्च वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती़ सध्याच्या पध्दतीनुसार शेतकºयांना ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून १५ ते २० कृषिग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो़ त्यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते व वीजहानी होते़ वीज पुरवठ्यात नेहमी तांत्रिक बिघाड होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ किमान दोन ते तीन शेतकºयांना एक रोहीत्र देण्यात येऊन एचव्हीडीएस या नव्या प्रणालीद्वारे कधी वीज देण्यात येणार, असा सवाल शेतकºयांनी केला आहे़१३ तालुके उपेक्षितगत एक वर्षापासून सर्वाधिक अचलपूर तालुक्यातील ९५५ शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहे़नांदगाव खंडेश्वर ९४२, धामणगाव रेल्वे ७८०, दर्यापूर ७५०, अंजनगाव सुर्जी ७१४, मोर्शी ५९७, चांदूर रेल्वे ४५९, अमरावती ५५२, भातकुली २८८, तिवसा ४६४, चांदूर बाजार ५३५, वरूड ४३५, धारणी १०५, चिखलदरा ६५ या तालुक्यातील शेतकºयांची संख्या दररोज विज मंडळाच्या कार्यालयात वीज जोडणीसाठी चकरा मारत आहे़शासनाच्या सिंचन विहीर योजनेअंतर्गत वर्षभरापूर्वी विहीर खोदली. मात्र, कृषिपंपाना वीजपुरवठा मिळत नसल्याने कोणताच लाभ होत नाही़ शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे़- अशोक क्षीरसागर, शेतकरी, जळगाव