शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सात जणांचा मृत्यू, ३३ हजार हेक्टर बाधित; ४८ तासातील पावसामुळे पश्चिम विदर्भात मोठे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:57 IST

पश्चिम विदर्भातील २० मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे अमरावती जिल्ह्यात ४० हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेलेली आहे.

गजानन मोहोड

अमरावती - विभागात दोन दिवस झालेला संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीमध्ये १५ गुरे दगावली. याशिवाय शेतात पाणी साचल्यामुळे ३२,७८५ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे. अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राचे सर्व्हेक्षण सुरु असून बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.    

पश्चिम विदर्भातील २० मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे अमरावती जिल्ह्यात ४० हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेलेली आहे. याशिवाय ११ घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने या कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आलेले आहे.

या आपत्तीमध्ये अमरावती जिल्ह्यात सहा, यवतमाळ जिल्ह्यात चार, बुलडाणा जिल्ह्यात पाच व वाशिम जिल्ह्यात एक असे एकूण लहान-मोठ्या १६ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. विभागात सध्याही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच आहे. याशिवाय शेतात पाणी व रस्त्यांमध्ये चिखल असल्याने पिकांच्या पंचनाम्यात अडथडे येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

वाशिम जिल्ह्यात १७,०८४ हेक्टरमधील तुर, सोयाबीन व कपाशी तसेच संत्रा पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यात ३३४, अकोला २५ व यवतमाळ जिल्ह्यात चार असे एकूण ३६३ घरांची पडझड झालेली आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊस