शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सात जणांचा मृत्यू, ३३ हजार हेक्टर बाधित; ४८ तासातील पावसामुळे पश्चिम विदर्भात मोठे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:57 IST

पश्चिम विदर्भातील २० मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे अमरावती जिल्ह्यात ४० हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेलेली आहे.

गजानन मोहोड

अमरावती - विभागात दोन दिवस झालेला संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीमध्ये १५ गुरे दगावली. याशिवाय शेतात पाणी साचल्यामुळे ३२,७८५ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे. अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राचे सर्व्हेक्षण सुरु असून बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.    

पश्चिम विदर्भातील २० मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे अमरावती जिल्ह्यात ४० हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेलेली आहे. याशिवाय ११ घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने या कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आलेले आहे.

या आपत्तीमध्ये अमरावती जिल्ह्यात सहा, यवतमाळ जिल्ह्यात चार, बुलडाणा जिल्ह्यात पाच व वाशिम जिल्ह्यात एक असे एकूण लहान-मोठ्या १६ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. विभागात सध्याही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच आहे. याशिवाय शेतात पाणी व रस्त्यांमध्ये चिखल असल्याने पिकांच्या पंचनाम्यात अडथडे येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

वाशिम जिल्ह्यात १७,०८४ हेक्टरमधील तुर, सोयाबीन व कपाशी तसेच संत्रा पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यात ३३४, अकोला २५ व यवतमाळ जिल्ह्यात चार असे एकूण ३६३ घरांची पडझड झालेली आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊस