शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

सात जणांचा मृत्यू, ३३ हजार हेक्टर बाधित; ४८ तासातील पावसामुळे पश्चिम विदर्भात मोठे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:57 IST

पश्चिम विदर्भातील २० मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे अमरावती जिल्ह्यात ४० हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेलेली आहे.

गजानन मोहोड

अमरावती - विभागात दोन दिवस झालेला संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीमध्ये १५ गुरे दगावली. याशिवाय शेतात पाणी साचल्यामुळे ३२,७८५ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे. अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राचे सर्व्हेक्षण सुरु असून बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.    

पश्चिम विदर्भातील २० मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे अमरावती जिल्ह्यात ४० हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेलेली आहे. याशिवाय ११ घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने या कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आलेले आहे.

या आपत्तीमध्ये अमरावती जिल्ह्यात सहा, यवतमाळ जिल्ह्यात चार, बुलडाणा जिल्ह्यात पाच व वाशिम जिल्ह्यात एक असे एकूण लहान-मोठ्या १६ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. विभागात सध्याही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच आहे. याशिवाय शेतात पाणी व रस्त्यांमध्ये चिखल असल्याने पिकांच्या पंचनाम्यात अडथडे येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

वाशिम जिल्ह्यात १७,०८४ हेक्टरमधील तुर, सोयाबीन व कपाशी तसेच संत्रा पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यात ३३४, अकोला २५ व यवतमाळ जिल्ह्यात चार असे एकूण ३६३ घरांची पडझड झालेली आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊस