शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अमरावती जिल्ह्यात चार अपघातांमध्ये सात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 10:46 IST

खरपी मार्गावर तीन ठार, दुचाकी पेटल्याने चालकाचा जागीच मृत्यू

अमरावती : शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज शुक्रवारी झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात जणांनी जीव गमावला. खरपी मार्गावरील अपघातात तिघे ठार झाले, बैतूल-परतवाडा मार्गावर एका दुचाकी चालकाने जीव गमावला तर अमरावती ते चांदूर रेल्वे रोडवरील एसआरपीएफ कॅम्पपुढे बाप-लेकीचा दुर्दैवी अंत झाला. अचलपूर तालुक्यात दुचाकी पेटल्याने चालकाचा जागीच कोळसा झाला.

परतवाडा-बैतूल मार्गावरील खरपीनजीक ट्रक व ऑटोरिक्षाच्या धडकेत नऊ वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडला. मेहरा परवीन शेख मजहर (वय ९), शिरीन परवीन शेख जमीन (४२, दोन्ही रा. धारणी) व ट्रकचालक श्यामू घनश्याम धुर्वे (४२, रा. आठनेर, मध्य प्रदेश) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. ट्रकमधील दोघांसह आठ जण जखमी झाले.

बैतूल-परतवाडा मार्गावर भरधाव चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. सय्यद अल्ताफ अलीस सय्यद महमूद (३२, रा. खिडकीपुरा, अंजनगाव सुर्जी) असे मृताचे नाव आहे. त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीला वाचविताना चारचाकी रस्त्याच्या कडेला खाली उतरली. यातील सात ते आठ वऱ्हाडी जखमी झाले.

अन्य एका घटनेत भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या कारला दिलेल्या धडकेत वडील व मुलीचा करुण अंत झाला. अमरावती ते चांदूर रेल्वे रोडवरील एसआरपीएफ कॅम्पसमोरच्या वैष्णोदेवी मंदिरालगत शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास हा अपघात झाला. साहेबराव माणिकराव खरबडे (वय ६२) व रेणू साहेबराव खरबडे (२८, दोघेही रा. साईविधी अपार्टमेंट, शेगाव ते रहाटगाव रोड, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात खरबडे कुटुंबाची कार चक्काचूर झाली. साहेबराव खरबडे हे मुलगी रेणू व पत्नी विजया खरबडे (५२) यांच्यासह वर्धेहून चांदूर रेल्वे मार्गे अमरावतीकडे येत होते. रेणू ही कार चालवत होती.

दुचाकीने अचानक घेतला पेट

भरउन्हात शेताकडे निघालेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. काही कळायच्या आतच स्फोट झाला आणि दुचाकीसह तो शेतकरी घटनास्थळीच जळून खाक झाला. या दुर्दैवी घटनेत त्या दुचाकीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला, तर शेतकऱ्याचा कोळसा झाला. अचलपूर येथील ज्ञानेश्वर मधुकरराव गणगणे (४२, रा. माळीपुरा) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती