शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

१० ते २० फेब्रुवारीदरम्यान सरपंचपदासाठीची निवड प्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायत निवडणुका होऊन १५ दिवस झाले. आता सरपंचपदासाठीची आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू आहे. ही ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायत निवडणुका होऊन १५ दिवस झाले. आता सरपंचपदासाठीची आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया ४ फेब्रुवारीनंतर संपुष्टात येईल. त्यानंतर १० ते २० फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीची निवड प्रक्रिया राबविली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

१४ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, मतदान प्रक्रिया व निकालाची प्रक्रिया आटोपल्यानंतर आता सरपंचपदाचे आरक्षणसुध्दा काढण्याची प्रक्रियाही संपत आली आहे. त्यामुळे गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना सरपंच, उपसरपंचपदाचे वेध लागले आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सरपंचपद हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुला व सर्वसाधारण अशा प्रवर्गासाठी आहेत. यातील काही पदे महिलाकरिता राखीव आहे. यानुसार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड प्रक्रिया होणार आहे. आता महत्त्वाचा टप्पा असलेल्या सरपंचपदासाठी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये इच्छुकांची जोरदार रस्सीखेच दिसून येणार आहे. विशेष म्हणजे सरपंचपदावर विराजमान हाेण्यासाठी पॅनेलप्रमुखांच्या घरी इच्छुकांच्या बैठका वाढू लागल्या आहेत.

बॉक्स

कार्यक्रमाकडे लक्ष

सरपंचपदासाठीची आरक्षण सोडतीची प्रक्रिया आटोपताच ५५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवड प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात याबाबत कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यामुळे सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेच्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.