शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी खळबळ

By admin | Updated: April 26, 2015 00:24 IST

दर्यापूर, अचलपूर, धारणी, मोर्शी : शनिवारी दुपारी ११.४५ ते १२ वाजताच्या दरम्यान जिल्ह्यातील परतवाडा, दर्यापूर आणि धारणी ..

घबराट : दर्यापूर, धारणी, परतवाड्यात इमारतींना हादरे, मोर्शीतील यंत्रात नोंददर्यापूर, अचलपूर, धारणी, मोर्शी : शनिवारी दुपारी ११.४५ ते १२ वाजताच्या दरम्यान जिल्ह्यातील परतवाडा, दर्यापूर आणि धारणी तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले. नेपाळसह भारतातील अनेक ठिकाणी भूकंपाने कहर केला. भूकंपाच्या या लहरी जिल्ह्यातील काही ठिकाणी ठळकपणे जाणवल्या. मात्र, कोठूनही जीवित वा वित्तहानीचे वृत्त नाही. मोर्शी येथील अप्पर वर्धाच्या रिस्टस्केल यंत्रावर दुपारी नेपाळमधील भूकंपाच्या तीव्रतेची नोंद झाली आहे.दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथे भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले. येथील कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालयाची इमारत ७ ते १० सेकंदांपर्यंत हलल्याचा अनुभव येथील कर्मचाऱ्यांनी विशद केला. टेबलवर ठेवण्यात आलेल्या वस्तू अचानक पडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भूकंपाची चर्चा सुरू झाली. परतवाड्यात अनेक ठिकाणी काही सेकंंदांच्या फरकाने भूकंपाचे धक्के जाणवले. (लोकमत चमू)दोन वर्षांपूर्वी साद्राबाडीत झाली होती पडझड४२४ सप्टेंबर २०१३ मध्ये धारणीतील साद्राबाडी गावात रात्री ८ वाजता भूकंपाचे अनेक हादरे व थरारक आवाज गावकऱ्यांनी अनुभवले. भूगर्भातील हालचालींनी अनेक घरांना भेगा पडल्या होत्या. याच साद्राबाडीला लागून खापरखेडा हे गाव आहे. शनिवारी झालेल्या भूकंपाचे केंद्र मध्य प्रदेशात असल्याने महाराष्ट्रात त्याची कंपणे जाणवल्याची चर्चा आहे. धारणीतील भूकंपमापक यंत्र बेपत्ताधारणीपासून ४ किमी अंतरावरील खाऱ्याटेंभरु येथे १९७५ साली तापी नदी काठी भूकंपमापन यंत्र लावण्यात आले होते. हे यंत्र गेल्या १० वर्षांपासून बेपत्ता आहे. येथील सरिता भूमापन केंद्रात अधिकारीच नसल्याने शनिवारी जाणवलेल्या धक्क्यांची माहिती मिळू शकली नाही. तापी नदीच्या काठावरील धारणी तालुक्याने आजवर अनेकदा भूकंपाचे झटके अनुभवले आहेत. मोर्शी येथे ५.५ आणि ५.१ रिस्टर स्केलची नोंद अप्पर वर्धा येथील भूकंपमापन यंत्रावर शनिवारी दुपारी ११ वाजून ३२ मिनिटे ५० सेकंदाला ५.५ रिस्टर स्केल तर त्यानंतर १२ वाजून १७ मिनिटे २० सेकंदांनी ५.१ रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू १८०० कि.मी.अंतरावर असल्याचे हे भूकंपमापन यंत्र दर्शवित आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू लांब अंतरावर असल्यामुळे प्रत्यक्षात मोर्शी आणि परिसरात कोठेही भूकंपाचा प्रत्यक्ष धक्का जाणवला नाही. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. येथील भूकंपमापन केंद्र हे अती संवेदनशील असून सातत्याने भूगर्भातील नोंदी येथे घेतल्या जातात. यापूर्वी जपान, इंडोनेशिया, मध्य-पूर्व देश आणि पाकिस्तानात झालेल्या भूकंपाच्या नोंदीसुध्दा या भूकंपमापन केंद्रावर अत्यंत काटेकोरपणे नोंदविल्या गेल्या आहेत. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची नोंद अप्परवर्धा येथील भूकंपमापक यंत्रावर ५.१ रिस्टर स्केल एवढी झाली आहे. परंतु जिल्ह्यात काळी माती असल्यामुळे याचा फारसा परिणाम जिल्ह्यात झाला नाही.- किरण ग’त्ते,जिल्हाधिकारी, अमरावती भूकंपाचा धक्का जाणवला नाही. तशी माहितीही मिळाली नाही. किंवा तक्रारही आली नाही. त्यामुळे ठोस असे काही सांगता येणार नाही. शिवाय येथे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे यंत्र नाही. - मनोज लोणारकर,तहसीलदार, अचलपूरपोलीस ठाण्यात खुर्चीवर बसलो असताना दुपारी पावणेबाराच्या सुमारास खुर्ची हलल्यासारखे जाणवले. कार्यालयाबाहेर येऊन सहकाऱ्यांना विचारले असता त्यांनादेखील हाच अनुभव आल्याचे सांगितले.- गिरीश बोबडे,ठाणेदार, परतवाडाचेंबरमध्ये एका व्यक्तिसोबत चर्चा सुरू असताना अचानक चक्कर आल्यासारखे वाटले. तिसऱ्या माळ्यावरून काही लोक पळत खाली आले. दोन्ही बाजूंनी इमारत हलल्याचे सांगितले. - एस.एम.खेरडे,प्राचार्य, कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालय.दुपारी १२ वाजता महाविद्यालयाचे कामकाज सुरू असताना अचानक इमारत हलल्याचा भास झाला. टेबलवरील वस्तू खाली पडल्या. त्यानंतर लगेच नेपाळमध्ये भूकंप झाल्याचे कळले. - हेमंत धुमाळे, दारापूर अभियांत्रिकी महाविद्यालय.