शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
2
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
4
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
5
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
6
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
7
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
8
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
9
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
10
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
11
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
12
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
13
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
14
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
15
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
16
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
17
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
18
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
20
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाची धास्ती, मदतीचे हातही!

By admin | Updated: April 28, 2015 00:17 IST

नेपाळसह देशातही भूकंपाचे धक्के बसल्याने अमरावतीत भितीची लकेर उमटली आहे.

अनेक ठिकाणी जाणवली कंपणे : चर्चांना ऊत, निसर्गाचा प्रकोप भोवणार काय?, आपात्कालिन यंत्रणा सज्ज लोकमत विशेषवैभव बाबरेकर अमरावतीनेपाळसह देशातही भूकंपाचे धक्के बसल्याने अमरावतीत भितीची लकेर उमटली आहे. जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वृत्त वाहिन्या व वृत्तपत्रांमधून मिळणारी माहिती नागरिक जाणून घेत आहेत. भूकंपाचा अनुभव घेताना अमरावतीकरांनी माणुसकीचा परिचयदेखील दिला आहे. नेपाळच्या दिश्ेने मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शनिवारी झालेल्या भूकंपाची उर्ध्ववर्धा धरणावरील भूकंपमापक यंत्रावर नोंद करण्यात आली. त्यामध्ये रिस्टर स्केलवर ५.५ आणि ५.१ इतकी नोंद झाली. अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. परतवाडा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तसेच अमरावती शहरातही भूकंपाचा अनुभव नागरिकांनी घेतला. नेपाळ येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्यामुळे तेथे सर्वाधिक प्राणहानी व आर्थिक हानी झाली. रविवारी नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. भूगर्भात सातत्याने हालचाली होत असतात. मात्र, त्यांची तीव्रता अधिक असल्यास भूकंपाचे धक्के जाणवतात, असे भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यालगतच भूकंपाचे धक्के जाणवल्याने आता अमरावतीकरही प्रचंड धास्तावले आहेत. निसर्गाच्या प्रकोपाचा सामना आपल्यालाही तर करावा लागणार नाही ना, असा सवाल आहे. अशाही स्थितीती अमरावतीहून नेपाळसाठी वैद्यकीय तज्ज्ञांची चमू रवाना करण्यात आली. जिल्ह्यात ५० जणांचे शोध व बचाव पथकजिल्ह्यात ५० शासकीय कर्मचाऱ्यांचे शोध व बचाव पथक तैनात आहे. त्यांना आग, वीज, भूकंप या विषयाचे आपात्कालिन प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये शहर व ग्रामीण पोलीस, एसआरपीएफ, होमगार्ड, एनजीओ, वैद्यकीय सेवा पथक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्थ सर्व विभागांचे पथक तयार आहे. वाशिम येथील १५० नागरिक सुरक्षितवाशिम जिल्ह्यातील १५० पर्यटक नेपाळला गेले होते. ते सर्व सुरक्षित आहेत. सध्या ते नेपाळ येथील लुंबिनी येथे आहेत. अकोला येथे देशमुख नामक पर्यटक काठमांडूला आहे. सोमवारी ते विमानाने पोहोचणार आहेत. अन्य जिल्हे निरंक असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. अमरावतीचे १६ पर्यटक अयोध्या येथे दाखलनेपाळमधील भूकंपामुळे अमरावतीचे ३० पर्यटक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अमरावतीमधील १६ पर्यटक काठमांडू येथे गेले होते. ते परतीच्या प्रवासात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शहरातील शिलाबेन पोपट यांचे कुटुंबीय नेपाळ येथील काठमांडू येथे गेले होते. गोरखपूरमार्गे भारतात अयोध्या येथे सोमवारी ते दाखल झालेत. ३ मे रोजी ते अमरावतीत दाखल होतील. भूकंपाचे धक्के जाणवल्यास काय कराल?भूकंपाच्या धक्क्यांपासून संरक्षणासाठी सर्वात आधी इमारतीचा पाया मजबूत ठेवणे आवश्यक आहे. कंपणे जाणवल्यास सर्वप्रथम घराबाहेर धाव घेऊन मोकळ्या मैदानात जावे, तत्काळ आपात्कालिन शासकीय विभागाशी संपर्क करावा. भूकंपातील मृतांना झेडपीत श्रध्दांजलीनेपाळसह देशातील उत्तरप्रदेश व बिहार येथे झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, पंचायत समितीचे सभापती व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळले.भारताच्या नैसर्गिक स्थितीवरून चार झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये ३८ शहरे हायरिस्कमध्ये येतात. अमरावती दुसऱ्या व तिसऱ्या झोनमध्ये असून धोका कमी आहे. मात्र सौम्य धक्याने हानी होऊ नये, यासाठी इमारतींचा पाया मजबूत करावा.-सैय्यद फजल रहेमान खादरी, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख, अमरावती विद्यापीठसर्व ट्रॅव्हल्स कंपन्यांशी चर्चा केली असता शहरातील कोणीही नेपाळमध्ये नसल्याची माहिती आहे. खासगीरीत्या १६ जण काठमांडूला गेले होते. त्यांच्याशी संपर्क साधून स्थिती जाणून घेतली. ते सुखरुप असून रविवारी परतीच्या प्रवासाला निघाले होते. सोमवारपर्यंत ते अमरावतीत पोहोचणार आहेत.-मोहन पातुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी