शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
5
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
6
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
7
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
9
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
10
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
11
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
12
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
13
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
14
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
17
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
18
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
19
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
20
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा

९० टक्के शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांचा ठेंगा

By admin | Updated: November 13, 2014 22:55 IST

जिल्ह्यात यंदा खरिपाचे सोयाबीन निघाले नसल्याच्या कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तक्रार निवारण समितीने केलेल्या शिफारसीनुसार केवळ ७८ शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे

निकृष्ट सोयाबीन बियाणे : कृषी खात्याच्या आदेशाला केराची टोपलीगजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यात यंदा खरिपाचे सोयाबीन निघाले नसल्याच्या कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तक्रार निवारण समितीने केलेल्या शिफारसीनुसार केवळ ७८ शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे उर्वरित तक्रारंविषयी बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना ठेंगा दाखवल्याची माहिती आहे. यामध्ये शासनाच्या महाबीजसह १५ कंपन्याचा सहभाग आहे. जिल्ह्यात खरीप पिकाखाली किमान ७ लाख हेक्टर क्षेत्र होते. यापैकी नगदी पीक म्हणून अनेकांनी सोयाबीनला पसंती दिली. यंदाच्या हंगामात उशिरा पाऊस, पावसातील खंड यामुळे पेरणीला दीड महिना उशीर झाला. यामध्ये शेतकऱ्यांनी पेरलेले नामांकित कंपन्यांचेही उगवणशक्ती नसलेले बियाणे निकृष्ट निघाले. त्यामुळे ५० टक्केच उगवण झाली. परिणामी रोपांची संख्या कमी व रोगाचा प्रादुर्भाव अधिक यामुळे सरासरी उत्पन्नात मोठी घट आली.बियाणे न उगविल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्यात. कृषी विभागाच्यावतीने क्षेत्रीय पाहणी तक्रार निवारण समितीद्वारा करण्यात आली. न उगवलेल्या बियाण्यांचा पंचनामा करण्यात आला. पाहणीच्या वेळी बहुतांश ठिकाणी निकृष्ट बियाणे असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना बियाणे बदलून किंवा बियाण्यांचा परतावा देण्याचे आदेश कृषी विभागाने बजावले. काही कंपन्यांनी बियाणे बदलून देण्यास नकार देण्यात आल्याने कृषी विभागाने नोटीसही बजावली. परंतु फक्त ७८ शेतकऱ्यांना मदत मिळाली.