शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

सुरक्षा रक्षक कंत्राट, फेरनिविदा काढणार

By admin | Updated: March 15, 2016 00:35 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गौडबंगाल असल्याच्या निर्णयाप्रत प्रशासन पोहोचले असून ....

बाजार समिती प्रशासनाचा निर्णय : उच्च न्यायालयात याचिका दाखलअमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गौडबंगाल असल्याच्या निर्णयाप्रत प्रशासन पोहोचले असून आता सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी फेरनिविदा काढली जाणार आहे. याप्रकरणी एका सुरक्षा एजन्सीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, हे विशेष. जानेवारी महिन्यात बाजार समिती सुरक्षा रक्षक कंत्राट संपुष्टात आला असून नव्याने सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र बाजार समिती प्रशासनाने ही निविदा प्रक्रिया कही संचालकांच्या मर्जीनुसार राबविली असल्याची सत्यता बाहेर आली. सुरक्षा रक्षक कंत्राट निविदेची जाहिरात प्रसिद्ध करताना ती ‘मॅनेज’ करण्यात आली होती. कंत्राट प्रक्रियेची जाहिरात कुठेही दिसू नये, यासाठी स्थानिक एका वृत्तपत्रात ती प्रसिद्ध करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर सुरक्षा रक्षक कंत्राट निविदा प्रक्रियेपुरती ही जाहिरात प्रसिद्ध करण्याचा डावदेखील रचण्यात आला होता. बाजार समितीने सुरक्षा रक्षक कंत्राट निविदा प्रक्रियेत गौडबंगाल केल्याबाबतची तक्रार येथील उपनिबंधकांकडे तीन सुरक्षा रक्षक एजन्सीसह काही संचालकांनी केली होती. दरम्यान हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यामुळे एकूणच निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. परिणामी सोमवारी बाजार समिती संचालकाच्या आयोजित सभेत याविषयी चर्चादेखील करण्यात आली नाही. सुरक्षा रक्षक कंत्राट निविदा प्रक्रियेत झालेल्या गौडबंगालचे वृत्त सातत्याने ‘लोकमत’ने प्रकाशित केले. परिणामी बाजार समिती संचालकासह प्रशासनालादेखील यात लक्ष घालावे लागले. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बाजार समिती सचिवांनी उपनिबंधकांकडून कारवाईचा बडगा येण्यापूर्वीच ही निविदा प्रक्रिया गुंडाळली.(प्रतिनिधी)‘त्या’ संचालकांच्या मनसुब्यावर फिरले पाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालकांनी सुरक्षा रक्षक कंत्राट घेण्यासाठी पडद्याआड हालचाली चालविल्या होत्या. प्रशासनाला हाताशी घेऊन निविदादेखील मॅनेज करण्याचे ठरविले होते. मात्र याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे बाजार समिती प्रशासनाला निर्णय बदलावावा लागला. त्यामुळे ज्या संचालकांनी सुरक्षा रक्षक पुरविण्याचा कंत्राट घेण्याचे ठरविले होते, त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले.बाजार समितीत सुरक्षा रक्षक कंत्राटाच्या निविदेची कागदपत्रे तपासण्यात आली आहे. याबाबत काही संचालकांच्या तक्रारीदेखील प्राप्त झाल्या आहेत. उच्च न्यायालयात या प्रक्रियेविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे जुनी प्रक्रिया रद्द करण्यात आली. - भुजंगराव डोईफोडे, सचिव, बाजार समिती अमरावती