शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षक कंत्राट, फेरनिविदा काढणार

By admin | Updated: March 15, 2016 00:35 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गौडबंगाल असल्याच्या निर्णयाप्रत प्रशासन पोहोचले असून ....

बाजार समिती प्रशासनाचा निर्णय : उच्च न्यायालयात याचिका दाखलअमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गौडबंगाल असल्याच्या निर्णयाप्रत प्रशासन पोहोचले असून आता सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी फेरनिविदा काढली जाणार आहे. याप्रकरणी एका सुरक्षा एजन्सीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, हे विशेष. जानेवारी महिन्यात बाजार समिती सुरक्षा रक्षक कंत्राट संपुष्टात आला असून नव्याने सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र बाजार समिती प्रशासनाने ही निविदा प्रक्रिया कही संचालकांच्या मर्जीनुसार राबविली असल्याची सत्यता बाहेर आली. सुरक्षा रक्षक कंत्राट निविदेची जाहिरात प्रसिद्ध करताना ती ‘मॅनेज’ करण्यात आली होती. कंत्राट प्रक्रियेची जाहिरात कुठेही दिसू नये, यासाठी स्थानिक एका वृत्तपत्रात ती प्रसिद्ध करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर सुरक्षा रक्षक कंत्राट निविदा प्रक्रियेपुरती ही जाहिरात प्रसिद्ध करण्याचा डावदेखील रचण्यात आला होता. बाजार समितीने सुरक्षा रक्षक कंत्राट निविदा प्रक्रियेत गौडबंगाल केल्याबाबतची तक्रार येथील उपनिबंधकांकडे तीन सुरक्षा रक्षक एजन्सीसह काही संचालकांनी केली होती. दरम्यान हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यामुळे एकूणच निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. परिणामी सोमवारी बाजार समिती संचालकाच्या आयोजित सभेत याविषयी चर्चादेखील करण्यात आली नाही. सुरक्षा रक्षक कंत्राट निविदा प्रक्रियेत झालेल्या गौडबंगालचे वृत्त सातत्याने ‘लोकमत’ने प्रकाशित केले. परिणामी बाजार समिती संचालकासह प्रशासनालादेखील यात लक्ष घालावे लागले. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बाजार समिती सचिवांनी उपनिबंधकांकडून कारवाईचा बडगा येण्यापूर्वीच ही निविदा प्रक्रिया गुंडाळली.(प्रतिनिधी)‘त्या’ संचालकांच्या मनसुब्यावर फिरले पाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालकांनी सुरक्षा रक्षक कंत्राट घेण्यासाठी पडद्याआड हालचाली चालविल्या होत्या. प्रशासनाला हाताशी घेऊन निविदादेखील मॅनेज करण्याचे ठरविले होते. मात्र याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे बाजार समिती प्रशासनाला निर्णय बदलावावा लागला. त्यामुळे ज्या संचालकांनी सुरक्षा रक्षक पुरविण्याचा कंत्राट घेण्याचे ठरविले होते, त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले.बाजार समितीत सुरक्षा रक्षक कंत्राटाच्या निविदेची कागदपत्रे तपासण्यात आली आहे. याबाबत काही संचालकांच्या तक्रारीदेखील प्राप्त झाल्या आहेत. उच्च न्यायालयात या प्रक्रियेविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे जुनी प्रक्रिया रद्द करण्यात आली. - भुजंगराव डोईफोडे, सचिव, बाजार समिती अमरावती