शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:35 IST

मोर्शी ते परतवाडा मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात पिवळ्या मातीचा मोठ्या प्रमाणात सर्रास उपयोग सुरू आहे. परिणामी या मार्गावर उडणाऱ्या धुळीमुळे चांदूर बाजारनजीक अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देपिवळ्या मातीचा सर्रास वापर : धुळीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले; नागरिकांमध्ये संताप

सुमित हरकूट ।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : मोर्शी ते परतवाडा मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात पिवळ्या मातीचा मोठ्या प्रमाणात सर्रास उपयोग सुरू आहे. परिणामी या मार्गावर उडणाऱ्या धुळीमुळे चांदूर बाजारनजीक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन पुढे न्यावे लागत आहे.काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हिरव्या झाडांच्या कत्तलीनंतर खोदलेल्या रस्त्यात मुरुमाऐवजी मोठ्या प्रमाणात पिवळी माती भरली जात आहे. वास्तविक, काँक्रीटीकरणासाठी त्याखाली ४० मी.मी. दगड, मुरुमाचा थर आवश्यक असतो. रस्त्याची मजबुती भविष्यात किती राहील, हेच यावरून स्पष्ट होते. पिवळ्या मातीवर लगेच पाणी मारणे गरजेचे असताना एका टँकरने रस्त्याच्या कडा भिजविल्या जात आहेत. परिणामी या कच्च्या रस्त्यावरून मोठी वाहने धूळ उडवत जातात. यामुळे समोरून येणारी वाहने दिसणे कठीण असल्याने येथे नुकतेच दोन अपघात झाले आहेत.दररोज अपघातसोमवारी सकाळी ११ वाजता हैदतपूर गावानजीक पिवळ्या मातीच्या धुळीमुळे तुरीची वाहतूक करणारा ट्रक उलटला. यावेळी रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने फारशी हानी झाली नाही. मंगळवारी सकाळी एक युवक आपल्या ८० वर्षीय आजीला दुचाकीवर घेऊन जात होता. पिवळ्या मातीवरून त्यांचे वाहन घसरून वृद्धा खाली कोसळली.कुठे आहेत सुरक्षेचे उपाय?राष्ट्रीय मार्गाचे काम एचडी कन्स्ट्रक्शनतर्फे केले जात आहे. या वाहतुकीच्या रस्त्यावर कुठेही सुरक्षा कठडे, फलक दिसत नसून, केंद्र शासनाने मंजूर केलेला हा रस्ता सामान्य नागरिकांच्या जिवावर उठल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कंत्राटदाराने वेळीच सुरक्षिततेचे उपाय न केल्यास नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Accidentअपघात