शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:35 IST

मोर्शी ते परतवाडा मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात पिवळ्या मातीचा मोठ्या प्रमाणात सर्रास उपयोग सुरू आहे. परिणामी या मार्गावर उडणाऱ्या धुळीमुळे चांदूर बाजारनजीक अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देपिवळ्या मातीचा सर्रास वापर : धुळीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले; नागरिकांमध्ये संताप

सुमित हरकूट ।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : मोर्शी ते परतवाडा मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात पिवळ्या मातीचा मोठ्या प्रमाणात सर्रास उपयोग सुरू आहे. परिणामी या मार्गावर उडणाऱ्या धुळीमुळे चांदूर बाजारनजीक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन पुढे न्यावे लागत आहे.काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हिरव्या झाडांच्या कत्तलीनंतर खोदलेल्या रस्त्यात मुरुमाऐवजी मोठ्या प्रमाणात पिवळी माती भरली जात आहे. वास्तविक, काँक्रीटीकरणासाठी त्याखाली ४० मी.मी. दगड, मुरुमाचा थर आवश्यक असतो. रस्त्याची मजबुती भविष्यात किती राहील, हेच यावरून स्पष्ट होते. पिवळ्या मातीवर लगेच पाणी मारणे गरजेचे असताना एका टँकरने रस्त्याच्या कडा भिजविल्या जात आहेत. परिणामी या कच्च्या रस्त्यावरून मोठी वाहने धूळ उडवत जातात. यामुळे समोरून येणारी वाहने दिसणे कठीण असल्याने येथे नुकतेच दोन अपघात झाले आहेत.दररोज अपघातसोमवारी सकाळी ११ वाजता हैदतपूर गावानजीक पिवळ्या मातीच्या धुळीमुळे तुरीची वाहतूक करणारा ट्रक उलटला. यावेळी रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने फारशी हानी झाली नाही. मंगळवारी सकाळी एक युवक आपल्या ८० वर्षीय आजीला दुचाकीवर घेऊन जात होता. पिवळ्या मातीवरून त्यांचे वाहन घसरून वृद्धा खाली कोसळली.कुठे आहेत सुरक्षेचे उपाय?राष्ट्रीय मार्गाचे काम एचडी कन्स्ट्रक्शनतर्फे केले जात आहे. या वाहतुकीच्या रस्त्यावर कुठेही सुरक्षा कठडे, फलक दिसत नसून, केंद्र शासनाने मंजूर केलेला हा रस्ता सामान्य नागरिकांच्या जिवावर उठल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कंत्राटदाराने वेळीच सुरक्षिततेचे उपाय न केल्यास नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Accidentअपघात