शहरं
Join us  
Trending Stories
1
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
5
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
6
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
7
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
8
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
9
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
10
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
11
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
12
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
13
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
14
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
15
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
16
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
17
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
18
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
19
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
20
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या निकालावर विद्वत परिषदेची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST

राज्य शासनाने अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, हे निकाल कसे जाहीर करावे, गुणदान करण्याची प्रक्रिया, महाविद्यालयांची जबाबदारी आदी विषय स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, परीक्षा विभागाने विद्वत परिषदेच्या मान्यतेसाठी हा मुद्दा ठेवण्यापूर्वी निकाल जाहीर करण्याबाबतचे निकष, सूत्र निश्चित केले. यात विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.

ठळक मुद्देपरीक्षा विभागाचे सूत्र मान्य : अंतिम सत्र वगळून दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार गुणदान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंतिम सत्र वगळता इतर सत्रांचे निकाल जाहीर करण्याविषयी गुरुवारी विद्वत परिषदेची मोहोर उमटली. त्यामुळे आता दीड लाख विद्यार्थ्यांना गुणदान होणार असून, परीक्षाविना पुढील वर्गात त्यांना प्रवेश घेता येतील. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने निकालाबाबत ठरविलेले सूत्र विद्वत परिषदेने मंजूर केले आहे. यादरम्यान निकालात काही बदल करण्याचे अधिकार कुलगुरुंना बहाल करण्यात आले आहे.राज्य शासनाने अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, हे निकाल कसे जाहीर करावे, गुणदान करण्याची प्रक्रिया, महाविद्यालयांची जबाबदारी आदी विषय स्पष्ट झाले नव्हते.दरम्यान, परीक्षा विभागाने विद्वत परिषदेच्या मान्यतेसाठी हा मुद्दा ठेवण्यापूर्वी निकाल जाहीर करण्याबाबतचे निकष, सूत्र निश्चित केले. यात विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. त्याअनुषंगाने गुरुवारी विद्वत परिषदेच्या आॅनलाईन बैठकीत परीक्षा विभागाने तयार केलेल्या निकालाबाबतची नियमावली, सूत्रांवर सदस्यांनी चर्चा केली. त्यानंतर निकाल तयार करण्याच्या कार्यप्रणालीवर विद्वत परिषदेने मोहोर उमटवली.अशी असेल नवी कार्यप्रणालीपरीक्षांच्या अभ्यासक्रमिकेत ज्या परीक्षांना सर्व विषयांना अंतर्गत गुण असतील आणि मागील सत्राची या अगोदर परीक्षा झालेली असेल, अशा परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक, प्रक ल्प परीक्षांना गुणदान करण्यात येतील. परीक्षेत काही विषयांना अंतर्गत सत्र गुण असतील, तर काही विषयांना अंतर्गत सत्र गुण नसतील. मागील लगतच्या सत्राची या अगोदर परीक्षा झाली आहे, अशा परीक्षांना लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प परीक्षांचे गुण दिले जाणार आहे. अंतर्गत सत्र गुणांच्या टक्केवारीप्रमाणे लेखी गुण मिळतील. गुणपत्रिकेवर कोविड असा कोणताही उल्लेख असणार नाही, असा निर्णय झाला.विद्वत परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत दीड लाख विद्यार्थ्यांना गुणदान मिळणार आहे. अंतिम सत्र परीक्षाविना गुणपत्रिका दिली जाणार असून, पुढील वर्षात प्रवेश दिला जाणार आहे.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन.

टॅग्स :universityविद्यापीठ