शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

स्क्रब टायफसचे आणखी सहा ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:13 IST

जिल्ह्यात स्क्रब टायफसने आतापर्यंत तीन बळी घेतले. आतापर्यंत जिल्ह्यात स्क्रब टायफसचे ३९ रुग्णांमध्ये काही संशयित, तर बहुतांश पॉझिटिव्ह आढळले. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आता पुन्हा स्क्रब टायफसचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

ठळक मुद्देएकूण संख्या ४५ : प्रशासन कुंभकर्णी झोपेत

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात स्क्रब टायफसने आतापर्यंत तीन बळी घेतले. आतापर्यंत जिल्ह्यात स्क्रब टायफसचे ३९ रुग्णांमध्ये काही संशयित, तर बहुतांश पॉझिटिव्ह आढळले. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आता पुन्हा स्क्रब टायफसचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.सहापैकी चार रुग्ण हे डॉ. मनोज निचत यांच्या राजापेठ येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. एक रुग्ण डॉ. राजेश मुंदे यांच्याकडे, तर एक बोंडे हायटेक क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. बोंडे हॉस्पिटलमध्ये तिवसा तालुक्यातील कुºहा मिर्झापूर येथील एक ३२ वर्षीय महिला चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाली आहे. तिचे रक्तनमुने व खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता, स्क्रब टायफस या आजाराच्या निदानासाठी उपयुक्त असलेली इलायझा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉ. स्वप्निल शिरभाते यांनी दिली. राजापेठ येथील डॉ. राजेश मुंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये कामरगाव (ता. कारंजा) येथील एक २० वर्षीय युवक चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालानांदगाव तालुक्यात तीन रुग्णअमरावती : कामरगावच्या रुग्णाचीसुद्धा इलायझा कन्फर्म आहे तसेच डॉ. मनोज निचत यांच्याकडे ३९ पैकी सर्वाधिक १६ रुग्ण ‘स्क्रब टायफस’ या आजाराचे आढळून आले. त्यापैकी एका महिला रुग्ण उपचारादरम्यान दगावली. बुधवारी आणखी चार नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथील ६५ वर्षीय महिला, पाळा येथील ३२ वर्षीय महिला, घारफळ (लोणी) येथील ५० वर्षीय महिला तसेच चंडिकापूर (ता. दर्यापूर) येथील ५० वर्षीय पुरुष रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. निचत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यापूर्वीसुद्धा जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे १३६ अधिक रुग्ण आढळून आल्याचा शासकीय अहवाल आला होता.खासगी डॉक्टरांकडे अशा रुग्णांची संख्या दहापट अधिक होती. खासगी डॉक्टरांनी डेंग्यूबाबत प्रशासनाला सतर्क केले होते. आता अशी स्थिती स्क्रब टायफस या आजारासंदर्भात सुद्धा निर्माण झाली असून जिल्हा आरोग्य प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने सावध होणे गरजेचे आहे.४५ रुग्ण; आरोग्य प्रशासन गप्प का?जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चे आतापर्यंत ४५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तिघांना जीवसुद्धा गमावावा लागला. मात्र, जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा, जिल्हा शल्यचिकित्सक व महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने हा विषय पाहिजे तेवढा गांभीर्याने घेतला नाही. ज्या भागात ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण आढळून येत आहेत, त्या ठिकाणी फवारणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना शून्य आहेत. लोकांचा जीव धोक्यात असताना आरोग्य यंत्रणा कुंभकर्णी झोपेत का, असा प्रश्न आता पुढे येत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य