शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रब टायफसचे आणखी सहा ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:13 IST

जिल्ह्यात स्क्रब टायफसने आतापर्यंत तीन बळी घेतले. आतापर्यंत जिल्ह्यात स्क्रब टायफसचे ३९ रुग्णांमध्ये काही संशयित, तर बहुतांश पॉझिटिव्ह आढळले. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आता पुन्हा स्क्रब टायफसचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

ठळक मुद्देएकूण संख्या ४५ : प्रशासन कुंभकर्णी झोपेत

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात स्क्रब टायफसने आतापर्यंत तीन बळी घेतले. आतापर्यंत जिल्ह्यात स्क्रब टायफसचे ३९ रुग्णांमध्ये काही संशयित, तर बहुतांश पॉझिटिव्ह आढळले. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आता पुन्हा स्क्रब टायफसचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.सहापैकी चार रुग्ण हे डॉ. मनोज निचत यांच्या राजापेठ येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. एक रुग्ण डॉ. राजेश मुंदे यांच्याकडे, तर एक बोंडे हायटेक क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. बोंडे हॉस्पिटलमध्ये तिवसा तालुक्यातील कुºहा मिर्झापूर येथील एक ३२ वर्षीय महिला चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाली आहे. तिचे रक्तनमुने व खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता, स्क्रब टायफस या आजाराच्या निदानासाठी उपयुक्त असलेली इलायझा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉ. स्वप्निल शिरभाते यांनी दिली. राजापेठ येथील डॉ. राजेश मुंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये कामरगाव (ता. कारंजा) येथील एक २० वर्षीय युवक चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालानांदगाव तालुक्यात तीन रुग्णअमरावती : कामरगावच्या रुग्णाचीसुद्धा इलायझा कन्फर्म आहे तसेच डॉ. मनोज निचत यांच्याकडे ३९ पैकी सर्वाधिक १६ रुग्ण ‘स्क्रब टायफस’ या आजाराचे आढळून आले. त्यापैकी एका महिला रुग्ण उपचारादरम्यान दगावली. बुधवारी आणखी चार नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथील ६५ वर्षीय महिला, पाळा येथील ३२ वर्षीय महिला, घारफळ (लोणी) येथील ५० वर्षीय महिला तसेच चंडिकापूर (ता. दर्यापूर) येथील ५० वर्षीय पुरुष रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. निचत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यापूर्वीसुद्धा जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे १३६ अधिक रुग्ण आढळून आल्याचा शासकीय अहवाल आला होता.खासगी डॉक्टरांकडे अशा रुग्णांची संख्या दहापट अधिक होती. खासगी डॉक्टरांनी डेंग्यूबाबत प्रशासनाला सतर्क केले होते. आता अशी स्थिती स्क्रब टायफस या आजारासंदर्भात सुद्धा निर्माण झाली असून जिल्हा आरोग्य प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने सावध होणे गरजेचे आहे.४५ रुग्ण; आरोग्य प्रशासन गप्प का?जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चे आतापर्यंत ४५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तिघांना जीवसुद्धा गमावावा लागला. मात्र, जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा, जिल्हा शल्यचिकित्सक व महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने हा विषय पाहिजे तेवढा गांभीर्याने घेतला नाही. ज्या भागात ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण आढळून येत आहेत, त्या ठिकाणी फवारणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना शून्य आहेत. लोकांचा जीव धोक्यात असताना आरोग्य यंत्रणा कुंभकर्णी झोपेत का, असा प्रश्न आता पुढे येत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य