शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

ई-लर्निंग क्लासबाबत शाळेमधील विद्यार्थी अनभिज्ञ

By admin | Updated: December 16, 2014 22:44 IST

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये, यासाठी जिल्हा परिषदमधील बहुतांश शाळांमध्ये ई-लर्निंग क्लासेस सुरू करण्यात आले. या विषयीचा आढावा घेतला असता

अमरावती : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये, यासाठी जिल्हा परिषदमधील बहुतांश शाळांमध्ये ई-लर्निंग क्लासेस सुरू करण्यात आले. या विषयीचा आढावा घेतला असता या क्लासेसबाबत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. संगणक मात्र गुरुजींच्या फावल्या वेळातील खेळासाठीच उपयोगी आहे. काही विजेची सोय नसल्याने तेथील संगणक धुळखात पडले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत असल्याने खासगी शाळांनी या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र माघारण्याची वस्तुस्थिती आहे. कालांतराने ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने राज्यातील काही जिल्हा परिषद शाळेत हा प्रयोग राबविल्या गेला. ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ४६ शाळांचा समावेश आहे. ‘ई-लर्निंग क्लासेस अंतर्गत सदर शाळांमधील विद्यार्थ्यांना, दृकश्राव्य माध्यमाद्वारे कविता भाषा इतिहास, गणित यासारखे विषय विद्यार्थ्यांा शिकविण्यासाठी या शाळांमध्ये डिजीटल बोर्डचा वापर करण्यात येत आहे. परिणामी हसत खेळत विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याने शिक्षक तसेच पालकांकडून सुद्धा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सतत अपडेट ठेवावे लागत आहे. यासाठी शाळांमध्येही तेवढेच सजग राहण्याची गरज आहे. ई-लर्निंग क्लासेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंटरनेटवरील अपडेट माहिती डिजीटल बोर्डावर दाखविण्यात येते. दृकश्राव्य माध्यमाद्वारे अतिशय कमी वेळात अधिक परिणामकारक प्रभाव साधल्या जातो. त्यामुळे ई-लर्निंग क्लासेस हा उपक्रम विद्यार्थ्यांना संजीवनी प्रदान करणारा ठरत आहे. ज्या शाळांमध्ये आहे तिथे इंटरनेटची सुविधा,विजेचे कनेक्शन देणे महत्वाचे आहे. (प्रतिनिधी)