शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

भिरोजा येथील शाळा कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST

लोकमत विशेष चिखलदरा : इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्र १५ जुलैनंतर सुरू झाले आहे. परंतु, तालुक्यातील भिरोजा ...

लोकमत विशेष

चिखलदरा : इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्र १५ जुलैनंतर सुरू झाले आहे. परंतु, तालुक्यातील भिरोजा येथील माध्यमिक विद्यालय अद्याप टाळेबंद असल्याचे चौकशी समितीला आढळून आले. त्यामुळे मेळघाटातील शैक्षणिक दुकानदारी पुन्हा चर्चेत आली आहे.

भिरोजा येथील साईबाबा माध्यमिक विद्यालयात शासनातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणारा पोषण आहार व शिष्यवृत्तीमध्ये घोळ प्रशासकीय बाबीमध्ये अनियमितता असल्याची तक्रार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना प्राप्त झाली होती. त्यासंदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सदस्य समितीला चौकशीचे आदेश दिले होते. २१ सप्टेंबरपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र पाठवण्यात आले होते. समितीमध्ये चिखलदरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडके, विस्तार अधिकारी रामेश्वर माळवे व शालेय पोषण आहार अधीक्षक नीलेश तालन यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, या समितीच्या सदस्यांना येथे गेल्यावर धक्काच बसला.

इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शाळा सुरू असल्या तरी वर्गखोल्यांना कुलूप असल्याचे आढळून आले त्यामुळे चौकशी समितीला चौकशी करता आली नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी संदीप बोडके यांच्याशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही

बॉक्स

आदिवासी विद्यार्थ्यांची परवड

मेळघाटात संस्था उघडून शैक्षणिक दुकानदारी सुरू असली तरी कायम विनाअनुदानित तत्त्वावर भिरोजा येथील ही शाळा आहे. शासनाने १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत वर्ग सुरू केले असले तरी या शाळेला कुलूप असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही आता आदिवासी पालकांनी केला आहे

बॉक्स

माध्यमिक शिक्षणाधिकारी झोपेतच?

अमरावती येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या अधिनस्थ असलेल्या मेळघाटातील माध्यमिक शाळा कुलूपबंद असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तक्रार मिळाल्यावर चौकशीचे आदेश दिले. तोपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व त्यांच्या अधिनस्थ अधिकारी मेळघाटात फिरकतच नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भिरोजा शाळेवरील २१ सप्टेंबरपर्यंत चौकशी अहवाल प्राप्त झाला का, पुढील कारवाई काय, या संदर्भात वारंवार मोबाईलवर संपर्क केला व संदेश पाठविला असता, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल्ल कचवे हे मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचे दिसून आले.