शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अभियांत्रिकी, फार्मसी, कृषीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली अन् महाविद्यालयांनी टीसी रोखली

By गणेश वासनिक | Updated: August 29, 2023 21:32 IST

विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण थांबले; शिष्यवृत्तीची रक्कम द्या, नंतरच मिळेल टीसी; संस्था चालकांचा पवित्रा

अमरावती : केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सर्वसाधारण, ओबीसी, एससी आणि व्हीजेएनटी संवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, फार्मसी, कृषीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होऊनही पुढील प्रवेशासाठी लागणारी टीसी महाविद्यालयाकडून दिली जात नाही. तर दुसरीकडे शिष्यवृत्तीची रक्कम द्या, नंतरच टीसी घ्या, असा पवित्रा शैक्षणिक संस्था चालकांनी घेतला आहे.

केंद्र सरकारचे ६० तर, राज्य सरकारचे ४० टक्के अशी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र, गत दोन वर्षांपासून केंद्र सरकारच्या वाट्याची शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकही त्रस्त झाले आहेत. अभियांत्रिकी, फार्मसी, मेडिकल, कृषीच्या विद्यार्थ्यांचा हा गंभीर विषय राज्यभरात चांद्यापासून बांद्यापर्यंत निर्माण झाला आहे.

शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्ती अनियमिततेमुळे त्रस्त झाले आहेत. शिष्यवृत्तीची रक्कम परत मिळणार म्हणून अनेक संस्था चालक विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. परंतु, गत चार वर्षांपासून शिष्यवृत्तीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे शासनाला मागास विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊ द्यायचे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. शिष्यवृत्तीअभावी अनेक महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याची माहिती आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिष्यवृत्तीच्या नियंत्रणासाठी प्री रेग्युलेटरी समिती गठित आहे. तर केंद्र सरकारकडून शिष्यवृत्तीच्या ६० टक्के वाटा थेट नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होतो. राज्य शासनाने शिष्यवृत्तीच्या यंदा ५०८ कोटींचा निधी वितरित केला आहे. केवळ ८१ कोटी बाकी असून ते देखील लवकरच वितरित होतील.- सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग.

 

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालयScholarshipशिष्यवृत्ती