शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

टंचाईग्रस्त गावे, टॅंकरमुक्तीचा प्रस्ताव बारगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST

अमरावती : दरवर्षी उन्हळयात चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यावर दरवर्षी उपाययोजनांसाठी निधी खर्च ...

अमरावती : दरवर्षी उन्हळयात चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यावर दरवर्षी उपाययोजनांसाठी निधी खर्च करण्यात येतो. सतत होणारा खर्च टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांचा प्रस्ताव गतवर्षी ११ जुलै रोजी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीने घेतला होता. मात्र, तेव्हापासून हा प्रस्तावच पाणीपुरवठा विभागाकडून बेदखलरीत्या पडून आहे.

चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावात उन्हाळयाच्या दिवसात पिण्याचे पाण्याचा पुरवठा टँकरव्दारे करावा लागतो. विशेष म्हणजे ही गावे दरवर्षी पाणी टंचाईच्या आराखडयात समाविष्ट असतात. यावर उपाययोजनांसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे एकझिरा, तारुबांदा, धरमडोह, मनभंग, पाचडोंगरी, कोरडा, कोयलारी अशा विविध गावांत उन्हाळयात पाणीटंचाई भासते. यामुळे कायमस्वरुपी पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यसाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकारण विभागाकडे सादर केला होता. परंतु या विभागाने पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देत सदर कामाला नकार दिला होता. परिणामी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्ट्रीने झेडपी पाणीपुरवठा विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलव्यवस्थापन समिती सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी मजीप्राला दिल्या होत्या. मात्र, या प्रस्तावावर पुढे काय झाले याचा अजूनही थांगपत्ता नाही.