शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त गावे, टॅंकरमुक्तीचा प्रस्ताव बारगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST

अमरावती : दरवर्षी उन्हळयात चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यावर दरवर्षी उपाययोजनांसाठी निधी खर्च ...

अमरावती : दरवर्षी उन्हळयात चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यावर दरवर्षी उपाययोजनांसाठी निधी खर्च करण्यात येतो. सतत होणारा खर्च टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांचा प्रस्ताव गतवर्षी ११ जुलै रोजी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीने घेतला होता. मात्र, तेव्हापासून हा प्रस्तावच पाणीपुरवठा विभागाकडून बेदखलरीत्या पडून आहे.

चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावात उन्हाळयाच्या दिवसात पिण्याचे पाण्याचा पुरवठा टँकरव्दारे करावा लागतो. विशेष म्हणजे ही गावे दरवर्षी पाणी टंचाईच्या आराखडयात समाविष्ट असतात. यावर उपाययोजनांसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे एकझिरा, तारुबांदा, धरमडोह, मनभंग, पाचडोंगरी, कोरडा, कोयलारी अशा विविध गावांत उन्हाळयात पाणीटंचाई भासते. यामुळे कायमस्वरुपी पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यसाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकारण विभागाकडे सादर केला होता. परंतु या विभागाने पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देत सदर कामाला नकार दिला होता. परिणामी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्ट्रीने झेडपी पाणीपुरवठा विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलव्यवस्थापन समिती सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी मजीप्राला दिल्या होत्या. मात्र, या प्रस्तावावर पुढे काय झाले याचा अजूनही थांगपत्ता नाही.