शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईची तीव्रता वाढली; तीन गावांना चार टँकरने पाणीपुरवठा

By जितेंद्र दखने | Updated: April 17, 2024 18:34 IST

यंदा २१ कोटी १८ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जवळपास ७६७ गावे टंचाईच्या छायेत आहेत, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत.

अमरावती : एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्रतेकडे वाटचाल करीत आहेत. चिखलदरा तालुक्यातील तीन गावांना चार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू केला जात आहे. याशिवाय अनेक गावांता खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागविण्याचे काम प्रशासनाला करावे लागत आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही गावांना टँकर लागण्याची शक्यता आहे.सध्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील चुर्णी, कोरडा आणि चुनखडी या तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

विशेष म्हणजे मागील आठवड्यात केवळ एकाच गावाला टँकर होता. सहा किलोमीटर अंतरावरील एका गावात खासगी विहिरीचे अधिग्रहण करून तेथून टँकरद्वारे पाणी आणून ते तहानलेल्या गावांना दिले जात आहे. यंदा २१ कोटी १८ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जवळपास ७६७ गावे टंचाईच्या छायेत आहेत, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत. ३० गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी अपेक्षेपेक्षा फारच कमी पावसाळा झाल्याने यंदा टंचाईची तीव्रता वाढणार हे गृहीत धरून कृती आराखड्यामध्ये ३० गावांना टँकरद्वाो पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. काही गावांमध्ये फेब्रुवारीपासूनच टंचाई जाणवत आहे.

या गावांना लागणार टँकरचिखलदरा तालुक्यातील बगदरी, बेला, खिरपाणी, भीलखेडा, माखला, गवळीढोणा, भवई, खोगडा, रायपूर, आकी, मोथा, खडीमल, गौलखेडा बाजार, सोनापूर, मांजरकापडी, पाचडोंगरी, कोरडा, कारदा, बहाद्दरपूर, सोमवारखेडा, धरमडोह, एकझिरा, तर चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, तिवसा तालुक्यातील काटसूर, इसापूर, तारखेडा, फत्तेपर या गावांना पुढील काही दिवसांत टँकर लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAmravatiअमरावती