शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

टंचाईची तीव्रता वाढली; तीन गावांना चार टँकरने पाणीपुरवठा

By जितेंद्र दखने | Updated: April 17, 2024 18:34 IST

यंदा २१ कोटी १८ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जवळपास ७६७ गावे टंचाईच्या छायेत आहेत, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत.

अमरावती : एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्रतेकडे वाटचाल करीत आहेत. चिखलदरा तालुक्यातील तीन गावांना चार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू केला जात आहे. याशिवाय अनेक गावांता खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागविण्याचे काम प्रशासनाला करावे लागत आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही गावांना टँकर लागण्याची शक्यता आहे.सध्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील चुर्णी, कोरडा आणि चुनखडी या तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

विशेष म्हणजे मागील आठवड्यात केवळ एकाच गावाला टँकर होता. सहा किलोमीटर अंतरावरील एका गावात खासगी विहिरीचे अधिग्रहण करून तेथून टँकरद्वारे पाणी आणून ते तहानलेल्या गावांना दिले जात आहे. यंदा २१ कोटी १८ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जवळपास ७६७ गावे टंचाईच्या छायेत आहेत, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत. ३० गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी अपेक्षेपेक्षा फारच कमी पावसाळा झाल्याने यंदा टंचाईची तीव्रता वाढणार हे गृहीत धरून कृती आराखड्यामध्ये ३० गावांना टँकरद्वाो पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. काही गावांमध्ये फेब्रुवारीपासूनच टंचाई जाणवत आहे.

या गावांना लागणार टँकरचिखलदरा तालुक्यातील बगदरी, बेला, खिरपाणी, भीलखेडा, माखला, गवळीढोणा, भवई, खोगडा, रायपूर, आकी, मोथा, खडीमल, गौलखेडा बाजार, सोनापूर, मांजरकापडी, पाचडोंगरी, कोरडा, कारदा, बहाद्दरपूर, सोमवारखेडा, धरमडोह, एकझिरा, तर चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, तिवसा तालुक्यातील काटसूर, इसापूर, तारखेडा, फत्तेपर या गावांना पुढील काही दिवसांत टँकर लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAmravatiअमरावती