शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सतीश मडावीला वीरमरण; समाजमन गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:31 IST

अवैध धंदेवाईकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सतीश मडावीच्या आकस्मिक मृत्यूने त्याचे कुटुंबीयच नव्हे, समाजमन सुन्न झाले. कारवाईवेळी पोलिसांवर हल्ला होऊन हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे.

ठळक मुद्देआकस्मिक हल्ला : कुटुंब पोरके, असामाजिक तत्त्वांनी केला निर्घृण खून, अमरावतीत अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : अवैध धंदेवाईकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सतीश मडावीच्या आकस्मिक मृत्यूने त्याचे कुटुंबीयच नव्हे, समाजमन सुन्न झाले. कारवाईवेळी पोलिसांवर हल्ला होऊन हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. केवळ वेतन घेण्यासाठी नोकरी नसून आपल्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली, तिचे वहन करताना सामाजिक बांधिलकी जोपासणारा पोलीस कर्मचारी म्हणून मडावी पोलीस दलात ओळखले जायचे. चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सतीश मडावी यांना अवैध धंद्यावर धाड टाकताना जे वीरमरण आले, त्या घटनेवरून अवैध व्यवसायांवर धाड टाकताना मोठा ताफा घेऊन जाण्याची खबरदारी पोलीस यंत्रणेला घ्यावी लागणार असल्याची प्रतिक्रिया उमटली. ठाणेदार ब्रम्हानंद शेळके यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मडावी यांच्या आकस्मिक जाण्याने मोठा मानसिक धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच सतीश मडावीची पत्नी, आई, ११ वर्षांची मुलगी, ६ वर्षांचा मुलगा चांदूररेल्वेत दाखल झाले. ग्रामीण रूग्णालयात पतीचे पार्थिव पाहताना त्यांच्या पत्नीचा आक्रोश मन हेलावणारा होता. मडावी मूळचे यवतमाळ जिल्ह्यातले होते. ते अमरावती शहरात कार्यरत असताना त्यांनी पोटे टाऊनशिपमध्ये घर विकत घेतले. मुलांचे शिक्षण दर्जेदार शाळेतून व्हावे, यासाठीच ते अमरावतीला स्थायिक झाले होते. सतीश मडावी यांची जी हत्या झाली ती अतिशय क्रूरतेनेच. गरम पाणी फेकणे, पायावर मारणे, खाली पडताच त्यांच्या डोक्यावर मोठा दगड घालण्यात आला. सकाळी ८.४५ वाजता सतीश मडावी यांनी मांजरखेड येथील रहिवासी माधव कावलकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत हल्ल्याची माहिती दिली. कावलकर पोलीस पाटील प्रफुल्ल गुल्हाने यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले असता मडावी मृतावस्थेत आढळले.चूक की दुर्लक्ष?गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी दोन्ही पोलीस नि:शस्त्र गेले होते. त्यामुळे ते आरोपींचा कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करू शकले नाहीत. ही चूक की दुर्लक्ष, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आरोपींनी हल्ला केल्यानंतर दोन्ही पोलिसांच्या अंगावर उकळते पाणी फेकल्याचे आढळून आले आहे. हल्ल्याची स्थिती निर्माण होईल, याविषयी पोलिसांनी सतर्कता बाळगली नाही, त्याबाबत चांदुररेल्वेत चर्चा सुरु होती.