शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सतीश मडावीला वीरमरण; समाजमन गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:31 IST

अवैध धंदेवाईकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सतीश मडावीच्या आकस्मिक मृत्यूने त्याचे कुटुंबीयच नव्हे, समाजमन सुन्न झाले. कारवाईवेळी पोलिसांवर हल्ला होऊन हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे.

ठळक मुद्देआकस्मिक हल्ला : कुटुंब पोरके, असामाजिक तत्त्वांनी केला निर्घृण खून, अमरावतीत अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : अवैध धंदेवाईकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सतीश मडावीच्या आकस्मिक मृत्यूने त्याचे कुटुंबीयच नव्हे, समाजमन सुन्न झाले. कारवाईवेळी पोलिसांवर हल्ला होऊन हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. केवळ वेतन घेण्यासाठी नोकरी नसून आपल्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली, तिचे वहन करताना सामाजिक बांधिलकी जोपासणारा पोलीस कर्मचारी म्हणून मडावी पोलीस दलात ओळखले जायचे. चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सतीश मडावी यांना अवैध धंद्यावर धाड टाकताना जे वीरमरण आले, त्या घटनेवरून अवैध व्यवसायांवर धाड टाकताना मोठा ताफा घेऊन जाण्याची खबरदारी पोलीस यंत्रणेला घ्यावी लागणार असल्याची प्रतिक्रिया उमटली. ठाणेदार ब्रम्हानंद शेळके यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मडावी यांच्या आकस्मिक जाण्याने मोठा मानसिक धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच सतीश मडावीची पत्नी, आई, ११ वर्षांची मुलगी, ६ वर्षांचा मुलगा चांदूररेल्वेत दाखल झाले. ग्रामीण रूग्णालयात पतीचे पार्थिव पाहताना त्यांच्या पत्नीचा आक्रोश मन हेलावणारा होता. मडावी मूळचे यवतमाळ जिल्ह्यातले होते. ते अमरावती शहरात कार्यरत असताना त्यांनी पोटे टाऊनशिपमध्ये घर विकत घेतले. मुलांचे शिक्षण दर्जेदार शाळेतून व्हावे, यासाठीच ते अमरावतीला स्थायिक झाले होते. सतीश मडावी यांची जी हत्या झाली ती अतिशय क्रूरतेनेच. गरम पाणी फेकणे, पायावर मारणे, खाली पडताच त्यांच्या डोक्यावर मोठा दगड घालण्यात आला. सकाळी ८.४५ वाजता सतीश मडावी यांनी मांजरखेड येथील रहिवासी माधव कावलकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत हल्ल्याची माहिती दिली. कावलकर पोलीस पाटील प्रफुल्ल गुल्हाने यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले असता मडावी मृतावस्थेत आढळले.चूक की दुर्लक्ष?गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी दोन्ही पोलीस नि:शस्त्र गेले होते. त्यामुळे ते आरोपींचा कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करू शकले नाहीत. ही चूक की दुर्लक्ष, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आरोपींनी हल्ला केल्यानंतर दोन्ही पोलिसांच्या अंगावर उकळते पाणी फेकल्याचे आढळून आले आहे. हल्ल्याची स्थिती निर्माण होईल, याविषयी पोलिसांनी सतर्कता बाळगली नाही, त्याबाबत चांदुररेल्वेत चर्चा सुरु होती.