शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

मेळघाटातील वणव्यावर 'सॅटॅलाइट'ने लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ८३९ चौरस किलोमीटर क्षेत्रावर सिपना वन्यजीव विभागाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ७९३ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. त्या भागात चराई करणे, मोहफुले वेचणे, तसेच द्वेषभावनेतून वणवासारख्या मोठ्या घटना घडल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. हा वन वणवा लोकसहभागाशिवाय नियंत्रणात आणणे शक्य नाही. गतवर्षी सिपना वन्यजीव विभागात वन वणव्याच्या २१८ घटना घडल्याची नोंद आहे. त्यामध्ये २२०६ हेक्टर क्षेत्र जळून राख झाले. हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एकूण क्षेत्राच्या २.७८ टक्के क्षेत्र आहे.

ठळक मुद्देनियंत्रणाकरिता लोकसहभाग आवश्यक : रायपूर, बोराट्याखेडा ठरले उत्तम उदाहरण

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अतिसंरक्षित जंगलांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात वनवणवा पेटतो. ते थांबवण्यासाठी स्थानिक लोकसभाग आवश्यक असून, सिपना वन्यजीव विभागांतर्गत बोराट्याखेडा व रायपूर परिसरात ६० दिवसांत आगीची एकही घटना घडली नाही. लोकसहभागाचे ते एक उत्तम उदाहरण ठरले आहे. दरम्यान मेळघाटातील वणव्यावर 'सॅटेलाईट'ने लक्ष ठेवले जाणार आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ८३९ चौरस किलोमीटर क्षेत्रावर सिपना वन्यजीव विभागाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ७९३ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. त्या भागात चराई करणे, मोहफुले वेचणे, तसेच द्वेषभावनेतून वणवासारख्या मोठ्या घटना घडल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. हा वन वणवा लोकसहभागाशिवाय नियंत्रणात आणणे शक्य नाही. गतवर्षी सिपना वन्यजीव विभागात वन वणव्याच्या २१८ घटना घडल्याची नोंद आहे. त्यामध्ये २२०६ हेक्टर क्षेत्र जळून राख झाले. हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एकूण क्षेत्राच्या २.७८ टक्के क्षेत्र आहे.वनवा नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यानुसार सिपना वन्यजीव विभागामध्ये ग्राम परिस्थिती विकास समितीची आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये परिसरातील आदिवासींनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत गाभा क्षेत्रात १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिलपर्यंत वन वणव्याची एकही घटना न घडल्यास १० हजार रुपये, १५ फेब्रुवारी ते १५ मेपर्यंत वणव्याची घटना न घडल्यास ३० हजार रुपये, तर १५ फेब्रुवारी ते वन हंगाम संपेपर्यंत एकही न घटना घडल्यास ६० हजार रुपये, असे बक्षीस घोषित करण्यात आले आहे.बोराट्याखेडा, रायपूरचे ग्रामस्थ सहभागीसिपना वन्यजीव विभागाच्या रायपूर परिक्षेत्रातील बोराट्याखेडा व रायपूर या गावांनी व्यापक प्रतिसाद दिला. ही दोन्ही गावे अतिसंरक्षित क्षेत्रात आहेत. गावाशेजारी जंगलामध्ये उन्हाळा सुरू झाल्यापासून १५ एप्रिलपर्यंत एकही आगीची घटना घडली नाही. आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्याचे काम लक्षात घेता या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिला.असे ठेवले जाते आगीवर नियंत्रणफॉरेस्ट सर्व्हे ऑफइंडिया (नासा) या वेबसाईटवर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे प्रमाण नोंदविण्यात आले आहे. सिपना वन्यजीव विभागांतर्गत पाच परिक्षेत्रात मोक्याच्या १७ ठिकाणी आग निरीक्षण टॉवर लावले आहेत. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा कर्मचारी तैनात आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक उपवनसंरक्षक शिवाबाला, वनपरिक्षेत्र अधिकारी व क्षेत्र कर्मचारी लक्ष ठेवून आहेत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या