शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

वाळूचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:37 IST

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यात काही रेतीघाटांवरून वाळूचा उपसा बंद असला तरी मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवली जात आहे. त्याचवेळी बंदचा बाऊ करीत व्यावसायिकांकडून ती चढ्या दराने विकली जात आहे. याचा बांधकामावर परिणाम होत आहे, शिवाय अवैधरीत्या आणली जाणारी वाळू महसूल विभागाला दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देबांधकामांवर परिणाम : अवैध साठ्यांना महसूल विभागाचा ‘आशीर्वाद’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यात काही रेतीघाटांवरून वाळूचा उपसा बंद असला तरी मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवली जात आहे. त्याचवेळी बंदचा बाऊ करीत व्यावसायिकांकडून ती चढ्या दराने विकली जात आहे. याचा बांधकामावर परिणाम होत आहे, शिवाय अवैधरीत्या आणली जाणारी वाळू महसूल विभागाला दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वाळू तस्करीत तलाठी, नायब तहसीलदार ते तहसीलदार अशी साखळी असल्यामुळेच उपसा बंद असूनही शहरातील गल्ली-बोळात वाळूचे अवैध साठे आढळतात. घरे, सदनिका, सरकारी रस्ते, शॉपींग कॉम्प्लेक्स, क्रीडांगण आदी बांधकामे ही उन्हाळ्यात केली जातात. मात्र, वाळू अव्वाच्या सव्वा दराने विकली जात असल्याने याचा आर्थिक फटका घरमालकांना सहन करावा लागत आहे. दुसरीकडे वाळूअभावी अर्धवट कामे बंद ठेवण्याचा प्रसंग बांधकाम व्यावसायिकांवर आला आहे. चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागत असल्याने बिल्डर्स, बांधकाम व्यावसायीकांचे नियोजन कोलमडले आहे. शहरात तस्कर मात्र विनारॉयल्टी वाळू विक्रीसाठी आणत असून, याचा फटका महसूल विभागाला बसत आहे. रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुलांची बांधकामे सुरू असून, त्यासाठी जादा दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. दोन ब्रास वाळूसाठी १६ ते १८ हजार रुपये मोजावे लागत असल्याने मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांचा घर बांधणीचा वेग मंदावला आहे. वाळूअभावी बांधकामे मंदावल्यामुळे कुशल-अर्धकुशल कामगारांची काम शोधण्यासाठी भटकंती होत आहे. अमरावती व बडनेरा शहरात जागोजागी नियमबाह्य वाळूचे साठे असताना तहसीलदारांना ते का दिसत नाही, हा संशोधनाचा विषय आहे.सरकारी कामात वाळूऐवजी चुरीचा वापरहल्ली महानगरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते निर्मितीची कामे सुरू आहे. परंतु, अधिकृत वाळू उपसा बंद असल्याने या बांधकामात वाळूऐवजी चुरी (डस्ट) चा वापर केला जात आहे. सिमेंट रस्ते निर्मितीत वाळूचा वापर न होणे म्हणजे या रस्त्याच्या दर्जाशी तडजोड करणे होय, असे तज्ञ्जांचे मत आहे. बांधकामात वाळूचा वापर अतिशय महत्त्वाचा असून, डस्टमुळे रस्त्याचा दर्जा राखला जात नाही, हे वास्तव आहे.नव्या नियमानुसार चार रेतीघाटांचा लिलाव चढ्या दराने करण्यात आला आहे. त्यामुळे वाळूचे दर नक्कीच वधारले असतील. काही वाळूघाटांचा लिलाव अद्यापही बाकी आहे. वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.- अभिजित बांगरजिल्हाधिकारी, अमरावती.चढ्या दरात वाळू खरेदी करून बांधकामे पूर्ण करावे लागत आहे. प्रतिट्रक सहा ते आठ हजार रुपये जादा द्यावे लागत असल्याने नियोजन कोलमडले आहे.- प्रकाश दातारबांधकाम ठेकेदार, बडनेरा.