शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

वाळूचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:37 IST

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यात काही रेतीघाटांवरून वाळूचा उपसा बंद असला तरी मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवली जात आहे. त्याचवेळी बंदचा बाऊ करीत व्यावसायिकांकडून ती चढ्या दराने विकली जात आहे. याचा बांधकामावर परिणाम होत आहे, शिवाय अवैधरीत्या आणली जाणारी वाळू महसूल विभागाला दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देबांधकामांवर परिणाम : अवैध साठ्यांना महसूल विभागाचा ‘आशीर्वाद’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यात काही रेतीघाटांवरून वाळूचा उपसा बंद असला तरी मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवली जात आहे. त्याचवेळी बंदचा बाऊ करीत व्यावसायिकांकडून ती चढ्या दराने विकली जात आहे. याचा बांधकामावर परिणाम होत आहे, शिवाय अवैधरीत्या आणली जाणारी वाळू महसूल विभागाला दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वाळू तस्करीत तलाठी, नायब तहसीलदार ते तहसीलदार अशी साखळी असल्यामुळेच उपसा बंद असूनही शहरातील गल्ली-बोळात वाळूचे अवैध साठे आढळतात. घरे, सदनिका, सरकारी रस्ते, शॉपींग कॉम्प्लेक्स, क्रीडांगण आदी बांधकामे ही उन्हाळ्यात केली जातात. मात्र, वाळू अव्वाच्या सव्वा दराने विकली जात असल्याने याचा आर्थिक फटका घरमालकांना सहन करावा लागत आहे. दुसरीकडे वाळूअभावी अर्धवट कामे बंद ठेवण्याचा प्रसंग बांधकाम व्यावसायिकांवर आला आहे. चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागत असल्याने बिल्डर्स, बांधकाम व्यावसायीकांचे नियोजन कोलमडले आहे. शहरात तस्कर मात्र विनारॉयल्टी वाळू विक्रीसाठी आणत असून, याचा फटका महसूल विभागाला बसत आहे. रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुलांची बांधकामे सुरू असून, त्यासाठी जादा दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. दोन ब्रास वाळूसाठी १६ ते १८ हजार रुपये मोजावे लागत असल्याने मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांचा घर बांधणीचा वेग मंदावला आहे. वाळूअभावी बांधकामे मंदावल्यामुळे कुशल-अर्धकुशल कामगारांची काम शोधण्यासाठी भटकंती होत आहे. अमरावती व बडनेरा शहरात जागोजागी नियमबाह्य वाळूचे साठे असताना तहसीलदारांना ते का दिसत नाही, हा संशोधनाचा विषय आहे.सरकारी कामात वाळूऐवजी चुरीचा वापरहल्ली महानगरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते निर्मितीची कामे सुरू आहे. परंतु, अधिकृत वाळू उपसा बंद असल्याने या बांधकामात वाळूऐवजी चुरी (डस्ट) चा वापर केला जात आहे. सिमेंट रस्ते निर्मितीत वाळूचा वापर न होणे म्हणजे या रस्त्याच्या दर्जाशी तडजोड करणे होय, असे तज्ञ्जांचे मत आहे. बांधकामात वाळूचा वापर अतिशय महत्त्वाचा असून, डस्टमुळे रस्त्याचा दर्जा राखला जात नाही, हे वास्तव आहे.नव्या नियमानुसार चार रेतीघाटांचा लिलाव चढ्या दराने करण्यात आला आहे. त्यामुळे वाळूचे दर नक्कीच वधारले असतील. काही वाळूघाटांचा लिलाव अद्यापही बाकी आहे. वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.- अभिजित बांगरजिल्हाधिकारी, अमरावती.चढ्या दरात वाळू खरेदी करून बांधकामे पूर्ण करावे लागत आहे. प्रतिट्रक सहा ते आठ हजार रुपये जादा द्यावे लागत असल्याने नियोजन कोलमडले आहे.- प्रकाश दातारबांधकाम ठेकेदार, बडनेरा.