शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

बैलजोडींची खरेदी-विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:01 IST

अंजनगाव सुर्जी बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात अकोला, खान्देश, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत.

ठळक मुद्देशेतीच्या उदिमात बैलांचे महत्त्व; शेतकऱ्यांना चिंता खरिपाची

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अंजनगाव सुर्जी येथील गुरांच्या बाजारात बाजारात बैलजोडी खरेदी-विक्री बंद आहे. त्यामुळे दीड महिन्यांत लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे बैलांकरवी होणाºया शेतीच्या मशागतीअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.अंजनगाव सुर्जी बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात अकोला, खान्देश, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत.ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे गतिमान झाली, यात शंका नाही. मात्र, अजूनही शेतीच्या बºयाच कामांना बैलजोडीशिवाय पर्याय नाही, हे वास्तव आहे. खरीप हंगामात शेतीची तयारी करीत असताना सरी पाडणे, वखरवाहीसाठी बैलजोडीला प्राधान्य दिले जाते. त्याच बरोबर गावांत शेतरस्ते नाहीत. तेथे शेतमाल वाहतुकीसाठी तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैलजोडी महत्त्वाची असते. बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने वखरणी बंद झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.अमरावती शहराव्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा अधिक शिरकाव झाला नसल्याने शेतकरी खरीपाच्या पूर्वमशागतीला लागले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरची मागणी अचानक वाढली आहे. त्यात वखरणी, नांगरणीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे बैलजोडीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र बाजार लॉकडाऊन झाल्यामुळे बैलांचे खरदी-विक्री व्यवहार थांबलेले आहेत. दरम्यान पुण्या-मुंबईहून अनेकजण परतले असून ते पारंपारिक शेतीकडे वळले आहेत.घरातील कर्ता पुरूष शेती कसत असताना दुसरा आल्याने शेतीची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेकांचा मक्त्याने शेती करण्याकडे कल असून त्यांच्याकडूनही बैलजोडीबाबत विचारणा केली जात आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.दलाल चिंतेतबैलजोड्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावणाºया दलालांना बाजार बंद असल्याने हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यांचा रोजगार बुडाला आहे. करोनाचे संकट दूर होऊन बाजार सुरू व्हावा, अशी मनोमन प्रार्थना ते करीत आहेत.लॉकडाऊनच्या काळात गुरांच्या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. गर्दी होईल. त्यामुळे शासनादेशाने बाजार बंद आहे. दुसरीकडे शेतकºयांना बैलजोडी आवश्यक आहे, हे आम्ही जाणतो. त्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.- गजानन नवघरे,सचिव, बाजार समिती,अंजनगाव सुर्जी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती