शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बैलजोडींची खरेदी-विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:01 IST

अंजनगाव सुर्जी बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात अकोला, खान्देश, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत.

ठळक मुद्देशेतीच्या उदिमात बैलांचे महत्त्व; शेतकऱ्यांना चिंता खरिपाची

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अंजनगाव सुर्जी येथील गुरांच्या बाजारात बाजारात बैलजोडी खरेदी-विक्री बंद आहे. त्यामुळे दीड महिन्यांत लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे बैलांकरवी होणाºया शेतीच्या मशागतीअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.अंजनगाव सुर्जी बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात अकोला, खान्देश, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत.ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे गतिमान झाली, यात शंका नाही. मात्र, अजूनही शेतीच्या बºयाच कामांना बैलजोडीशिवाय पर्याय नाही, हे वास्तव आहे. खरीप हंगामात शेतीची तयारी करीत असताना सरी पाडणे, वखरवाहीसाठी बैलजोडीला प्राधान्य दिले जाते. त्याच बरोबर गावांत शेतरस्ते नाहीत. तेथे शेतमाल वाहतुकीसाठी तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैलजोडी महत्त्वाची असते. बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने वखरणी बंद झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.अमरावती शहराव्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा अधिक शिरकाव झाला नसल्याने शेतकरी खरीपाच्या पूर्वमशागतीला लागले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरची मागणी अचानक वाढली आहे. त्यात वखरणी, नांगरणीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे बैलजोडीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र बाजार लॉकडाऊन झाल्यामुळे बैलांचे खरदी-विक्री व्यवहार थांबलेले आहेत. दरम्यान पुण्या-मुंबईहून अनेकजण परतले असून ते पारंपारिक शेतीकडे वळले आहेत.घरातील कर्ता पुरूष शेती कसत असताना दुसरा आल्याने शेतीची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेकांचा मक्त्याने शेती करण्याकडे कल असून त्यांच्याकडूनही बैलजोडीबाबत विचारणा केली जात आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.दलाल चिंतेतबैलजोड्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावणाºया दलालांना बाजार बंद असल्याने हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यांचा रोजगार बुडाला आहे. करोनाचे संकट दूर होऊन बाजार सुरू व्हावा, अशी मनोमन प्रार्थना ते करीत आहेत.लॉकडाऊनच्या काळात गुरांच्या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. गर्दी होईल. त्यामुळे शासनादेशाने बाजार बंद आहे. दुसरीकडे शेतकºयांना बैलजोडी आवश्यक आहे, हे आम्ही जाणतो. त्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.- गजानन नवघरे,सचिव, बाजार समिती,अंजनगाव सुर्जी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती