शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बैलजोडींची खरेदी-विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:01 IST

अंजनगाव सुर्जी बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात अकोला, खान्देश, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत.

ठळक मुद्देशेतीच्या उदिमात बैलांचे महत्त्व; शेतकऱ्यांना चिंता खरिपाची

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अंजनगाव सुर्जी येथील गुरांच्या बाजारात बाजारात बैलजोडी खरेदी-विक्री बंद आहे. त्यामुळे दीड महिन्यांत लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे बैलांकरवी होणाºया शेतीच्या मशागतीअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.अंजनगाव सुर्जी बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात अकोला, खान्देश, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत.ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे गतिमान झाली, यात शंका नाही. मात्र, अजूनही शेतीच्या बºयाच कामांना बैलजोडीशिवाय पर्याय नाही, हे वास्तव आहे. खरीप हंगामात शेतीची तयारी करीत असताना सरी पाडणे, वखरवाहीसाठी बैलजोडीला प्राधान्य दिले जाते. त्याच बरोबर गावांत शेतरस्ते नाहीत. तेथे शेतमाल वाहतुकीसाठी तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैलजोडी महत्त्वाची असते. बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने वखरणी बंद झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.अमरावती शहराव्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा अधिक शिरकाव झाला नसल्याने शेतकरी खरीपाच्या पूर्वमशागतीला लागले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरची मागणी अचानक वाढली आहे. त्यात वखरणी, नांगरणीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे बैलजोडीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र बाजार लॉकडाऊन झाल्यामुळे बैलांचे खरदी-विक्री व्यवहार थांबलेले आहेत. दरम्यान पुण्या-मुंबईहून अनेकजण परतले असून ते पारंपारिक शेतीकडे वळले आहेत.घरातील कर्ता पुरूष शेती कसत असताना दुसरा आल्याने शेतीची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेकांचा मक्त्याने शेती करण्याकडे कल असून त्यांच्याकडूनही बैलजोडीबाबत विचारणा केली जात आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.दलाल चिंतेतबैलजोड्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावणाºया दलालांना बाजार बंद असल्याने हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यांचा रोजगार बुडाला आहे. करोनाचे संकट दूर होऊन बाजार सुरू व्हावा, अशी मनोमन प्रार्थना ते करीत आहेत.लॉकडाऊनच्या काळात गुरांच्या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. गर्दी होईल. त्यामुळे शासनादेशाने बाजार बंद आहे. दुसरीकडे शेतकºयांना बैलजोडी आवश्यक आहे, हे आम्ही जाणतो. त्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.- गजानन नवघरे,सचिव, बाजार समिती,अंजनगाव सुर्जी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती