शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

साहिर आधी कोरोनात, आता युद्धामुळे परतला घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक प्रसन्नजित तेलंग यांचा मुलगा साहिर हा युक्रेनचे प्रशासकीय केंद्र असलेल्या चेरनिव्त्सी शहरातील महाविद्यलयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. दोन महिन्यात नॅशनल  एक्झाम देऊन त्या पदवी मिळणार होती. युद्धामुळे सुरळीत सुरू असलेला शैक्षणिक प्रवास थांबला आहे. कोरोनामुळे आधी त्यात खंड पडला होता. आता युद्धानंतर परिस्थिती किती दिवसांनी सावरते, याच्या प्रतीक्षेशिवाय गत्यंतर नाही, असे तो म्हणाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युद्धजन्य स्थितीतून बाहेर कधी पडणार, हा एकमेव विचार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सतावत आहे. रशियाच्या फायटर विमानांमधून सातत्याने बॉम्बवर्षाव होत आहे. त्यामुळे जिवाची भीती आणि कुटुंबाला पारखे झालेल्या या विद्यार्थ्यांची  पहिली तुकडी शनिवारी रात्री विमानाने भारतात पोहोचली आणि सर्वांना रडूच कोसळले. यावेळी सुटकेचा नि:श्वास चांदूर रेल्वे येथील सारंग तेलंगनेही सोडला. तो या विमानाने भारतात परतणारा पहिला अमरावतीकर ठरला. चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक प्रसन्नजित तेलंग यांचा मुलगा साहिर हा युक्रेनचे प्रशासकीय केंद्र असलेल्या चेरनिव्त्सी शहरातील महाविद्यलयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. दोन महिन्यात नॅशनल  एक्झाम देऊन त्या पदवी मिळणार होती. युद्धामुळे सुरळीत सुरू असलेला शैक्षणिक प्रवास थांबला आहे. कोरोनामुळे आधी त्यात खंड पडला होता. आता युद्धानंतर परिस्थिती किती दिवसांनी सावरते, याच्या प्रतीक्षेशिवाय गत्यंतर नाही, असे तो म्हणाला. त्याचे मन अजूनही कॉलेज कॅम्पसमध्येच गुंतल्याचे चेहऱ्यावर झळकत होते. 

मुलापुढे सर्व गौण युद्धग्रस्त स्थितीतून मुलगा पहिल्याच फ्लाईटने घरी सुखरूप पोहोचल्याचा आनंद प्रसन्नजित तेलंग यांच्या चेहऱ्यावर होता. इतर पालकांनाही त्यांची मुले सुखरूप मिळोत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

बसने नेले रोमानियाला चेरनिव्त्सी हे मोठे शहर आहे. येथे हजारो विद्यार्थी, त्यात भारतीय प्रवेशित आहेत. बंकरमध्ये शरण घेतलेल्या या युवकांना बसने रोमानियाच्या सीमेवर व तेथून चेक इन करून राजधानी बुखारेस्ट येथील विमानतळावर नेण्यात आले. तेथे एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. तेथून घरी आल्याचे साहिरने सांगितले. 

दररोज बॉम्बिंगयुक्रेनची राजधानी किव्हवर दररोज बॉम्बिंग केले जात आहे. त्यामुळे या देशात शिकण्यासाठी गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासमवेत त्यांचे पालकदेखील चिंताग्रस्त आहेत. एकमेकांशी परिचय, संपर्क असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक विचारपूस करतात. 

अमरावतीच्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्र्यांचा संवादरशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीयांसोबतच तिथे अडकलेल्या  साहिरसह जिल्ह्यातील अभिषेक बारबडे, प्रणव फुसे, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ  गजभिये, स्वराज पौंड आणि प्रणव भारसाकळे या आठ विद्यार्थ्यांचा संपर्क क्रमांक मिळताच महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तातडीने त्यांच्याशी संवाद साधला व दिलासा दिला. तिवसा तालुक्यातील तुषारसह सर्वांना धीर देत केंद्राच्यावतीने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे, असे पालकमंत्री म्हणाल्या.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीwarयुद्ध