शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

साहिर आधी कोरोनात, आता युद्धामुळे परतला घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक प्रसन्नजित तेलंग यांचा मुलगा साहिर हा युक्रेनचे प्रशासकीय केंद्र असलेल्या चेरनिव्त्सी शहरातील महाविद्यलयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. दोन महिन्यात नॅशनल  एक्झाम देऊन त्या पदवी मिळणार होती. युद्धामुळे सुरळीत सुरू असलेला शैक्षणिक प्रवास थांबला आहे. कोरोनामुळे आधी त्यात खंड पडला होता. आता युद्धानंतर परिस्थिती किती दिवसांनी सावरते, याच्या प्रतीक्षेशिवाय गत्यंतर नाही, असे तो म्हणाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युद्धजन्य स्थितीतून बाहेर कधी पडणार, हा एकमेव विचार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सतावत आहे. रशियाच्या फायटर विमानांमधून सातत्याने बॉम्बवर्षाव होत आहे. त्यामुळे जिवाची भीती आणि कुटुंबाला पारखे झालेल्या या विद्यार्थ्यांची  पहिली तुकडी शनिवारी रात्री विमानाने भारतात पोहोचली आणि सर्वांना रडूच कोसळले. यावेळी सुटकेचा नि:श्वास चांदूर रेल्वे येथील सारंग तेलंगनेही सोडला. तो या विमानाने भारतात परतणारा पहिला अमरावतीकर ठरला. चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक प्रसन्नजित तेलंग यांचा मुलगा साहिर हा युक्रेनचे प्रशासकीय केंद्र असलेल्या चेरनिव्त्सी शहरातील महाविद्यलयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. दोन महिन्यात नॅशनल  एक्झाम देऊन त्या पदवी मिळणार होती. युद्धामुळे सुरळीत सुरू असलेला शैक्षणिक प्रवास थांबला आहे. कोरोनामुळे आधी त्यात खंड पडला होता. आता युद्धानंतर परिस्थिती किती दिवसांनी सावरते, याच्या प्रतीक्षेशिवाय गत्यंतर नाही, असे तो म्हणाला. त्याचे मन अजूनही कॉलेज कॅम्पसमध्येच गुंतल्याचे चेहऱ्यावर झळकत होते. 

मुलापुढे सर्व गौण युद्धग्रस्त स्थितीतून मुलगा पहिल्याच फ्लाईटने घरी सुखरूप पोहोचल्याचा आनंद प्रसन्नजित तेलंग यांच्या चेहऱ्यावर होता. इतर पालकांनाही त्यांची मुले सुखरूप मिळोत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

बसने नेले रोमानियाला चेरनिव्त्सी हे मोठे शहर आहे. येथे हजारो विद्यार्थी, त्यात भारतीय प्रवेशित आहेत. बंकरमध्ये शरण घेतलेल्या या युवकांना बसने रोमानियाच्या सीमेवर व तेथून चेक इन करून राजधानी बुखारेस्ट येथील विमानतळावर नेण्यात आले. तेथे एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. तेथून घरी आल्याचे साहिरने सांगितले. 

दररोज बॉम्बिंगयुक्रेनची राजधानी किव्हवर दररोज बॉम्बिंग केले जात आहे. त्यामुळे या देशात शिकण्यासाठी गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासमवेत त्यांचे पालकदेखील चिंताग्रस्त आहेत. एकमेकांशी परिचय, संपर्क असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक विचारपूस करतात. 

अमरावतीच्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्र्यांचा संवादरशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीयांसोबतच तिथे अडकलेल्या  साहिरसह जिल्ह्यातील अभिषेक बारबडे, प्रणव फुसे, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ  गजभिये, स्वराज पौंड आणि प्रणव भारसाकळे या आठ विद्यार्थ्यांचा संपर्क क्रमांक मिळताच महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तातडीने त्यांच्याशी संवाद साधला व दिलासा दिला. तिवसा तालुक्यातील तुषारसह सर्वांना धीर देत केंद्राच्यावतीने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे, असे पालकमंत्री म्हणाल्या.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीwarयुद्ध