शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात वाघांची सुरक्षा वाऱ्यावर; एसटीपीएफ दल बेपत्ता, १०३ वनरक्षक गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 11:50 IST

मूळ उद्देशाला फाटा, सुविधांचा अभाव, वाहन भंगारात

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) :वाघाच्या शिकारी व मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वत्र खबरदारीच्या उपयोजना केल्या जात आहेत. परंतु, मेळघाटात त्याचे विपरीत स्थिती आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने राज्यात मेळघाट, ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाटात अस्तित्वात आलेले व्याघ्र संरक्षण कृती दल बेपत्ता झाले आहे. त्यातील १०३ वनरक्षक मुख्य उद्देश सोडून दुसरीकडे वळविण्यात आल्याचा, तर दलासाठी खरेदी केलेले वाहन भंगारात पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वाघांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के वाटा खर्चून राज्यात ताडोबा, पेंच व मेळघाटात स्थापित करण्यात आलेल्या व्याघ्र संरक्षण कृती दलाचे अस्तित्व मेळघाटातून बेपत्ता झाले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी या दलाची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली होती. परंतु, मेळघाटात हे दल शोधूनही दिसत नाही.

मेळघाटातील तीनही दल बेपत्ता

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोट, सिपना व गुगामल या तीनही वन्यजीव विभागातील व्याघ्र संरक्षण दलात प्रत्येकी ३० वनरक्षक व नऊ वन निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. अकोट, सेमाडोह, ढाकणा व नंतर चिखलदरा येथे या दलाच्या वसतिगृह व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

वाघांची सुरक्षा धोक्यात टाकून गुंतविले दुसरीकडे

मेळघाटातील आदिवासी युवक व युवतींना एसटीपीएफ दलात संधी देण्यात आली आहे. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जंगलात कॅम्प करून तेथेच मुक्कामी राहण्याचे सोडून सामान्य वनरक्षकाप्रमाणे त्यांना बीटमध्ये नेमणुका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

कुठे, किती अस्तित्व उरले?

३० वनरक्षकांपैकी अकोट, गुल्लरघाट येथे चार महिला, सेमाडोह, चिखलदरा येथे प्रत्येकी सात महिला वनरक्षक असल्याची माहिती आहे. या तीनही दलांसाठी अकोट येथे वनपरिक्षेत्र अधिकारी नसून ढाकणा वजा चिखलदरा येथील पदभार आरएफ प्रफुल ठाकरे, तर सेमाडोह येथील सम्राट मेश्राम यांच्याकडे आहे.

सोळा लाखांचे वाहन भंगारात

एसटीपीएफ दलासाठी १६ लाख रुपये खर्च करून २०१७ साली वाहन खरेदी करण्यात आले. हे वाहन सात महिने चालविल्यानंतर परतवाडा येथील सिपना वन्यजीव विभागाच्या कार्यालयामागे भंगार अवस्थेत पडून आहे.

मेळघाटचे शिकार प्रकरण देशभर गाजले

मेळघाटात गत काही वर्षांपूर्वी झालेल्या वाघाचे शिकार प्रकरण देशभर गाजले. शिकाऱ्यांना शिक्षाही झाली. शिकारीमुळे येथे वाघांची संख्या वाढत नाही, असा कयास लावून जंगलतोड, वाढते अतिक्रमण, मध्य प्रदेशातून शिकाऱ्यांना वाव या सर्व बाबींवर नजर ठेवण्यासाठी पेंच, ताडोबाच्या धर्तीवर एसटीपीएफ निर्माण करण्यात आले. त्यातून स्थानिक युवकांना रोजगार मिळण्याचा उद्देश होता. परंतु, नेमणूक झाल्यावर शंभरावर एसटीपीएफच्या जवानांना दुसरीकडे गुंतविण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागTigerवाघMelghatमेळघाटwildlifeवन्यजीव