शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

मेळघाटात वाघांची सुरक्षा वाऱ्यावर; एसटीपीएफ दल बेपत्ता, १०३ वनरक्षक गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 11:50 IST

मूळ उद्देशाला फाटा, सुविधांचा अभाव, वाहन भंगारात

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) :वाघाच्या शिकारी व मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वत्र खबरदारीच्या उपयोजना केल्या जात आहेत. परंतु, मेळघाटात त्याचे विपरीत स्थिती आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने राज्यात मेळघाट, ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाटात अस्तित्वात आलेले व्याघ्र संरक्षण कृती दल बेपत्ता झाले आहे. त्यातील १०३ वनरक्षक मुख्य उद्देश सोडून दुसरीकडे वळविण्यात आल्याचा, तर दलासाठी खरेदी केलेले वाहन भंगारात पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वाघांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के वाटा खर्चून राज्यात ताडोबा, पेंच व मेळघाटात स्थापित करण्यात आलेल्या व्याघ्र संरक्षण कृती दलाचे अस्तित्व मेळघाटातून बेपत्ता झाले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी या दलाची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली होती. परंतु, मेळघाटात हे दल शोधूनही दिसत नाही.

मेळघाटातील तीनही दल बेपत्ता

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोट, सिपना व गुगामल या तीनही वन्यजीव विभागातील व्याघ्र संरक्षण दलात प्रत्येकी ३० वनरक्षक व नऊ वन निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. अकोट, सेमाडोह, ढाकणा व नंतर चिखलदरा येथे या दलाच्या वसतिगृह व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

वाघांची सुरक्षा धोक्यात टाकून गुंतविले दुसरीकडे

मेळघाटातील आदिवासी युवक व युवतींना एसटीपीएफ दलात संधी देण्यात आली आहे. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जंगलात कॅम्प करून तेथेच मुक्कामी राहण्याचे सोडून सामान्य वनरक्षकाप्रमाणे त्यांना बीटमध्ये नेमणुका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

कुठे, किती अस्तित्व उरले?

३० वनरक्षकांपैकी अकोट, गुल्लरघाट येथे चार महिला, सेमाडोह, चिखलदरा येथे प्रत्येकी सात महिला वनरक्षक असल्याची माहिती आहे. या तीनही दलांसाठी अकोट येथे वनपरिक्षेत्र अधिकारी नसून ढाकणा वजा चिखलदरा येथील पदभार आरएफ प्रफुल ठाकरे, तर सेमाडोह येथील सम्राट मेश्राम यांच्याकडे आहे.

सोळा लाखांचे वाहन भंगारात

एसटीपीएफ दलासाठी १६ लाख रुपये खर्च करून २०१७ साली वाहन खरेदी करण्यात आले. हे वाहन सात महिने चालविल्यानंतर परतवाडा येथील सिपना वन्यजीव विभागाच्या कार्यालयामागे भंगार अवस्थेत पडून आहे.

मेळघाटचे शिकार प्रकरण देशभर गाजले

मेळघाटात गत काही वर्षांपूर्वी झालेल्या वाघाचे शिकार प्रकरण देशभर गाजले. शिकाऱ्यांना शिक्षाही झाली. शिकारीमुळे येथे वाघांची संख्या वाढत नाही, असा कयास लावून जंगलतोड, वाढते अतिक्रमण, मध्य प्रदेशातून शिकाऱ्यांना वाव या सर्व बाबींवर नजर ठेवण्यासाठी पेंच, ताडोबाच्या धर्तीवर एसटीपीएफ निर्माण करण्यात आले. त्यातून स्थानिक युवकांना रोजगार मिळण्याचा उद्देश होता. परंतु, नेमणूक झाल्यावर शंभरावर एसटीपीएफच्या जवानांना दुसरीकडे गुंतविण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागTigerवाघMelghatमेळघाटwildlifeवन्यजीव