शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

मेळघाटात वाघांची सुरक्षा वाऱ्यावर; एसटीपीएफ दल बेपत्ता, १०३ वनरक्षक गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 11:50 IST

मूळ उद्देशाला फाटा, सुविधांचा अभाव, वाहन भंगारात

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) :वाघाच्या शिकारी व मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वत्र खबरदारीच्या उपयोजना केल्या जात आहेत. परंतु, मेळघाटात त्याचे विपरीत स्थिती आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने राज्यात मेळघाट, ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाटात अस्तित्वात आलेले व्याघ्र संरक्षण कृती दल बेपत्ता झाले आहे. त्यातील १०३ वनरक्षक मुख्य उद्देश सोडून दुसरीकडे वळविण्यात आल्याचा, तर दलासाठी खरेदी केलेले वाहन भंगारात पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वाघांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के वाटा खर्चून राज्यात ताडोबा, पेंच व मेळघाटात स्थापित करण्यात आलेल्या व्याघ्र संरक्षण कृती दलाचे अस्तित्व मेळघाटातून बेपत्ता झाले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी या दलाची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली होती. परंतु, मेळघाटात हे दल शोधूनही दिसत नाही.

मेळघाटातील तीनही दल बेपत्ता

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोट, सिपना व गुगामल या तीनही वन्यजीव विभागातील व्याघ्र संरक्षण दलात प्रत्येकी ३० वनरक्षक व नऊ वन निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. अकोट, सेमाडोह, ढाकणा व नंतर चिखलदरा येथे या दलाच्या वसतिगृह व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

वाघांची सुरक्षा धोक्यात टाकून गुंतविले दुसरीकडे

मेळघाटातील आदिवासी युवक व युवतींना एसटीपीएफ दलात संधी देण्यात आली आहे. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जंगलात कॅम्प करून तेथेच मुक्कामी राहण्याचे सोडून सामान्य वनरक्षकाप्रमाणे त्यांना बीटमध्ये नेमणुका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

कुठे, किती अस्तित्व उरले?

३० वनरक्षकांपैकी अकोट, गुल्लरघाट येथे चार महिला, सेमाडोह, चिखलदरा येथे प्रत्येकी सात महिला वनरक्षक असल्याची माहिती आहे. या तीनही दलांसाठी अकोट येथे वनपरिक्षेत्र अधिकारी नसून ढाकणा वजा चिखलदरा येथील पदभार आरएफ प्रफुल ठाकरे, तर सेमाडोह येथील सम्राट मेश्राम यांच्याकडे आहे.

सोळा लाखांचे वाहन भंगारात

एसटीपीएफ दलासाठी १६ लाख रुपये खर्च करून २०१७ साली वाहन खरेदी करण्यात आले. हे वाहन सात महिने चालविल्यानंतर परतवाडा येथील सिपना वन्यजीव विभागाच्या कार्यालयामागे भंगार अवस्थेत पडून आहे.

मेळघाटचे शिकार प्रकरण देशभर गाजले

मेळघाटात गत काही वर्षांपूर्वी झालेल्या वाघाचे शिकार प्रकरण देशभर गाजले. शिकाऱ्यांना शिक्षाही झाली. शिकारीमुळे येथे वाघांची संख्या वाढत नाही, असा कयास लावून जंगलतोड, वाढते अतिक्रमण, मध्य प्रदेशातून शिकाऱ्यांना वाव या सर्व बाबींवर नजर ठेवण्यासाठी पेंच, ताडोबाच्या धर्तीवर एसटीपीएफ निर्माण करण्यात आले. त्यातून स्थानिक युवकांना रोजगार मिळण्याचा उद्देश होता. परंतु, नेमणूक झाल्यावर शंभरावर एसटीपीएफच्या जवानांना दुसरीकडे गुंतविण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागTigerवाघMelghatमेळघाटwildlifeवन्यजीव