शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मेळघाटात वाघांची सुरक्षा वाऱ्यावर; एसटीपीएफ दल बेपत्ता, १०३ वनरक्षक गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 11:50 IST

मूळ उद्देशाला फाटा, सुविधांचा अभाव, वाहन भंगारात

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) :वाघाच्या शिकारी व मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वत्र खबरदारीच्या उपयोजना केल्या जात आहेत. परंतु, मेळघाटात त्याचे विपरीत स्थिती आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने राज्यात मेळघाट, ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाटात अस्तित्वात आलेले व्याघ्र संरक्षण कृती दल बेपत्ता झाले आहे. त्यातील १०३ वनरक्षक मुख्य उद्देश सोडून दुसरीकडे वळविण्यात आल्याचा, तर दलासाठी खरेदी केलेले वाहन भंगारात पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वाघांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के वाटा खर्चून राज्यात ताडोबा, पेंच व मेळघाटात स्थापित करण्यात आलेल्या व्याघ्र संरक्षण कृती दलाचे अस्तित्व मेळघाटातून बेपत्ता झाले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी या दलाची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली होती. परंतु, मेळघाटात हे दल शोधूनही दिसत नाही.

मेळघाटातील तीनही दल बेपत्ता

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोट, सिपना व गुगामल या तीनही वन्यजीव विभागातील व्याघ्र संरक्षण दलात प्रत्येकी ३० वनरक्षक व नऊ वन निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. अकोट, सेमाडोह, ढाकणा व नंतर चिखलदरा येथे या दलाच्या वसतिगृह व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

वाघांची सुरक्षा धोक्यात टाकून गुंतविले दुसरीकडे

मेळघाटातील आदिवासी युवक व युवतींना एसटीपीएफ दलात संधी देण्यात आली आहे. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जंगलात कॅम्प करून तेथेच मुक्कामी राहण्याचे सोडून सामान्य वनरक्षकाप्रमाणे त्यांना बीटमध्ये नेमणुका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

कुठे, किती अस्तित्व उरले?

३० वनरक्षकांपैकी अकोट, गुल्लरघाट येथे चार महिला, सेमाडोह, चिखलदरा येथे प्रत्येकी सात महिला वनरक्षक असल्याची माहिती आहे. या तीनही दलांसाठी अकोट येथे वनपरिक्षेत्र अधिकारी नसून ढाकणा वजा चिखलदरा येथील पदभार आरएफ प्रफुल ठाकरे, तर सेमाडोह येथील सम्राट मेश्राम यांच्याकडे आहे.

सोळा लाखांचे वाहन भंगारात

एसटीपीएफ दलासाठी १६ लाख रुपये खर्च करून २०१७ साली वाहन खरेदी करण्यात आले. हे वाहन सात महिने चालविल्यानंतर परतवाडा येथील सिपना वन्यजीव विभागाच्या कार्यालयामागे भंगार अवस्थेत पडून आहे.

मेळघाटचे शिकार प्रकरण देशभर गाजले

मेळघाटात गत काही वर्षांपूर्वी झालेल्या वाघाचे शिकार प्रकरण देशभर गाजले. शिकाऱ्यांना शिक्षाही झाली. शिकारीमुळे येथे वाघांची संख्या वाढत नाही, असा कयास लावून जंगलतोड, वाढते अतिक्रमण, मध्य प्रदेशातून शिकाऱ्यांना वाव या सर्व बाबींवर नजर ठेवण्यासाठी पेंच, ताडोबाच्या धर्तीवर एसटीपीएफ निर्माण करण्यात आले. त्यातून स्थानिक युवकांना रोजगार मिळण्याचा उद्देश होता. परंतु, नेमणूक झाल्यावर शंभरावर एसटीपीएफच्या जवानांना दुसरीकडे गुंतविण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागTigerवाघMelghatमेळघाटwildlifeवन्यजीव